शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

प्रज्ञाशोध परीक्षेत ९४ हजारपैकी फक्त ७७६ विद्यार्थी पात्र; महाराष्ट्राची पिछेहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:53 IST

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय परीक्षेत लागणार दहावीच्या विद्यार्थ्यांचा कस

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीची परीक्षा येत्या ३ मार्चपासून आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहे. आता मे महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची मदत देता यावी, याकरिता ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. तत्पूर्वी प्रत्येक राज्याचा कोटा ठरवून राज्यपातळीवर परीक्षा घेऊन त्यातून प्रवर्गनिहाय विद्यार्थी निवडले जातात. त्यानुसार यंदा दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती.गुरुवारी राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार, सर्वसाधारण प्रवर्गातून ३१४, इतर मागास प्रवर्गातून २११, अनुसूचित जाती प्रवर्गातून ११६, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ५८ आणि आर्थिक दुर्बल घटकातून ७७ असे एकंदर ७७६ विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. आता १० मे रोजी एनसीईआरटीतर्फे देशपातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीसाठी १२५० रुपये तर त्यानंतर पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडीपर्यंत २००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देशभरातून केवळ २००० विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र ठरले होते. त्यातील २६२ विद्यार्थी महाराष्ट्राचे होते, हे विशेष.यवतमाळला मिळाला भोपळाराज्यस्तरावर झालेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत यवतमाळातील एकही विद्यार्थी पात्र ठरू शकलेला नाही. तर विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी काहीअंशी स्थान मिळविले आहे. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक ४२ विद्यार्थी देशपातळीवर होणाºया परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थी