शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चार एकरात झाले फक्त ५० किलो सोयाबीनचे उत्पादन, शेतकऱ्याला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 23:16 IST

Yavatmal News : घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती.

घाटंजी (यवतमाळ)  - चार एकर सोयाबीनची सोंगणी केल्यावर फक्त ५० किलो पीक हाती आले. त्यामुळे हादरुन गेलेल्या शेतक-याने थेट जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिका-यांना फोन करून शेतात येण्याची विनंती केली. ‘तुम्ही येऊन पाहणी केली नाही तर जागीच जीवाचे बरेवाईट करेल’, असे सांगताच अधिका-यांनी तासाभरात शेत गाठले.घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती. बुधवारी सोंगणीसाठी मशीन बोलाविले. मात्र शेंगांमध्ये दाणेच नसल्याने मशीनवाल्यानेही सोंगणीस नकार दिला. हातपाय जोडून कसेबसे काम सुरू झाले तर शेंगातून दाणे पडण्याऐवजी केवळ टरफले उडू लागली. संपूर्ण सोयाबीनचे कुटार झाले आणि केवळ ५० किलो दाणे शेतकºयाच्या हाती आले. हे पाहून सागर जागीच कोसळला. त्याने थेट तालुका कृषी अधिकाºयाला फोन करून शेतात बोलविले. तालुका कृषी अधिकारी आल्यावर त्यांनाही नुकसान पाहून दु:ख झाले. मात्र सध्याच सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आम्हाला आदेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सागर अधिकच घाबरला. त्याने जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांना फोन लावून शेतात बोलाविले. तोपर्यंत गावकरीही सागरच्या शेतात जमले होते. जिल्हा कृषी अधिकारी येईपर्यंत तालुका कृषी अधिकाºयांना जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. अखेर सायंकाळी ५ वाजता जिल्हा कृषी अधिकारी आले. शेतक-याचे खरोखरच नुकसान झाले असून याबाबत शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. 

 एका-एका झाडाला २०० ते ३०० शेंगा होत्या. मात्र त्यात दाणेच भरले नाही. ही चूक कुणाची याचे उत्तर शासनाने आणि कंपन्यांनी द्यावे. तातडीने नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. - सागर देऊळकरशेतकरी, कोपरी

टॅग्स :Yavatmalयवतमाळagricultureशेती