शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

वेळापत्रक पाहून प्रवास ठरवाल तर फसाल; एसटीच्या ५० टक्के बसफेऱ्या बंदही झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:53 IST

पाच वर्षे जुने फलक : नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर झळकत असलेले बसफेऱ्यांचे वेळापत्रक प्रवाशांची दिशाभूल करणारे ठरत आहे. त्यावर लिहिलेल्या टायमिंगमधील ५० टक्के बसफेऱ्या बंद झालेल्या आहेत. सन २०१८ पासून या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. बसगाड्यांचा तुटवडा, उत्पन्न मिळत नसल्याने बंद करण्यात आलेल्या फेऱ्या, आदी कारणांमुळे टायमिंग बदलले आहे. तरीही नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज महामंडळाला वाटलेली दिसत नाही.

एसटी महामंडळाकडून दरवर्षी जून महिन्यात अद्ययावत वेळापत्रक प्रत्येक बसस्थानकावर प्रसारित केले जाते. त्यासाठी दैनंदिन बसफेऱ्यांचे उत्पन्न व प्रवासी प्रतिसादाचा विचार केला जातो. ज्या फेऱ्या कमी प्रवासी प्रतिसादाच्या आहेत, त्या बंद करून प्रवाशांनी मागणी केलेल्या अथवा चांगले उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसफेऱ्या वाढविल्या जातात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रवासी संघटनांनी केलेल्या मागण्यांचाही विचार केला जातो. यातून सर्वसमावेशक वेळापत्रक तयार केले जाते.

प्रथम जिल्ह्यातील बसफेऱ्यांची आखणी केली जाते. नंतर आंतरजिल्हा व आंतरप्रदेशांच्या बाबतीत मध्यवर्ती कार्यालयातून सूचना प्रसारित करून एकमेकाला समांतर ठरणार नाहीत, अशा बसफेऱ्या सुरू करण्याची परवानगी दिली जाते. अंतिमत: हे वेळापत्रक प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांसाठी प्रसिद्ध केले जाते. परंतु, सन २०१८ पासून ही प्रक्रिया राबविली गेली नसल्याची माहिती आहे. सध्या बसस्थानकांवर दिसत असलेले वेळापत्रक सन २०१८-१९ मधील आहे.

महामंडळाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी वेळापत्रकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वाहतूक शाखेने वेळापत्रक अद्ययावत करून ते प्रत्येक बसस्थानकावर प्रदर्शित करणे गरजेचे होते. यातून प्रवाशांना बस प्रवासाची निश्चित वेळ समजणे सोपे झाले असते. बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसफेऱ्यांच्या अनियमितपणामुळे अनेक प्रवासी खासगी बसेसकडे वळल्याचे दिसून आले आहे.

काही धावतात फुल्ल तर काही रिकाम्या

अद्ययावत वेळापत्रकाअभावी समांतर फेऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासी उत्पन्न वाढवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वेळापत्रकाकडे एसटीचे दुर्लक्ष झाले आहे. एकाच मार्गावर अनेक आगाराच्या बसेस एकामागे एक धावताना दिसत आहेत. यातील काही बसेस नाममात्र प्रवासी घेऊन जातात, तर काही बसमध्ये जागा मिळत नाही. रिकाम्या धावणाऱ्या बसचा फटका महामंडळाला बसत आहे.

टॅग्स :state transportएसटीYavatmalयवतमाळ