शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

जिल्ह्यात एसटी महामंडळात दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच मार्गावर जावू नये, असे परिपत्रक अलीकडेच काढण्यात आले आहे.

ठळक मुद्देपरिपत्रक अंमलबजावणी : मर्जीतील कर्मचाऱ्यांवर मेहेरबानी, विभाग नियंत्रकांचे हवे नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचे दिसून येते. विशिष्ट लोकांसाठी परिपत्रकाचा वापर कठोरतेने होत आहे, तर मर्जीतील लोकांवर मेहेरबानी दाखविली जात असल्याची ओरड आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रकार नियंत्रणात आणावा, अशी अपेक्षा अन्यायग्रस्त कर्मचाºयांकडून होत आहे.गेली काही दिवसांपासून महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा कारभार बेताल सुरू आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. या सर्व प्रकारात महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. विभागीय कार्यालयातील अनेक शाखांमधील कामकाज अक्षरश: ढकलले जात आहे. हिशेबात चुका करून काही लोकांना जादा रक्कम दिल्याचे प्रकार घडत आहे. यावर कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांमधील दिरंगाईचा प्रकार झपाट्याने वाढत आहे.महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच मार्गावर जावू नये, असे परिपत्रक अलीकडेच काढण्यात आले आहे. या परिपत्रकाचे अधिकाऱ्यांनी स्वागत करताना एकाच मार्गावर जाणाऱ्या काही लोकांचा रूट बदलविला. मात्र दुसरीकडे विशिष्ट लोकांना यातून सूट देण्यात आली. यवतमाळ-नांदेड, यवतमाळ-औरंगाबाद यासह काही ठिकाणच्या रात्रमुक्कामी बसेसवर तेच ते कर्मचारी ड्यूटीवर जात आहे.या बाबी विभागीय कार्यालयाच्या निदर्शनास कशा येत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विभागीय कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांकडूनही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाई केली जाते. पांढरकवडा प्रशिक्षण केंद्रातील प्रकाराने ही बाब स्पष्ट झाली आहे. आर्थिक देवाणघेवाण प्रकरणात लिपिकाला निलंबित करण्यात आले. एका अधिकाऱ्याचे नाव स्पष्टपणे घेतले जात असतानाही कारवाई करण्यात आलेली नाही. लहान कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण यवतमाळ विभागातील अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.यवतमाळात ‘बसफेऱ्या रद्द’चा आजारयवतमाळ आगारातील अनेक बसफेऱ्या रद्द केल्या जात आहे. तिकीट मशीनचा तुटवडा, बसेसची अपुरी संख्या, चालक-वाहक उपलब्ध नसणे आदी कारणे या मागे सांगितली जातात. वास्तविक ही सर्व परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. आगारात अनेक बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतात. त्या दुरुस्त करून घेण्यात संबंधित अधिकाऱ्यांची इच्छाशक्तीच नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :state transportएसटी