शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जिल्ह्यात एसटी महामंडळात दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच मार्गावर जावू नये, असे परिपत्रक अलीकडेच काढण्यात आले आहे.

ठळक मुद्देपरिपत्रक अंमलबजावणी : मर्जीतील कर्मचाऱ्यांवर मेहेरबानी, विभाग नियंत्रकांचे हवे नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचे दिसून येते. विशिष्ट लोकांसाठी परिपत्रकाचा वापर कठोरतेने होत आहे, तर मर्जीतील लोकांवर मेहेरबानी दाखविली जात असल्याची ओरड आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रकार नियंत्रणात आणावा, अशी अपेक्षा अन्यायग्रस्त कर्मचाºयांकडून होत आहे.गेली काही दिवसांपासून महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा कारभार बेताल सुरू आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. या सर्व प्रकारात महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. विभागीय कार्यालयातील अनेक शाखांमधील कामकाज अक्षरश: ढकलले जात आहे. हिशेबात चुका करून काही लोकांना जादा रक्कम दिल्याचे प्रकार घडत आहे. यावर कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांमधील दिरंगाईचा प्रकार झपाट्याने वाढत आहे.महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच मार्गावर जावू नये, असे परिपत्रक अलीकडेच काढण्यात आले आहे. या परिपत्रकाचे अधिकाऱ्यांनी स्वागत करताना एकाच मार्गावर जाणाऱ्या काही लोकांचा रूट बदलविला. मात्र दुसरीकडे विशिष्ट लोकांना यातून सूट देण्यात आली. यवतमाळ-नांदेड, यवतमाळ-औरंगाबाद यासह काही ठिकाणच्या रात्रमुक्कामी बसेसवर तेच ते कर्मचारी ड्यूटीवर जात आहे.या बाबी विभागीय कार्यालयाच्या निदर्शनास कशा येत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विभागीय कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांकडूनही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाई केली जाते. पांढरकवडा प्रशिक्षण केंद्रातील प्रकाराने ही बाब स्पष्ट झाली आहे. आर्थिक देवाणघेवाण प्रकरणात लिपिकाला निलंबित करण्यात आले. एका अधिकाऱ्याचे नाव स्पष्टपणे घेतले जात असतानाही कारवाई करण्यात आलेली नाही. लहान कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण यवतमाळ विभागातील अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.यवतमाळात ‘बसफेऱ्या रद्द’चा आजारयवतमाळ आगारातील अनेक बसफेऱ्या रद्द केल्या जात आहे. तिकीट मशीनचा तुटवडा, बसेसची अपुरी संख्या, चालक-वाहक उपलब्ध नसणे आदी कारणे या मागे सांगितली जातात. वास्तविक ही सर्व परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. आगारात अनेक बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतात. त्या दुरुस्त करून घेण्यात संबंधित अधिकाऱ्यांची इच्छाशक्तीच नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :state transportएसटी