शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

पैनगंगा तीरावरील गावे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:26 IST

रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.

ठळक मुद्देनदी कोरडी : शेतकरी, नागरिकांचा एल्गार, १९ नोव्हेंबरपासून नदी पात्रात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.पैनगंगा नदीवर धरण बांधले तेव्हापासून नदी काठच्या ९० गावांवर मोठे संकट ओढवले आहे. केवळ पावसाळ्यात नदीला पाणी असते. उर्वरित वर्षभर नदी पात्र ठणठणीत राहाते. धरण होण्यापूर्वी नदीला बारमाही पाणी राहात होते. नदीवर आशिया खंडातील क्रमांक दोनचे धरण बांधल्यानंतर नदी कोरडी राहू लागली. शेवटच्या टोकापर्यंत ना नदीचे पाणी पोहोचले, ना कालव्याचे. त्यामुळे काठच्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले. आता तर रब्बी व उन्हाळी हंगाम हातचा जात आहे. पावसाळ्यात पुराचे, तर हिवाळा व उन्हाळा नदी कोरडी असल्याचे संकट, नागरिकांना सोसावे लागत आहे. परिणामी ही नदी शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली.इसापूरचा कालवा तेलंगणा सीमेवर, तर डावा कालवा विदर्भातील उमरखेड तालुक्याच्या शेवटापर्यंतसुद्धा पोहोचला नाही. नदी काठच्या गावातील कालव्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकºयांनी आता पैनगंगेलाच तिसºया कालव्याचा दर्जा देण्याची मागणी केली.इसापूर डाव्या कालवा, कयाधू शाखा कालव्याचे काम त्वरित पूर्ण करून सुरु असलेल्या पाणी पाळ्या नदी पात्रात आवश्यक तेथून सोडून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी पोहोचवा, अशी मागणी केली.नदी काठावरील ९० गावांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावे आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशारा दिला आहे. नदी कोरडी पडल्याने या गावांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावटही पसरणार आहे.

टॅग्स :riverनदी