शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीच्या बेशुद्धीची एक गोळी तब्बल २२ हजारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:18 IST

१४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे२४ तासानंतर होते निकामी : फौजेचा दरदिवसाचा खर्च एक लाख

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. हे औषध केवळ ४८ तास सुरक्षित राहू शकते. या औषधाचा हवेशी संबंध येताच, ते निरूपयोगी ठरते, असे सांगण्यात आले.हे औषध केवळ प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येते. ते खुल्या बाजारात उपलब्ध होत नाही. आणीबाणीच्या प्रसंगीच हे औषध वनविभागाला उपलब्ध करून दिले जाते. या औषधाचे तापमान कायम ठेवल्यासच ते सुरक्षित राहते. मात्र मोहिमेदरम्यान जंगलात तापमान मेंटेन होत नसल्याने २४ तासानंतर गनमधील औषध काढून फेकून द्यावे लागते. गेल्या १५ दिवसांपासून राळेगाव परिसरात नरभक्षी वाघिणीच्या शोधासाठी मोठा तैनात करण्यात आला आहे. राळेगाव, कळंब व पांढरकवडा या तालुक्यात या वाघिणीचा वावर असून तिच्यासोबत तिचे दोन बछडे व एक वाघ आहे. सखीचे जंगला म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. सदर नरभक्षी वाघिणीला बेशुद्ध करून सुरक्षित जागी न्यावे अथवा ते शक्य नसेल, तर ठार मारावे, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे वनविभागाने या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी भलामोठा ताफा जंगलात तैनात केला आहे. या ताफ्यात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये हे पूर्णवेळ हजर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही मोहिम सुरू आहे. या मोहिमेवरील रोजचा खर्च एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.मोहिमेत सहभागी डॉक्टरांवरील दररोजचा खर्च १० हजार आहे. ट्रॅन्क्युलायजर (बेशुद्ध करण्याचे औषध) चा खर्च २२ हजारांचा आहे. हत्ती व त्यासोबतच्या ताफ्याचा खर्च १० हजार, पोलीस १० हजार, पेट्रोल-डिझेल १० हजार, ड्रोन कॅमेरे ४ हजार, मजूर ३० हजार, अधिकारी व कर्मचाºयांच्या राहण्याचा खर्च १० हजार, असा एकुण या मोहिमेसाठी एक लाख रूपये दररोज खर्च केल्या जात असल्याचे सांगितले जाते.लोकप्रतिनिधींची अनास्था कायमनरभक्षी वाघिणीने १४ लोकांचे बळी घेतल्यानंतर राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घडणाºया घटना लक्षात घेता, माजीमंत्री प्रा.वसंत पुरके व राळेगावचे आमदार प्रा.अशोक उईके यांनी पुढाकार घेऊन वाघिणीच्या बंदोबस्ताचा मुद्दा रेटून धरला. मात्र आर्णी-केळापूर मतदार संघाचे आमदार प्रा.राजू तोडसाम हे मात्र या विषयाच्या कायम दूर असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Tigerवाघ