शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

डेहणी सिंचन प्रकल्प अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:29 IST

आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना लाभ नाही : आशिया खंडातील मोठ्या प्रकल्पाची वाताहत, प्रशासनाचे दुर्लक्ष

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन करता यावे यासाठी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. बेंबळा प्रकल्पाला पर्याय म्हणून डेहणी उपसा प्रकल्प काँग्रेसने मंजूर करून पूर्णत्वास आणला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संरक्षित सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक संच देण्याचा निर्णयही घेतला. मात्र नंतर सरकार बदलल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. १९९७ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता पूर्ण होऊनही केवळ जुजबी कारणांमुळे त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. कोट्यवधी रुपयांची यंत्रणा डेहणी येथे बेवारस पडलेली आहे. सिंचन विभागाचे अधिकारी याकडे फिरकून पाहात नाही. केवळ राजकीय वशीला असलेल्या शेतकºयांनाच या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे. उदात्त हेतू ठेऊन नेर तालुक्यातील चिखली, मांगलादेवी, धनज, ब्राह्मणवाडा, टाकळी, कुऱ्हेगाव यासह इतर गावांमध्ये सिंचनासाठी संरक्षित पाणी देण्यावर प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्यापही प्रकल्पाचे पाणी पोहोचलेच नाही. दहा-बारा शेतकऱ्यांसाठी गावात टाकी बसविण्यात आली आहे. मात्र याचे नियंत्रण योग्य पद्धतीने होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.प्रकल्पाच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बेवारस पडून आहे. याठिकाणी साधा चौकीदारही पहावयास मिळत नाही. ‘लोकमत’चा प्रतिनिधी याठिकाणी गेला असता येथे एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हता. डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची यंत्रणा आता चोरट्यांचे धन बनली आहे. सरकार बदलल्यानंतर पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पाचे काम थांबले आहे. शेतकरी हितात राजकारण आडवे येत असल्याचे दिसते.सहा वर्षांपासून काम रखडलेडेहणी उपसा सिंचन प्रकल्पाचा उद्देश पायदळी तुडविला जात आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे हा उद्देश ठेऊन काँग्रेस सरकारने हा प्रकल्प तयार केला. मात्र मागील सहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. शेतकऱ्यांची मागणी असूनही पाणी दिले जात नाही. कितीतरी अपेक्षा ठेऊन हा प्रकल्प तयार झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधीपण दिला. मात्र भ्रष्ट कारभाराने अजूनही पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले नाही, असे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंजाबराव खोडके यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण