शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

स्वत:चे घर नाही, मुलांचे शिक्षण अद्यापही बाकी, मग स्वेच्छासेवानिवृत्ती कशी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

तातडीच्या कामानिमित्त काढलेले कर्जही भरावे लागते. सेवानिवृत्त झाल्यानंतर या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या कशा, या प्रश्नाने आतापासूनच भंडावून सोडले आहे. सेवानिवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारचे काम हाताला मिळणार नाही. डोक्यावर असलेले कर्ज मिळणाऱ्या पैशातून महामंडळ कापून घेणार, वर्षभरात केवळ तीन महिन्यांचा पगार मिळेल. एवढ्या तोकड्या पैशात काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे शक्य होत नाही.

ठळक मुद्देपरिवहन महामंडळाची ५० वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काैटुंबिक जबाबदारी खांद्यावर आलेल्या काळातच स्वेच्छासेवानिवृत्तीचे अर्ज भरून घेण्याची मोहीम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केली आहे. पोरीचे लग्न, पोराचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांचे आजारपण या सर्व जबाबदाऱ्या याच काळात पूर्ण कराव्या लागतात. शिवाय, तातडीच्या कामानिमित्त काढलेले कर्जही भरावे लागते. सेवानिवृत्त झाल्यानंतर या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या कशा, या प्रश्नाने आतापासूनच भंडावून सोडले आहे. सेवानिवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारचे काम हाताला मिळणार नाही. डोक्यावर असलेले कर्ज मिळणाऱ्या पैशातून महामंडळ कापून घेणार, वर्षभरात केवळ तीन महिन्यांचा पगार मिळेल. एवढ्या तोकड्या पैशात काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे शक्य होत नाही. एकरकमी पैसा मिळाला, तरी तो कार्यप्रसंग, शिक्षण यावर खर्च होणार आहे. पुढील काळात जगण्याचा प्रश्न उभा ठाकणार आहे. महामंडळाच्या सेवेसाठी सेवानिवृत्तीपर्यंत वेळ मिळाल्यास जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील. नोकरी नसल्याने अडीअडचणीच्या काळात कर्जही मिळणार नाही. या सर्व प्रश्नांनी वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यात गोंधळ घातला आहे. काय निर्णय घ्यायचा, या प्रश्नाने त्यांना भंडावून सोडले आहे. शेवटी निर्णय स्वत:चा असला तरी महामंडळ काय भूमिका घेते, याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.

स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर राहिलेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षाकरिता तीन महिन्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी उपदान, रजा रोखीकरण आदींचे लाभ. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अपराध प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा एखादे गंभीर प्रकरण प्रलंबित राहिल्यास १५ दिवसांत निकाली काढले जाईल. महामंडळाच्या नियमानुसार मोफत कौटुंबिक पास मिळेल. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर एसटी महामंडळात ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.

आयुष्याचा प्रश्नपाल्यांचे शिक्षण, आई-वडिलांचा औषधोपचार, दैनंदिन गरजा पूर्ण करताना अडचणी जाते. कर्जबाजारी असल्याने ही परिस्थिती आहे. नाेकरी राहिल्यास पुढील काळात यातून सावरता येईल.- उत्तम पाटील,वाहक, यवतमाळ आगार

अडचणी जाणवणारस्वेच्छासेवानिवृत्तीनंतर पैशांची आवक थांबेल. गरजेइतका पैसा मिळेल असे काम कुठे मिळणार नाही. मुलांचे शिक्षण पूर्ण व्हायचे आहे. पैशांची जुळवाजुळव करणे कठीण जाईल. अनेक अडचणींचा सामना  करावा लागेल.- कांचन उत्तम पाटील

 

टॅग्स :state transportएसटी