शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

रबीचे कर्जवाटप केवळ १० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:34 IST

खरिपात पीककर्ज वाटप करताना आखडता हात घेणाऱ्या बँकांनी रबीच्या कर्जवाटपातही उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळे रबीची जवळपास संपूर्ण पेरणी आटोपल्यावरही कर्जवाटपाचे प्रमाण केवळ १० टक्केच आहे.

ठळक मुद्देक्षेत्र दोन लाख हेक्टर : बँकांनी दुष्काळाची केली ढाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरिपात पीककर्ज वाटप करताना आखडता हात घेणाऱ्या बँकांनी रबीच्या कर्जवाटपातही उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळे रबीची जवळपास संपूर्ण पेरणी आटोपल्यावरही कर्जवाटपाचे प्रमाण केवळ १० टक्केच आहे.रबी हंगामात जिल्ह्यातील बँकांना ६४ कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. मात्र प्रत्यक्षात दोन लाख हेक्टरवर पेरणी झाल्यावरही बँकांनी केवळ सात कोटींचेच कर्ज वाटप केले आहे. या स्थितीत आपल्यावर आरोप होऊ नये म्हणून बँकांनी सावध पवित्रा घेतला आहे. दुष्काळी स्थितीने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे कारण बँकांकडून दिले जात आहे.दरवर्षी दोन लाख हेक्टरवर रबीची पेरणी होते. रबीचे पीक कर्ज वितरित करण्यासाठी निधी राखीव ठेवला जातो. प्रत्यक्षात कर्ज वितरित करताना हात आखडता घेतला गेला. यामुळे खरिपापेक्षाही कमी क्षेत्रावरच पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.उद्दिष्ट ६४ कोटीचे वाटप ७ कोटीयावर्षी ६४ कोटीचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ट बँकांना देण्यात आले होते. ऊस लागवड क्षेत्रातच सर्वाधिक कर्ज शेतकऱ्यांनी घेतले. आतापर्यंत केवळ सात कोटींचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. जिल्हा बँकेने ३८ सभासदांना १९ लाखाचे कर्ज दिले. तर राष्ट्रीयकृत बँकांनी ६९४ सभासदांना सहा कोटी ९६ लाखांचे कर्ज वितरित केले.खरिपाचे कर्ज न फेडल्याचा परिणामखरिपातील पीक कर्जासाठी अधिक निधी दिला जातो. त्या तुलनेत रबीच्या पीक कर्जाची रक्कम कमी आहे. यामुळे शेतकरी रबीचे कर्ज घेत नाही. खरिपातील पीक कर्जाची परतफेड झाली तरच रबीचे कर्ज दिले जाईल, अशी अट बँकांनी घातली आहे. खरिपाच्या कर्ज परतफेडीचा नील दाखला दिल्याशिवाय रबीच्या कर्जाचा प्रस्ताव विचारात घेतला जात नाही. शेतकरी विरोधी भूमिका बँका राबवित आहेत. याच मुळे केवळ दहा टक्के कर्ज वाटप झाले आहे.