शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चार एकरात झाले फक्त ५० किलो सोयाबीनचे उत्पादन, शेतकऱ्याला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 23:16 IST

Yavatmal News : घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती.

घाटंजी (यवतमाळ)  - चार एकर सोयाबीनची सोंगणी केल्यावर फक्त ५० किलो पीक हाती आले. त्यामुळे हादरुन गेलेल्या शेतक-याने थेट जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिका-यांना फोन करून शेतात येण्याची विनंती केली. ‘तुम्ही येऊन पाहणी केली नाही तर जागीच जीवाचे बरेवाईट करेल’, असे सांगताच अधिका-यांनी तासाभरात शेत गाठले.घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती. बुधवारी सोंगणीसाठी मशीन बोलाविले. मात्र शेंगांमध्ये दाणेच नसल्याने मशीनवाल्यानेही सोंगणीस नकार दिला. हातपाय जोडून कसेबसे काम सुरू झाले तर शेंगातून दाणे पडण्याऐवजी केवळ टरफले उडू लागली. संपूर्ण सोयाबीनचे कुटार झाले आणि केवळ ५० किलो दाणे शेतकºयाच्या हाती आले. हे पाहून सागर जागीच कोसळला. त्याने थेट तालुका कृषी अधिकाºयाला फोन करून शेतात बोलविले. तालुका कृषी अधिकारी आल्यावर त्यांनाही नुकसान पाहून दु:ख झाले. मात्र सध्याच सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आम्हाला आदेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सागर अधिकच घाबरला. त्याने जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांना फोन लावून शेतात बोलाविले. तोपर्यंत गावकरीही सागरच्या शेतात जमले होते. जिल्हा कृषी अधिकारी येईपर्यंत तालुका कृषी अधिकाºयांना जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. अखेर सायंकाळी ५ वाजता जिल्हा कृषी अधिकारी आले. शेतक-याचे खरोखरच नुकसान झाले असून याबाबत शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. 

 एका-एका झाडाला २०० ते ३०० शेंगा होत्या. मात्र त्यात दाणेच भरले नाही. ही चूक कुणाची याचे उत्तर शासनाने आणि कंपन्यांनी द्यावे. तातडीने नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. - सागर देऊळकरशेतकरी, कोपरी

टॅग्स :Yavatmalयवतमाळagricultureशेती