शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

डेहणी सिंचन प्रकल्प अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:29 IST

आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना लाभ नाही : आशिया खंडातील मोठ्या प्रकल्पाची वाताहत, प्रशासनाचे दुर्लक्ष

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन करता यावे यासाठी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. बेंबळा प्रकल्पाला पर्याय म्हणून डेहणी उपसा प्रकल्प काँग्रेसने मंजूर करून पूर्णत्वास आणला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संरक्षित सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक संच देण्याचा निर्णयही घेतला. मात्र नंतर सरकार बदलल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. १९९७ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता पूर्ण होऊनही केवळ जुजबी कारणांमुळे त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. कोट्यवधी रुपयांची यंत्रणा डेहणी येथे बेवारस पडलेली आहे. सिंचन विभागाचे अधिकारी याकडे फिरकून पाहात नाही. केवळ राजकीय वशीला असलेल्या शेतकºयांनाच या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे. उदात्त हेतू ठेऊन नेर तालुक्यातील चिखली, मांगलादेवी, धनज, ब्राह्मणवाडा, टाकळी, कुऱ्हेगाव यासह इतर गावांमध्ये सिंचनासाठी संरक्षित पाणी देण्यावर प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्यापही प्रकल्पाचे पाणी पोहोचलेच नाही. दहा-बारा शेतकऱ्यांसाठी गावात टाकी बसविण्यात आली आहे. मात्र याचे नियंत्रण योग्य पद्धतीने होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.प्रकल्पाच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बेवारस पडून आहे. याठिकाणी साधा चौकीदारही पहावयास मिळत नाही. ‘लोकमत’चा प्रतिनिधी याठिकाणी गेला असता येथे एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हता. डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची यंत्रणा आता चोरट्यांचे धन बनली आहे. सरकार बदलल्यानंतर पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पाचे काम थांबले आहे. शेतकरी हितात राजकारण आडवे येत असल्याचे दिसते.सहा वर्षांपासून काम रखडलेडेहणी उपसा सिंचन प्रकल्पाचा उद्देश पायदळी तुडविला जात आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे हा उद्देश ठेऊन काँग्रेस सरकारने हा प्रकल्प तयार केला. मात्र मागील सहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. शेतकऱ्यांची मागणी असूनही पाणी दिले जात नाही. कितीतरी अपेक्षा ठेऊन हा प्रकल्प तयार झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधीपण दिला. मात्र भ्रष्ट कारभाराने अजूनही पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले नाही, असे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंजाबराव खोडके यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण