शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

डेहणी सिंचन प्रकल्प अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:29 IST

आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना लाभ नाही : आशिया खंडातील मोठ्या प्रकल्पाची वाताहत, प्रशासनाचे दुर्लक्ष

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन करता यावे यासाठी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. बेंबळा प्रकल्पाला पर्याय म्हणून डेहणी उपसा प्रकल्प काँग्रेसने मंजूर करून पूर्णत्वास आणला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संरक्षित सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक संच देण्याचा निर्णयही घेतला. मात्र नंतर सरकार बदलल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. १९९७ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता पूर्ण होऊनही केवळ जुजबी कारणांमुळे त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. कोट्यवधी रुपयांची यंत्रणा डेहणी येथे बेवारस पडलेली आहे. सिंचन विभागाचे अधिकारी याकडे फिरकून पाहात नाही. केवळ राजकीय वशीला असलेल्या शेतकºयांनाच या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे. उदात्त हेतू ठेऊन नेर तालुक्यातील चिखली, मांगलादेवी, धनज, ब्राह्मणवाडा, टाकळी, कुऱ्हेगाव यासह इतर गावांमध्ये सिंचनासाठी संरक्षित पाणी देण्यावर प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्यापही प्रकल्पाचे पाणी पोहोचलेच नाही. दहा-बारा शेतकऱ्यांसाठी गावात टाकी बसविण्यात आली आहे. मात्र याचे नियंत्रण योग्य पद्धतीने होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.प्रकल्पाच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बेवारस पडून आहे. याठिकाणी साधा चौकीदारही पहावयास मिळत नाही. ‘लोकमत’चा प्रतिनिधी याठिकाणी गेला असता येथे एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हता. डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची यंत्रणा आता चोरट्यांचे धन बनली आहे. सरकार बदलल्यानंतर पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पाचे काम थांबले आहे. शेतकरी हितात राजकारण आडवे येत असल्याचे दिसते.सहा वर्षांपासून काम रखडलेडेहणी उपसा सिंचन प्रकल्पाचा उद्देश पायदळी तुडविला जात आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे हा उद्देश ठेऊन काँग्रेस सरकारने हा प्रकल्प तयार केला. मात्र मागील सहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. शेतकऱ्यांची मागणी असूनही पाणी दिले जात नाही. कितीतरी अपेक्षा ठेऊन हा प्रकल्प तयार झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधीपण दिला. मात्र भ्रष्ट कारभाराने अजूनही पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले नाही, असे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंजाबराव खोडके यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण