शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

महाआवास योजनेतील दोन लाख घरकुलांची ऑनलाइन नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:37 IST

प्रशासन आले ॲक्शन मोडवर : सीईओ सोमवारपासून चार दिवस दौऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना घरकुल देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. त्याचे २०१८, २०१९ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यात सव्वा दोन लाख कुटुंबे बेघर असल्याची बाब सर्वेक्षणातून पुढे आली होती. या घरकुल धारकांना टप्याटप्याने घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र, हे प्रमाण अत्यल्प आहे. यातून केंद्र शासनाने राज्यात महाआवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात मोठ्या प्रमाणात एकाचवेळी घरकुल बांधण्यासाठी मंजुरी दिली जाणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर अंमलबजावणी करीत आहे.

पूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार दोन लाख ७५ हजार ६३२ लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील आहेत. ज्यांना अजूनपर्यंत राहण्यासाठी घरे नाहीत. यातील दोन लाख २५ हजार लाभार्थी वेटिंग लिस्टवर होते. या लाभार्थ्यांना प्रारंभी २०२१, २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यातील घरकुल मंजूर झाले होते. सप्टेंबर २०२४, २०२५ मध्ये दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. आता तिसरा टप्पा महाआवासच्या माध्यमातून मंजूर होणार आहे. 

सप्टेंबर २०२४ मध्ये ५० हजार घरकुले मंजूर करण्यात आली. महाआवासमधून एक लाख पाच घरकुले मंजूर होण्याची शक्यता आहे. यातून घरकुलांना मंजुरी मिळाली तर त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वळते करता यावेत म्हणून यंत्रणा अॅक्शन मोडवर आहे. त्यासाठी गावपातळीवरून लाभार्थ्यांच्या नावाची कागदपत्रे गोळा केली जात आहेत. यात आठ अ, आधारकार्ड, जॉबकार्ड, बैंक पासबुक आदी बाबींची कागदपत्रे गोळा केली जातात. यात ज्या लाभार्थ्यांच्या खात्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी जीओ टॅगिंगची प्रक्रिया देखील केली जात आहे. यामुळे त्यासाठी गाव पातळीवरून विविध फाइल गोळा केल्या जात आहेत. 

दरदिवसाला चार तालुक्यांचे उद्दिष्ट महाआवास योजनेतील घरकुलांची कागदपत्रे आणि ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया योग्य झाली किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की सोमवारपासून चार दिवस दौऱ्यावर आहेत. ते दर दिवसाला चार तालुक्यांतील कागदपत्रांची पाहणी करणार आहेत. याशिवाय काही गावांना भेटी देणार आहेत.

शनिवार, रविवारी ऑनलाइन प्रक्रिया लाभार्थ्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याचे काम शनिवारी आणि रविवारी ग्रामसेवकांनी गाव पातळीवर पार पाडले. याशिवाय तालुका स्तरावर देखील ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचे काम सुरू होते. संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे.

गृहनिर्माण अधिकारी ऑन फिल्ड

  • घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या नावाची ऑनलाइन यादी तयार होत असताना प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या जागेची पाहणी केली जात आहे. त्यासाठी गृहनिर्माण अधिकारी ऑनलाइन जीओ टॅगिंग करीत आहेत. हे गृहनिर्माण अधिकारी ऑन फिल्ड होते. 
  • शासनाने महाआवास योजना हाती घेतल्याने अनेक वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय ऑनलाइन नोंदणी झालेले लाभार्थी तालुका           लाभार्थी आर्णी               १२,९४० बाभुळगाव        ६,८२३ दारव्हा             १६,९८७ दिग्रस              १२,३८९ घाटंजी             ११,७६४ कळंब              ५,९३५ केळापूर            १०,१७५ महागाव            २१,६३३ मारेगाव             ३,९४३ नेर                   ९,३७५ पुसद                ३६,०६४ राळेगाव             ८,७०७ उमरखेड           २६,१२४ वणी                  ६,४९३ यवतमाळ           ९,४१८ झरी                  ५,३२४ एकूण              २,०४,०९४ 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ