शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

वर्धा नदी खोऱ्यात रेती तस्करांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:18 AM

वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या खोऱ्यात रेती तस्करांची अक्षरश: दहशत पसरली आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे काही बिल्डरांना रेती तस्करांकडून दामदुपटीने रेती पुरविली जात आहे.

ठळक मुद्देलाखो रूपयांचा माल लंपास : महसूल विभागाच्या ‘मधूर’ संबंधाने चोरट्यांची चांदी

मो.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या खोऱ्यात रेती तस्करांची अक्षरश: दहशत पसरली आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे काही बिल्डरांना रेती तस्करांकडून दामदुपटीने रेती पुरविली जात आहे. या विषयात महसूल विभागाने डोळ्यावर पट्ट्या बांधल्या असून तस्करांशी असलेले मधूर संंबंधच रेतीच्या चोरीला चालना देत असल्याचे बोलले जात आहे.रेती घाटांचे लिलाव न्यायालयीन प्रक्रियेत अडकून असल्याने सध्या सर्वत्र रेती टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे सर्वसामान्यांची बांधकामे प्रभावित झाली असली तरी बांधकाम व्यावसायिकांना मात्र सहजरित्या रेती उपलब्ध होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तस्करांनी वणी तालुक्यातून वाहणाºया वर्धा नदीच्या खोºयात अक्षरश: आपला ठिय्या मांडला आहे. दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी या नदीतून केली जात आहे. यासंदर्भात काही गावातील पोलीस पाटलांनी महसूल विभागाला तोंडी माहिती दिली. परंतु महसूल विभागाकडून या तस्करांविरूद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. दिवसा नदीतून रेती पळवायची, त्याचा साठा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस परिसरात करायचा आणि रात्रीच्यावेळी वणी परिसरातून मागणी केलेल्या ठिकाणावर ती रेती पोहोचवायची, असा गोरखधंदाच या तस्करांनी सुरू केला आहे.रेतीघाट सुरू असताना रेतीची किंमत प्रति ब्रास दोन ते अडीच हजार रूपये होती. मात्र रेतीघाट बंद असल्याने चोरीच्या रेतीची किंमत दुप्पट झाली आहे. ज्यांना गरज आहे, ते लोक दामदुप्पट पैसे मोजून रेती खरेदी करीत आहे. वणी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहे. या बांधकामांवर रेती कुठून पुरविली जाते, याची साधी चौकशी करण्याचे सौजन्यदेखिल महसूल विभागाकडून दाखविले जात नाही.महसूल विभागाचे काही कर्मचारीच या तस्करांशी संधान साधून असून वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल करून तस्करांना ते सहकार्य करीत असल्याचे बोलले जात आहे. वणी तालुक्यातून विदर्भा, निगुर्डा व वर्धा या प्रमुख नद्या वाहतात. यंदा सुरूवातीला या नद्यांना पुर आल्याने या नदीत चांगल्या प्रतीची वाळू आली आहे. मात्र अद्याप रेती घाटाचे लिलाव न झाल्याने या नदीतील रेतीचा अधिकृत उपसा बंद आहे. त्यामुळे रेती तस्करांनी सध्या डोकेवर काढले असून चंद्रपूर जिल्ह्यातील काही तस्करांनी या परिसरात आपले एजंट नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून चोरटी रेती पुरविली जाते.‘रात्रीस खेळ चाले’चंद्रपूर जिल्ह्यातील वाळूचे तस्कर वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीतून रेती लंपास करतात. त्याची साठवणूक घुग्गूस येथे केल्यानंतर रात्रीच्या अंधारात ती वाळू वणी परिसरात पोहोचविली जात आहे. मध्यंतरी महसूल विभागाने या तस्करीविरूद्ध पाश आवळले होते. परंतु नंतर कारवाया थंडावल्या.

टॅग्स :sandवाळू