शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पैनगंगा तीरावरील गावे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:26 IST

रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.

ठळक मुद्देनदी कोरडी : शेतकरी, नागरिकांचा एल्गार, १९ नोव्हेंबरपासून नदी पात्रात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.पैनगंगा नदीवर धरण बांधले तेव्हापासून नदी काठच्या ९० गावांवर मोठे संकट ओढवले आहे. केवळ पावसाळ्यात नदीला पाणी असते. उर्वरित वर्षभर नदी पात्र ठणठणीत राहाते. धरण होण्यापूर्वी नदीला बारमाही पाणी राहात होते. नदीवर आशिया खंडातील क्रमांक दोनचे धरण बांधल्यानंतर नदी कोरडी राहू लागली. शेवटच्या टोकापर्यंत ना नदीचे पाणी पोहोचले, ना कालव्याचे. त्यामुळे काठच्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले. आता तर रब्बी व उन्हाळी हंगाम हातचा जात आहे. पावसाळ्यात पुराचे, तर हिवाळा व उन्हाळा नदी कोरडी असल्याचे संकट, नागरिकांना सोसावे लागत आहे. परिणामी ही नदी शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली.इसापूरचा कालवा तेलंगणा सीमेवर, तर डावा कालवा विदर्भातील उमरखेड तालुक्याच्या शेवटापर्यंतसुद्धा पोहोचला नाही. नदी काठच्या गावातील कालव्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकºयांनी आता पैनगंगेलाच तिसºया कालव्याचा दर्जा देण्याची मागणी केली.इसापूर डाव्या कालवा, कयाधू शाखा कालव्याचे काम त्वरित पूर्ण करून सुरु असलेल्या पाणी पाळ्या नदी पात्रात आवश्यक तेथून सोडून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी पोहोचवा, अशी मागणी केली.नदी काठावरील ९० गावांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावे आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशारा दिला आहे. नदी कोरडी पडल्याने या गावांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावटही पसरणार आहे.

टॅग्स :riverनदी