शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पैनगंगा तीरावरील गावे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:26 IST

रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.

ठळक मुद्देनदी कोरडी : शेतकरी, नागरिकांचा एल्गार, १९ नोव्हेंबरपासून नदी पात्रात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.पैनगंगा नदीवर धरण बांधले तेव्हापासून नदी काठच्या ९० गावांवर मोठे संकट ओढवले आहे. केवळ पावसाळ्यात नदीला पाणी असते. उर्वरित वर्षभर नदी पात्र ठणठणीत राहाते. धरण होण्यापूर्वी नदीला बारमाही पाणी राहात होते. नदीवर आशिया खंडातील क्रमांक दोनचे धरण बांधल्यानंतर नदी कोरडी राहू लागली. शेवटच्या टोकापर्यंत ना नदीचे पाणी पोहोचले, ना कालव्याचे. त्यामुळे काठच्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले. आता तर रब्बी व उन्हाळी हंगाम हातचा जात आहे. पावसाळ्यात पुराचे, तर हिवाळा व उन्हाळा नदी कोरडी असल्याचे संकट, नागरिकांना सोसावे लागत आहे. परिणामी ही नदी शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली.इसापूरचा कालवा तेलंगणा सीमेवर, तर डावा कालवा विदर्भातील उमरखेड तालुक्याच्या शेवटापर्यंतसुद्धा पोहोचला नाही. नदी काठच्या गावातील कालव्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकºयांनी आता पैनगंगेलाच तिसºया कालव्याचा दर्जा देण्याची मागणी केली.इसापूर डाव्या कालवा, कयाधू शाखा कालव्याचे काम त्वरित पूर्ण करून सुरु असलेल्या पाणी पाळ्या नदी पात्रात आवश्यक तेथून सोडून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी पोहोचवा, अशी मागणी केली.नदी काठावरील ९० गावांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावे आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशारा दिला आहे. नदी कोरडी पडल्याने या गावांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावटही पसरणार आहे.

टॅग्स :riverनदी