शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वेळापत्रक पाहून प्रवास ठरवाल तर फसाल; एसटीच्या ५० टक्के बसफेऱ्या बंदही झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:53 IST

पाच वर्षे जुने फलक : नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर झळकत असलेले बसफेऱ्यांचे वेळापत्रक प्रवाशांची दिशाभूल करणारे ठरत आहे. त्यावर लिहिलेल्या टायमिंगमधील ५० टक्के बसफेऱ्या बंद झालेल्या आहेत. सन २०१८ पासून या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. बसगाड्यांचा तुटवडा, उत्पन्न मिळत नसल्याने बंद करण्यात आलेल्या फेऱ्या, आदी कारणांमुळे टायमिंग बदलले आहे. तरीही नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज महामंडळाला वाटलेली दिसत नाही.

एसटी महामंडळाकडून दरवर्षी जून महिन्यात अद्ययावत वेळापत्रक प्रत्येक बसस्थानकावर प्रसारित केले जाते. त्यासाठी दैनंदिन बसफेऱ्यांचे उत्पन्न व प्रवासी प्रतिसादाचा विचार केला जातो. ज्या फेऱ्या कमी प्रवासी प्रतिसादाच्या आहेत, त्या बंद करून प्रवाशांनी मागणी केलेल्या अथवा चांगले उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसफेऱ्या वाढविल्या जातात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रवासी संघटनांनी केलेल्या मागण्यांचाही विचार केला जातो. यातून सर्वसमावेशक वेळापत्रक तयार केले जाते.

प्रथम जिल्ह्यातील बसफेऱ्यांची आखणी केली जाते. नंतर आंतरजिल्हा व आंतरप्रदेशांच्या बाबतीत मध्यवर्ती कार्यालयातून सूचना प्रसारित करून एकमेकाला समांतर ठरणार नाहीत, अशा बसफेऱ्या सुरू करण्याची परवानगी दिली जाते. अंतिमत: हे वेळापत्रक प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांसाठी प्रसिद्ध केले जाते. परंतु, सन २०१८ पासून ही प्रक्रिया राबविली गेली नसल्याची माहिती आहे. सध्या बसस्थानकांवर दिसत असलेले वेळापत्रक सन २०१८-१९ मधील आहे.

महामंडळाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी वेळापत्रकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वाहतूक शाखेने वेळापत्रक अद्ययावत करून ते प्रत्येक बसस्थानकावर प्रदर्शित करणे गरजेचे होते. यातून प्रवाशांना बस प्रवासाची निश्चित वेळ समजणे सोपे झाले असते. बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसफेऱ्यांच्या अनियमितपणामुळे अनेक प्रवासी खासगी बसेसकडे वळल्याचे दिसून आले आहे.

काही धावतात फुल्ल तर काही रिकाम्या

अद्ययावत वेळापत्रकाअभावी समांतर फेऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासी उत्पन्न वाढवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वेळापत्रकाकडे एसटीचे दुर्लक्ष झाले आहे. एकाच मार्गावर अनेक आगाराच्या बसेस एकामागे एक धावताना दिसत आहेत. यातील काही बसेस नाममात्र प्रवासी घेऊन जातात, तर काही बसमध्ये जागा मिळत नाही. रिकाम्या धावणाऱ्या बसचा फटका महामंडळाला बसत आहे.

टॅग्स :state transportएसटीYavatmalयवतमाळ