शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

कांदा, लसूण आणि आलू अजूनही तेजच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

टमाटर उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीकरिता येणाऱ्या टमाटरला मजुरीचे पैसे निघणेही अवघड आहे. १० रूपयात दोन किलो टमाटर बाजारात विक ले जात आहे. कॅरेटला २० ते ५० रूपयांचाच दर मिळत आहे. मजुरीचे दर मात्र शंभर ते सव्वाशे रुपये आहे. यामुळे टमाटर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे.

ठळक मुद्देभाजीपाला मात्र घसरला : शेतकरी पेचात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इतर ठिकाणावरून आयात झालेला कांदा, लसूण आणि आलूचे दर तेज आहेत. तर रबीच्या हंगामात जिल्ह्यातील भाजीपाला क्षेत्रात लागवड वाढली. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला आहे. भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात यावर्षी टमाटर, कोबी, पालक, मेथी आणि वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हा भाजीपाला बाजारात आला आहे. एकाच वेळी मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे.टमाटर उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीकरिता येणाऱ्या टमाटरला मजुरीचे पैसे निघणेही अवघड आहे. १० रूपयात दोन किलो टमाटर बाजारात विक ले जात आहे. कॅरेटला २० ते ५० रूपयांचाच दर मिळत आहे. मजुरीचे दर मात्र शंभर ते सव्वाशे रुपये आहे. यामुळे टमाटर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे.अशीच अवस्था वांग्याची आहे. मागणीच्या तुलनेत वांग्यांची आवक वाढली आहे. ५० रूपयाला २० किलो वांग्याची पन्नी विकली जात आहे. कोथिंबीरीचे दरही असेच पडले आहेत. यामुळे बेभाव भाजीपाला विकला जात आहे. एक कट्टा कोबी केवळ ८० ते १०० रूपयाला विकली जात आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहे आहे.आयातीचा परिणामकांदा, लसूृण आणि आलू बाजारात सर्वाधिक तेज आहे. विशेष म्हणजे त्यांची इतर ठिकाणावरून आयात करण्यात आली आहे. कांदा ५० रूपये किलोने विकला जात आहे. लसूण २०० रूपये किलो, तर आलू ३० रूपये कि लोच्या घरात आहे.

टॅग्स :vegetableभाज्या