शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पाच महिन्यांनंतर निघाले १५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

ठराविक उपविभाग, पोलीस ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांची अचूक निवड करून बदली करण्यात आली. समुपदेशन प्रक्रिया जिल्हा आस्थापना मंडळापुढे घेण्यात आली. ११ ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान आज्ञांकित कक्षात हजर राहिलेल्या पोलीस अंमलदारांचे म्हणणे व गाऱ्हाने ऐकून घेतले. मात्र, त्यानंतर आस्थापना मंडळाला अंतिम निर्णयासाठी सवडच मिळाली नाही की इतर कुठल्या कारणाने ही प्रक्रिया रखडली हे गुलदस्तात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांची भूतो न भविष्य तो अशी बदली प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या एकूणच कार्यशैलीचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. प्रशासकीय बदल्यांचे आदेश जाहीर झाले. मात्र, विनंती बदलीची प्रक्रिया तशीच रखडली. सप्टेंबर २०२१ मध्ये समुपदेशन झाले होते. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी बदलीचा आदेश निघाला आहे. ठराविक उपविभाग, पोलीस ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांची अचूक निवड करून बदली करण्यात आली. समुपदेशन प्रक्रिया जिल्हा आस्थापना मंडळापुढे घेण्यात आली. ११ ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान आज्ञांकित कक्षात हजर राहिलेल्या पोलीस अंमलदारांचे म्हणणे व गाऱ्हाने ऐकून घेतले. मात्र, त्यानंतर आस्थापना मंडळाला अंतिम निर्णयासाठी सवडच मिळाली नाही की इतर कुठल्या कारणाने ही प्रक्रिया रखडली हे गुलदस्तात आहे. अखेर आस्थापना मंडळाच्या अहवालावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ७ मार्च रोजी बदल्यांचा आदेश जारी केला. यामध्ये ३९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील १५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सात जणांना एक वर्षाची आहे त्याच जागेवर मुदतवाढ देण्यात आली. तर, १७ जणांनी बदली रद्द करावी, विनंती बदली मिळावी अशी आर्जव आस्थापना मंडळापुढे केली होती. आस्थापना मंडळाने या कर्मचाऱ्यांची आर्जव फेटाळून लावली आहे. त्यांना आहे त्याच ठिकाणी काम करावे लागणार आहे. मात्र, बदली आदेश निघाल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता विनंतीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता तरी हे कर्मचारी कार्यमुक्त होतील का, आदेशाची अंमलबजावणी केली जाईल का, अशा एक ना अनेक शंका पोलीस वर्तुळातून व्यक्त केल्या जात आहे.

बदलीच्या आदेशाने अनेकांची वाढली धाकधूक- पोलीस अधीक्षक जिल्ह्यात आल्यापासून मक्तेदारी गाजविणाऱ्या पाेलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. संघटित गुन्हेगारीवरही वचक आहे. सततचे खुनाचे सत्र सुरू असून आरोपी अटक होत आहे. चाेरीचे गुन्हे शोधण्यात पोलीस माघारले आहे. बदली झाल्यानंतरही आहे त्याच ठिकाणी कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता नव्या आदेशाने धाकधूक वाढली आहे. त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर अनेक जण रजेवर जाण्याच्या तयारीत आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली