शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

आता सिंचन विहिरींचेही दिले पालकत्व

By admin | Updated: March 12, 2015 02:16 IST

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईने रखडलेल्या सिंचन विहीरी पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्याच अधिकारी कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईने रखडलेल्या सिंचन विहीरी पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्याच अधिकारी कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या २२९२ विहिरींची जबाबदारी ४५८ कर्मचाऱ्यांवर दिली असून त्यांना या विहिरींचे जणू पालकमंत्रीच करण्यात आले आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी सिंचन विहिरी देण्यात आल्यात. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक हजार विहिरी देण्याचे ठरविण्यात आले होते. १६ हजार विहिरींपैकी १४ हजार ८४५ शेतकरी विहिरीसाठी पात्र ठरले. विहिरींसाठी प्रारंभी १० हजार रूपयांचा निधी दिला. यातून शेतकऱ्यांनी काम सुरू केले. मात्र यानंतर निधी देताना कर्मचाऱ्यांनी आखडता हात घेतला. यामुळे अनेक विहिरीचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्यात धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत १४ हजार ८४५ विहिरी पूर्ण झाल्या. यातील सात हजार विहिरी पूर्ण झाल्या. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याने चार हजार १३२ विहिरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आले. यामधील केवळ ७२ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. दोन हजार २९२ विहिरी अपूर्ण आहेत. त्यासाठी ३६ कोटी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. मात्र ह्या विहिरींचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी अमरावती विभागीय आढावा बैठक यवतमाळात ३ मार्च रोजी घेतली. त्यावेळी अपूर्ण सिंचन विहिरींचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. त्यांनी हीबाब गार्भीयाने घेत रखडलेल्या विहिरी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला. त्यावरून जिल्हाधिकारी राहूलरंजन महिवाल यांनी या विहिरी पूर्ण करण्यासाठी कंबर कसली. त्यातून निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विहिरीचे पालकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. रखडलेल्या २२९२ विहिरींचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांसोबत स्थानिक यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालकत्व दिले आहे. दर आठ दिवसाला अधिकाऱ्यांना कामाचा आढावा घ्यावा लागणार आहे. प्रशासनातील अडथळे दूर करायचे आहेत. यामध्ये ३० जूनपूर्वी काम पूर्ण न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.