शहरं
Join us  
Trending Stories
1
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!
2
आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 
3
Miss World 2025: कोण आहे मिस वर्ल्ड ओपल सुचाता? १६व्या वर्षी ब्रेस्टमध्ये गाठ सापडली अन्...
4
भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष
5
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
6
'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई
7
आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल
8
न्यायालयाने फेटाळला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा जामीन; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
9
अकरावीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ‘इन हाऊस कोट्यात’; १० टक्के जागा आरक्षित
10
मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार
11
अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल
13
लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न
14
जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण
15
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
16
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
17
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
18
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
19
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
20
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर

वाघिणीच्या बेशुद्धीची एक गोळी तब्बल २२ हजारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:18 IST

१४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे२४ तासानंतर होते निकामी : फौजेचा दरदिवसाचा खर्च एक लाख

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. हे औषध केवळ ४८ तास सुरक्षित राहू शकते. या औषधाचा हवेशी संबंध येताच, ते निरूपयोगी ठरते, असे सांगण्यात आले.हे औषध केवळ प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येते. ते खुल्या बाजारात उपलब्ध होत नाही. आणीबाणीच्या प्रसंगीच हे औषध वनविभागाला उपलब्ध करून दिले जाते. या औषधाचे तापमान कायम ठेवल्यासच ते सुरक्षित राहते. मात्र मोहिमेदरम्यान जंगलात तापमान मेंटेन होत नसल्याने २४ तासानंतर गनमधील औषध काढून फेकून द्यावे लागते. गेल्या १५ दिवसांपासून राळेगाव परिसरात नरभक्षी वाघिणीच्या शोधासाठी मोठा तैनात करण्यात आला आहे. राळेगाव, कळंब व पांढरकवडा या तालुक्यात या वाघिणीचा वावर असून तिच्यासोबत तिचे दोन बछडे व एक वाघ आहे. सखीचे जंगला म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. सदर नरभक्षी वाघिणीला बेशुद्ध करून सुरक्षित जागी न्यावे अथवा ते शक्य नसेल, तर ठार मारावे, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे वनविभागाने या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी भलामोठा ताफा जंगलात तैनात केला आहे. या ताफ्यात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये हे पूर्णवेळ हजर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही मोहिम सुरू आहे. या मोहिमेवरील रोजचा खर्च एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.मोहिमेत सहभागी डॉक्टरांवरील दररोजचा खर्च १० हजार आहे. ट्रॅन्क्युलायजर (बेशुद्ध करण्याचे औषध) चा खर्च २२ हजारांचा आहे. हत्ती व त्यासोबतच्या ताफ्याचा खर्च १० हजार, पोलीस १० हजार, पेट्रोल-डिझेल १० हजार, ड्रोन कॅमेरे ४ हजार, मजूर ३० हजार, अधिकारी व कर्मचाºयांच्या राहण्याचा खर्च १० हजार, असा एकुण या मोहिमेसाठी एक लाख रूपये दररोज खर्च केल्या जात असल्याचे सांगितले जाते.लोकप्रतिनिधींची अनास्था कायमनरभक्षी वाघिणीने १४ लोकांचे बळी घेतल्यानंतर राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घडणाºया घटना लक्षात घेता, माजीमंत्री प्रा.वसंत पुरके व राळेगावचे आमदार प्रा.अशोक उईके यांनी पुढाकार घेऊन वाघिणीच्या बंदोबस्ताचा मुद्दा रेटून धरला. मात्र आर्णी-केळापूर मतदार संघाचे आमदार प्रा.राजू तोडसाम हे मात्र या विषयाच्या कायम दूर असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Tigerवाघ