शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला केवळ पाच लाख

By admin | Updated: January 7, 2016 02:57 IST

शेतकऱ्यांना खरिपातील मदत म्हणून जाहीर झालेल्या दोन हजार कोटींच्या अर्थसहाय्यात महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्याला...

शेतकऱ्यांची घोर निराशा : सर्वाधिक आत्महत्या, सर्वात कमी मदत यवतमाळ : शेतकऱ्यांना खरिपातील मदत म्हणून जाहीर झालेल्या दोन हजार कोटींच्या अर्थसहाय्यात महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्याला केवळ पाच लाख रुपये मिळाले आहे. या तुटपुंज्या मदतीने जिल्ह्यातील सत्ताधारी भाजपाच्या पाचही आमदारांचे युती सरकारमध्ये नेमके किती ‘वजन’ आहे, ही बाबसुद्धा उघड झाली आहे. ज्या महसूल खात्याच्या अहवालावर शेतकऱ्यांना मदत निश्चित होते, त्या खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यालाच अर्थसहाय्यापासून वंचित ठेवले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या मदतीने जखमेवर मीठ चोळले गेलेले शेतकरी संतप्त आहेत. शासनाने राज्याच्या २१ जिल्ह्यातील १५ हजार ७४७ गावच्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटींचे अर्थसहाय मंजूर केले. त्यात अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्याला सर्वाधिक १८३ कोटी, अकोला सात कोटी रुपये मिळाले. यवतमाळला मात्र त्यातून केवळ पाच कोटी रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा हा आकडा ऐकून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मदतीचा हा पहिला टप्पा असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. मात्र जेव्हा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची ओरड सुरू होती, त्यावेळी पालकमंत्री मात्र पीक परिस्थिती ‘आलबेल’ दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळेच नजर पीक आणेवारीत केवळ दोन गावात दुष्काळ दाखविला गेला. त्याचाच फटका पहिल्या टप्प्यातील या मदतीत बसल्याचे मानले जाते. सुरुवातीला केवळ दोन गावात दुष्काळ दाखविला गेला आज मात्र संपूर्ण जिल्हाच दुष्काळात असल्याचे सिद्ध झाले. महसूल यंत्रणेच्या नजर व अंतरिम पीक आणेवारीच्या प्रामाणिकतेवर सर्वच घटकांकडून संशय व्यक्त केला जात होता. तो आता संपूर्ण जिल्ह्याची पीक आणेवारी ४६ टक्के आल्याने खरा ठरला आहे. संपूर्ण जिल्हाच दुष्काळात असताना शासनाने मदत वाटपाचे टप्पे पाडून काय साध्य केले असा सवाल केला जात आहे. जिल्ह्यातील खरीप हंगाम बुडाला. सोयाबीन हातचे गेले, कापसाचे पीक अर्ध्यावर आले. आता तुरीला भाव नाही. सुरुवातीला नजर आणेवारीत केवळ दोन गावात दुष्काळ दाखविण्यात आली होती. त्यावर समाजातील सर्वच घटकांकडून तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर अंतरिम आणेवारी आठ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून समावेशीत केले गेले. तरीही दुष्काळावरील ओरड कायम असल्याने अखेर ३१ डिसेंबरच्या अंतिम आणेवारीत संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित केला गेला. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ४६ टक्के आहे. सर्व १६ तालुक्यातील पीक आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने काही शेतकरी रबी हंगामाकडे वळले होते. मात्र त्यांना ओलितासाठी पाणी नाही. कुठे पाणी आहे तर वीज नाही, धरण आहे तर कालवे नाही आणि कालवे आहे तर टेलपर्यंत पाणी पोहोचत नाही, अशी जिल्ह्यातील सिंचनाची एकूण अवस्था आहे. (जिल्हा प्रतिनिधी)