शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वेळापत्रक पाहून प्रवास ठरवाल तर फसाल; एसटीच्या ५० टक्के बसफेऱ्या बंदही झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:53 IST

पाच वर्षे जुने फलक : नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर झळकत असलेले बसफेऱ्यांचे वेळापत्रक प्रवाशांची दिशाभूल करणारे ठरत आहे. त्यावर लिहिलेल्या टायमिंगमधील ५० टक्के बसफेऱ्या बंद झालेल्या आहेत. सन २०१८ पासून या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. बसगाड्यांचा तुटवडा, उत्पन्न मिळत नसल्याने बंद करण्यात आलेल्या फेऱ्या, आदी कारणांमुळे टायमिंग बदलले आहे. तरीही नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज महामंडळाला वाटलेली दिसत नाही.

एसटी महामंडळाकडून दरवर्षी जून महिन्यात अद्ययावत वेळापत्रक प्रत्येक बसस्थानकावर प्रसारित केले जाते. त्यासाठी दैनंदिन बसफेऱ्यांचे उत्पन्न व प्रवासी प्रतिसादाचा विचार केला जातो. ज्या फेऱ्या कमी प्रवासी प्रतिसादाच्या आहेत, त्या बंद करून प्रवाशांनी मागणी केलेल्या अथवा चांगले उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसफेऱ्या वाढविल्या जातात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रवासी संघटनांनी केलेल्या मागण्यांचाही विचार केला जातो. यातून सर्वसमावेशक वेळापत्रक तयार केले जाते.

प्रथम जिल्ह्यातील बसफेऱ्यांची आखणी केली जाते. नंतर आंतरजिल्हा व आंतरप्रदेशांच्या बाबतीत मध्यवर्ती कार्यालयातून सूचना प्रसारित करून एकमेकाला समांतर ठरणार नाहीत, अशा बसफेऱ्या सुरू करण्याची परवानगी दिली जाते. अंतिमत: हे वेळापत्रक प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांसाठी प्रसिद्ध केले जाते. परंतु, सन २०१८ पासून ही प्रक्रिया राबविली गेली नसल्याची माहिती आहे. सध्या बसस्थानकांवर दिसत असलेले वेळापत्रक सन २०१८-१९ मधील आहे.

महामंडळाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी वेळापत्रकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वाहतूक शाखेने वेळापत्रक अद्ययावत करून ते प्रत्येक बसस्थानकावर प्रदर्शित करणे गरजेचे होते. यातून प्रवाशांना बस प्रवासाची निश्चित वेळ समजणे सोपे झाले असते. बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसफेऱ्यांच्या अनियमितपणामुळे अनेक प्रवासी खासगी बसेसकडे वळल्याचे दिसून आले आहे.

काही धावतात फुल्ल तर काही रिकाम्या

अद्ययावत वेळापत्रकाअभावी समांतर फेऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासी उत्पन्न वाढवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वेळापत्रकाकडे एसटीचे दुर्लक्ष झाले आहे. एकाच मार्गावर अनेक आगाराच्या बसेस एकामागे एक धावताना दिसत आहेत. यातील काही बसेस नाममात्र प्रवासी घेऊन जातात, तर काही बसमध्ये जागा मिळत नाही. रिकाम्या धावणाऱ्या बसचा फटका महामंडळाला बसत आहे.

टॅग्स :state transportएसटीYavatmalयवतमाळ