शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

वादग्रस्त गाळे रिकामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 10:01 PM

शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवणीच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ : नगरविकास मंत्रालयाने दिला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.हा आदेश सोमवारपर्यंत वणी नगरपालिकेकडे पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निर्णयामुळे वणीतील संबंधित व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून या निर्णयावर स्थगनादेश आणण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. संबंधित १६० गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका नगरसेवक पी.के.टोंगे यांनी दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकासमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर नगरविकासमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी संबंधित व्यापारी, याचिकाकर्ते पी.के.टोंगे व पालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर ना.रणजित पाटील यांनी याप्रकरणावर निकाल देत सदर १६० गाळे तातडीने रिकामे करून घेण्याचा आदेश नगरपालिकेला बजावला आहे.वणी नगरपरिषदेच्या शिट क्रमांक १९ (अ) व १९ (ब) मधील जमीन मध्यप्रदेश सरकारने २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिफारशीवरून वणी नगरपरिषदेला हस्तांतरीत केली होती. त्यानंतर नगरपालिकेने २५ हजार ५०० चौरस फूट जागेवर १६० गाळ्यांचे बांधकाम केले. १९९५६ साली या गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर निवार्सीतांकरिता ३० रूपये व इतरांकरिता १०० ते ३०० रूपयापर्यंत वार्षिक भाडे आकारून गाळ्यांचे वाटप करण्यात आले. वेळोवेळी अल्प प्रमाणात या भाड्यात वाढ करण्यात आली. २०१२ मध्ये ही वाढ तीनपट झाली. भाडेवाढीसंदर्भात पी.के.टोंगे यांनी २०१४ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यात टोंगे यांना प्रादेशिक संचालक न.प.प्रशासन अमरावती व जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा संदर्भ दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी गाळेधारकाकडून सदर गाळे रिकामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु गाळेधारक नंदकिशोर खत्री व सुभाष गेलडा यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच काळात शिवलामल शुगवाणी व गुरूमुख केशवानी यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपिल दाखल केली होती. त्यावर निर्णय होऊन गाळेधारकांना गाळ्यांचे मुल्यांकन करून भाड्याची आकारणी करावी व ३० वर्षाकरिता ते गाळे त्याच व्यापाºयांना भाडे पट्ट्यावर देण्यात यावे, असे आदेश सन २०१५ मध्ये देण्यात आले होते. त्याविरोधात पी.के.टोंगे यांनी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली. त्यावरून उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नगरविकासमंत्र्यांना दिले होते.

टॅग्स :ministerमंत्री