शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

वाघिणीच्या बेशुद्धीची एक गोळी तब्बल २२ हजारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:18 IST

१४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे२४ तासानंतर होते निकामी : फौजेचा दरदिवसाचा खर्च एक लाख

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. हे औषध केवळ ४८ तास सुरक्षित राहू शकते. या औषधाचा हवेशी संबंध येताच, ते निरूपयोगी ठरते, असे सांगण्यात आले.हे औषध केवळ प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येते. ते खुल्या बाजारात उपलब्ध होत नाही. आणीबाणीच्या प्रसंगीच हे औषध वनविभागाला उपलब्ध करून दिले जाते. या औषधाचे तापमान कायम ठेवल्यासच ते सुरक्षित राहते. मात्र मोहिमेदरम्यान जंगलात तापमान मेंटेन होत नसल्याने २४ तासानंतर गनमधील औषध काढून फेकून द्यावे लागते. गेल्या १५ दिवसांपासून राळेगाव परिसरात नरभक्षी वाघिणीच्या शोधासाठी मोठा तैनात करण्यात आला आहे. राळेगाव, कळंब व पांढरकवडा या तालुक्यात या वाघिणीचा वावर असून तिच्यासोबत तिचे दोन बछडे व एक वाघ आहे. सखीचे जंगला म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. सदर नरभक्षी वाघिणीला बेशुद्ध करून सुरक्षित जागी न्यावे अथवा ते शक्य नसेल, तर ठार मारावे, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे वनविभागाने या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी भलामोठा ताफा जंगलात तैनात केला आहे. या ताफ्यात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये हे पूर्णवेळ हजर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही मोहिम सुरू आहे. या मोहिमेवरील रोजचा खर्च एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.मोहिमेत सहभागी डॉक्टरांवरील दररोजचा खर्च १० हजार आहे. ट्रॅन्क्युलायजर (बेशुद्ध करण्याचे औषध) चा खर्च २२ हजारांचा आहे. हत्ती व त्यासोबतच्या ताफ्याचा खर्च १० हजार, पोलीस १० हजार, पेट्रोल-डिझेल १० हजार, ड्रोन कॅमेरे ४ हजार, मजूर ३० हजार, अधिकारी व कर्मचाºयांच्या राहण्याचा खर्च १० हजार, असा एकुण या मोहिमेसाठी एक लाख रूपये दररोज खर्च केल्या जात असल्याचे सांगितले जाते.लोकप्रतिनिधींची अनास्था कायमनरभक्षी वाघिणीने १४ लोकांचे बळी घेतल्यानंतर राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घडणाºया घटना लक्षात घेता, माजीमंत्री प्रा.वसंत पुरके व राळेगावचे आमदार प्रा.अशोक उईके यांनी पुढाकार घेऊन वाघिणीच्या बंदोबस्ताचा मुद्दा रेटून धरला. मात्र आर्णी-केळापूर मतदार संघाचे आमदार प्रा.राजू तोडसाम हे मात्र या विषयाच्या कायम दूर असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Tigerवाघ