शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

चार एकरात झाले फक्त ५० किलो सोयाबीनचे उत्पादन, शेतकऱ्याला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 23:16 IST

Yavatmal News : घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती.

घाटंजी (यवतमाळ)  - चार एकर सोयाबीनची सोंगणी केल्यावर फक्त ५० किलो पीक हाती आले. त्यामुळे हादरुन गेलेल्या शेतक-याने थेट जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिका-यांना फोन करून शेतात येण्याची विनंती केली. ‘तुम्ही येऊन पाहणी केली नाही तर जागीच जीवाचे बरेवाईट करेल’, असे सांगताच अधिका-यांनी तासाभरात शेत गाठले.घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती. बुधवारी सोंगणीसाठी मशीन बोलाविले. मात्र शेंगांमध्ये दाणेच नसल्याने मशीनवाल्यानेही सोंगणीस नकार दिला. हातपाय जोडून कसेबसे काम सुरू झाले तर शेंगातून दाणे पडण्याऐवजी केवळ टरफले उडू लागली. संपूर्ण सोयाबीनचे कुटार झाले आणि केवळ ५० किलो दाणे शेतकºयाच्या हाती आले. हे पाहून सागर जागीच कोसळला. त्याने थेट तालुका कृषी अधिकाºयाला फोन करून शेतात बोलविले. तालुका कृषी अधिकारी आल्यावर त्यांनाही नुकसान पाहून दु:ख झाले. मात्र सध्याच सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आम्हाला आदेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सागर अधिकच घाबरला. त्याने जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांना फोन लावून शेतात बोलाविले. तोपर्यंत गावकरीही सागरच्या शेतात जमले होते. जिल्हा कृषी अधिकारी येईपर्यंत तालुका कृषी अधिकाºयांना जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. अखेर सायंकाळी ५ वाजता जिल्हा कृषी अधिकारी आले. शेतक-याचे खरोखरच नुकसान झाले असून याबाबत शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. 

 एका-एका झाडाला २०० ते ३०० शेंगा होत्या. मात्र त्यात दाणेच भरले नाही. ही चूक कुणाची याचे उत्तर शासनाने आणि कंपन्यांनी द्यावे. तातडीने नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. - सागर देऊळकरशेतकरी, कोपरी

टॅग्स :Yavatmalयवतमाळagricultureशेती