शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

पैनगंगा तीरावरील गावे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:25 AM

रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.

ठळक मुद्देनदी कोरडी : शेतकरी, नागरिकांचा एल्गार, १९ नोव्हेंबरपासून नदी पात्रात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.पैनगंगा नदीवर धरण बांधले तेव्हापासून नदी काठच्या ९० गावांवर मोठे संकट ओढवले आहे. केवळ पावसाळ्यात नदीला पाणी असते. उर्वरित वर्षभर नदी पात्र ठणठणीत राहाते. धरण होण्यापूर्वी नदीला बारमाही पाणी राहात होते. नदीवर आशिया खंडातील क्रमांक दोनचे धरण बांधल्यानंतर नदी कोरडी राहू लागली. शेवटच्या टोकापर्यंत ना नदीचे पाणी पोहोचले, ना कालव्याचे. त्यामुळे काठच्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले. आता तर रब्बी व उन्हाळी हंगाम हातचा जात आहे. पावसाळ्यात पुराचे, तर हिवाळा व उन्हाळा नदी कोरडी असल्याचे संकट, नागरिकांना सोसावे लागत आहे. परिणामी ही नदी शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली.इसापूरचा कालवा तेलंगणा सीमेवर, तर डावा कालवा विदर्भातील उमरखेड तालुक्याच्या शेवटापर्यंतसुद्धा पोहोचला नाही. नदी काठच्या गावातील कालव्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकºयांनी आता पैनगंगेलाच तिसºया कालव्याचा दर्जा देण्याची मागणी केली.इसापूर डाव्या कालवा, कयाधू शाखा कालव्याचे काम त्वरित पूर्ण करून सुरु असलेल्या पाणी पाळ्या नदी पात्रात आवश्यक तेथून सोडून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी पोहोचवा, अशी मागणी केली.नदी काठावरील ९० गावांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावे आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशारा दिला आहे. नदी कोरडी पडल्याने या गावांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावटही पसरणार आहे.

टॅग्स :riverनदी