शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

एक हजार शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता

By admin | Updated: August 1, 2016 00:49 IST

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरण्याचा ऐतिहासिक निर्णय २०१४च्या हिवाळी ...

सव्वा कोटींचा दिलासा : जिल्हास्तरीय समितीकडून आदेश पारित यवतमाळ : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरण्याचा ऐतिहासिक निर्णय २०१४च्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा निबंधक यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावापैकी एक कोटी १४ लाख रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले आहे. यामुळे १०८७ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊन त्यांची सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. त्यासोबतच सावकराकडे असलेले तारणही परत मिळणार आहे. नोंदणीकृत सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेले संपूर्ण कर्ज आणि त्यावरील व्याज या योजनेंतर्गत सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांचे सावकारांकडे असलेले तारण परत करण्यात येऊन सावकाराकडून त्यासंबंधीचे हमीपत्र सादर करावे लागत आहे. जिल्ह्यातील १०१ परवानाधारक सावकारापैकी ९१ सावकारांनी सात हजार ५७६ शेतकऱ्यांचे सहा कोटी ४१ लाख ३२ हजाराचे प्रस्ताव सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल केले आहे. यापैकी तालुकास्तरीय समितीने ५० सावकारांकडील एक हजार ९३ शेतकऱ्यांचे एक कोटी १७ लाख ४ हजार रूपयांचे प्रस्ताव मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. जिल्हास्तरीय समितीने यापैकी एक हजार ८७ सभासदांच्या एक कोटी १८ लाख २१ हजार रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली. जिल्ह्यामध्ये १ कोटी १८ लाख ४९ हजार ६४२ रुपये जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले असले तरी शासनाकडून एक कोटी १५ लाख रुपये प्राप्त झाले आहे. त्यानुसार एक कोटी १४ लाख ७५ हजार ८८२ रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले. उर्वरित कर्ज माफ करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) तारण परत मिळणार जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आली असून सावकारी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांना परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सावकारांचे सहायक निबंधक यांच्याकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. सुरवातीला या योजनेत सावकाराने परवाना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यास कर्ज दिले असल्यास ते या योजनेस पात्र ठरविण्यात आले नव्हते. मात्र शासनाने ही अटही शिथिल करून सरसकट सर्वच सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाही लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे.