शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

बोगस डॉक्टरांच्या हाती रुग्णांची नाडी

By admin | Updated: August 3, 2014 23:39 IST

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही, केवळ डॉक्टरसारखी पेटी हातात घेऊन गावोगावी फिरणाऱ्या बोगस डॉक्टरांनी रुग्णांचा जीव धोक्यात आणला आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरासारखे

प्रकाश सातघरे - दिग्रसवैद्यकीय क्षेत्रातील पदवी नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही, केवळ डॉक्टरसारखी पेटी हातात घेऊन गावोगावी फिरणाऱ्या बोगस डॉक्टरांनी रुग्णांचा जीव धोक्यात आणला आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरासारखे संभाषण कौशल्य हीच त्यांची पदवी. मात्र या प्रकारात गोरगरीब जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. दिग्रस तालुक्यात गावागावात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागात आजही पाहिजे तशी आरोग्य सेवा पोहोचली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र केवळ नावापुरतेच आहे. रात्री-बे-रात्री कुणी आजारी पडल्यास या ठिकाणी डॉक्टर भेटत नाही. परिणामी शहराकडे धाव घ्यावी लागते. अनेकांची शहरापर्यंत जाण्याची परिस्थिती नसते. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा बोगस डॉक्टरांकडून घेतला जातो. साधा निरोप आला की डॉक्टर घरपोच आरोग्य सेवा द्यायला तयार होतो. आजार कोणता झाला, नेमके काय होत आहे याची जुजबी चौकशी आटोपली की सरळ सलाईन लावली जाते. कोणतेही ज्ञान नसताना रुग्णावर उपचार केले जाते. भरमसाठ औषधी दिली जाते. विशेष म्हणजे या डॉक्टरांजवळच लागणारी औषधी उपलब्ध असते. त्याचवेळी रुग्णाला औषधी विकत दिली जाते. काही गावात तर डॉक्टरांंनी दवाखाने थाटले आहे. यामध्ये बंगाली डॉक्टरांचा समावेश आहे. तर काही डॉक्टर गावागावात फिरुन आपली वैद्यकीय सेवा देत आहे. बोगस डॉक्टरांच्या औषधोपचाराने काही रुग्णांवर विपरित परिणाम होत आहे. अनावश्यक औषधी शरीरात गेल्याने त्याचे परिणाम रुग्णांवर दिसून येतात. मात्र नाईलाजाने गोरगरिबांना या डॉक्टरांच्या हातूनच उपचार करावा लागतो. एखाद्या गावात विरोध झाला तर गावातील इतर लोकांना विश्वासात घेऊन डॉक्टर त्याच ठिकाणी प्रकरण निस्तारतात. मात्र हा डॉक्टर खरा की खोटा हे मात्र कुणीही पाहत नाही. बोगस डॉक्टरांवर नियंत्रण आणि त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. मात्र जिल्हा पातळीवरच दखल घेतली जात नसल्याने गाव पातळीवर जाऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांची तपासणीच करीत नाही. वरुन काही आदेश आला की, जुजबी कारवाई केली जाते. या सर्व प्रकारात बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत असून नागरिकांना मात्र मृत्यूच्या दाढेत ढकलत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.