शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

अरे व्वा ! टायपिंग, शाॅर्टहॅन्डचा कोर्स आता मोफत! राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

By अविनाश साबापुरे | Updated: June 23, 2024 19:48 IST

सध्या ही योजना अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या गटातील उमेदवारांसाठी लागू करण्यात आली आहे...

यवतमाळ : विविध नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या संगणक टायपिंग अभ्यासक्रमासह शाॅर्टहॅन्डचाही संपूर्ण कोर्स आता मोफत शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याबाबत अमृत संस्थेची करार करण्यात आला असून लवकरच सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांशीही करार केला जाणार आहे.

सध्या ही योजना अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या गटातील उमेदवारांसाठी लागू करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी, युवक, युवतींना हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मात्र लवकरच सारथी, महाज्योती, बार्टी, तसेच आदिवासी संशोधन संस्थेशीही करार करुन विविध मागास घटकातील विद्यार्थ्यांनाही हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे."

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) तसेच ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यात कोर्सचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. याबाबत परीक्षा परिषद आणि अमृत संस्थेमध्ये करारनामा करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या जूनच्या परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा ही मदत मिळणार आहे. टायपिंग व शाॅर्टहॅन्ड परीक्षेत दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

उमेदवार संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संपूर्ण कोर्सचा खर्च त्याला दिला जाणार आहे. अमृत संस्थेचे व्यवस्थापक विनय जोशी यांच्याशी करार झाला आहे. सध्या खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांना याचा लाभ होईल. मात्र सारथी, महाज्योती, बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेशीही करार करण्याचा प्रयत्न आहे. मी स्वत: त्यांच्या संचालकांशी यादृष्टीने चर्चा केली आहे. दुसऱ्या टप्प्यात या संस्थांशी करार झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे.- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

कुणाला किती अर्थसहाय्य मिळणार?- टायपिंगसाठी ६,५०० : जीसीसी-टीबीसी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ४८००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १०००, सामुग्री शुल्क ५०० असे एकरकमी सहा हजार ५०० रुपये मिळतील.- शाॅर्टहॅन्डसाठी ५,३०० : लघुलेखन कोर्स उत्तीर्ण विद्यार्थ्याला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ३६००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १०००, सामुग्री शुल्क ५०० असे एकरकमी पाच हजार ३०० रुपये मिळतील.

निकष काय?- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.- जीसीसी-टीबीसी परीक्षा उत्तीर्ण असावा.- लघुलेखन कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण असावा.- पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हे अर्थसहाय्य जमा होईल.- त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. 

टॅग्स :Educationशिक्षण