शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

प्रमाणपत्राने वाढले पालकांचे टेन्शन

By admin | Updated: June 22, 2014 00:11 IST

प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र निकालानंतरच काढण्याची धावपळ पालकांकडून केली जाते. प्रवेशाच्या मुदतीची टांगती तलवार असल्याने अनेक पालकांचे या काळात टेन्शन वाढते.

सेतू सुविधा केंद्र : प्रमाणपत्राचे ५०० अर्ज प्रलंबितयवतमाळ : प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र निकालानंतरच काढण्याची धावपळ पालकांकडून केली जाते. प्रवेशाच्या मुदतीची टांगती तलवार असल्याने अनेक पालकांचे या काळात टेन्शन वाढते. याच संधीचा फायदा घेऊन सेतू सुविधा केंद्राच्या परिसरात आर्थिक लूट केली जाते. बारावीच्या निकालानंतर यवतमाळ तहसीलमध्ये ५०० अर्ज प्रलंबित आहेत. सेतू केंद्राने उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांच्या नावाने जातीच्या प्रमाणपत्राचे प्रस्ताव तयार केले होते. त्यांची बदली झाल्याने सदर प्रस्ताव परत बोलविण्यात आले. नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावाने हे प्रस्ताव तयार केले जात आहे. त्यामुळे येथे जात प्रमाणपत्राचे अर्ज प्रलंबित आहे. या प्रक्रियेत तहसीलच्या ९ क्रमांकाच्या कक्षातील ‘भैया’ची मनमर्जी चालते तर, बरेचदा ‘भगत’ पावत नसल्याने प्रस्ताव अडकून पडतात. उपविभागीय कार्यालयात बेलसरेंचा अडसरही या प्रस्तावांना पार करावा लागतो. ही प्रक्रियाच खऱ्या अर्थाने अनेकांची डोकेदुखी वाढवत आहे. वरिष्ठांकडून पारदर्शक प्रशासनाची ग्वाही दिली जात असली तरी, यांची मर्जी संपादित केल्याशिवाय सहजासहजी कागद पुढे सरकत नाही. शासनाने प्रत्येक प्रमाणपत्रासाठी दर निश्चित केले आहे. विहित मुदतीत ते देण्याचे नियमही घालून दिले आहे. एन वेळेवर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या पालकांकडे निर्धारित वेळेपर्यंत थांबण्याची सवड राहात नाही. याच घिसाडघाईचा फायदा तहसील कार्यालय आणि सेतू सुविधा केंद्र परिसरात बसलेले दलाल उठवतात. अडचण ओळखून या कामासाठी नियुक्त कर्मचारीसुध्दा आपले दर वाढवितात. अशा स्थितीत नियोजनबध्द पध्दतीने काम करणाऱ्या सर्वसामान्य पालकांची मात्र मोठी दमछाक होते. रांग तोडून वशीलेबाजी आणि लाच देऊन काम करून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे येथील यंत्रणा भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. यवतमाळ तहसीलमध्ये जूनचा पहिला आठवडा दलालांसाठी सुगीचा असतो. अधिकारी व कर्मचारी विविध सबबी पुढे करून काम लांबविण्याचा प्रयत्न करतात. विशिष्ट व्यक्तिकडून फाईल आल्यानंतर हातोहात काम करून दिले जाते. यात नियमाच्या अधीन राहून अर्ज करणाऱ्यांना विहीत मुदतीपेक्षा अधिक काळ ताटकळत ठेवले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)