शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
4
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
5
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
6
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
7
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
8
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
9
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
11
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
12
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
13
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
14
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
15
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
16
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
17
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
18
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
19
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! एकाच गावात एकाच दिवशी पाच बालविवाह प्रशासनाने दिली धडक, मांडवात उडाली धांदल

By अविनाश साबापुरे | Updated: April 22, 2024 17:26 IST

यवतमाळ: पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा गावात एकाच मांडवात पाच बालिका वधु; प्रशासनाची योग्य वेळी कारवाई

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून बालविवाह रोखण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असतानाही ही प्रथा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातच सोमवारी चक्क एकाच मांडवात पाच बालविवाह लावले जात होते. परंतु, या प्रकाराची भनक लागताच प्रशासनाने ऐनवेळी मांडवात धडक देऊन बालविवाह रोखले.

ही कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा गावात करण्यात आली. या गावात एकाच मांडवात तब्बल आठ विवाह होत असून त्यातील काही मुली अल्पवयीन असण्याची शक्यता आहे, अशी गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली होती. ही माहिती मिळताच तातडीने प्रशासनाने मुलींच्या वयाची शहानिशा केली. त्यावेळी पाच उपवधू अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे यांच्या मार्गदर्शनात तातडीने हालचाल करण्यात आली. प्रशासनाचे पथक थेट विवाह मंडपात धडकले. नवरी मुलींच्या पालकांना मुलींच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य केल्यास कायदेशीर कारवाई होऊन त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली. मुलीची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र पालकांकडून घेण्यात आले व एकाच दिवशी होत असलेले पाच बालविवाह रोखले गेले. या सर्व बालिकांना बाल कल्याण समितीच्या समक्ष हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कार्यवाहीसाठी घाटंजीचे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांचे बालसंरक्षण कक्षाला विशेष सहकार्य लाभले. बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर मावस्कर, पोलीस कर्मचारी निलेश घोसे, बालसंरक्षण अधिकारी माधुरी पावडे, क्षेत्रीय कार्यकर्ता कोमल नंदपटेल, चाईल्ड लाईन सुपरवायझर गणेश आत्राम यांनी पार पाडली.

तीन महिन्यात रोखले २४ बालविवाहजिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच तब्बल २४ बालविवाह रोखले. मे महिन्यात १० तारखेला अक्षयतृतीया आहे. या मुहूर्तावर अनेक बालविवाह होतात, हा दरवर्षीचा प्रशासनाचा अनुभव आहे. म्हणून विविध माध्यमाद्वारे बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नियोजित बालविवाहांची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळत आहे. मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह केल्यास हा बालविवाह ठरतो. 

बाल विवाह लावणे व त्यास सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा बालविवाहाबाबत माहिती असल्यास गावचे ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील अथवा चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.- देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

टॅग्स :Yawatmal Police Headquarterयवतमाळ पोलीस मुख्यालयCrime Newsगुन्हेगारी