शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

प्रज्ञाशोध परीक्षेत ९४ हजारपैकी फक्त ७७६ विद्यार्थी पात्र; महाराष्ट्राची पिछेहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:53 IST

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय परीक्षेत लागणार दहावीच्या विद्यार्थ्यांचा कस

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीची परीक्षा येत्या ३ मार्चपासून आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहे. आता मे महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची मदत देता यावी, याकरिता ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. तत्पूर्वी प्रत्येक राज्याचा कोटा ठरवून राज्यपातळीवर परीक्षा घेऊन त्यातून प्रवर्गनिहाय विद्यार्थी निवडले जातात. त्यानुसार यंदा दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती.गुरुवारी राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार, सर्वसाधारण प्रवर्गातून ३१४, इतर मागास प्रवर्गातून २११, अनुसूचित जाती प्रवर्गातून ११६, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ५८ आणि आर्थिक दुर्बल घटकातून ७७ असे एकंदर ७७६ विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. आता १० मे रोजी एनसीईआरटीतर्फे देशपातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीसाठी १२५० रुपये तर त्यानंतर पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडीपर्यंत २००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देशभरातून केवळ २००० विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र ठरले होते. त्यातील २६२ विद्यार्थी महाराष्ट्राचे होते, हे विशेष.यवतमाळला मिळाला भोपळाराज्यस्तरावर झालेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत यवतमाळातील एकही विद्यार्थी पात्र ठरू शकलेला नाही. तर विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी काहीअंशी स्थान मिळविले आहे. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक ४२ विद्यार्थी देशपातळीवर होणाºया परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थी