शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘पीएचसी’त उपचाराअभावी नऊ बालके दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:29 IST

यवतमाळ जिल्ह्यात उपचाराला झालेल्या विलंबाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ बालके दगावली असून अनेक मातांची प्रसूती घरीच करावी लागल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे‘आशां’च्या संपाचा परिणाम घरी प्रसूती करण्याची पाळी, आरोग्य विभाग बेखबर

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपचाराला झालेल्या विलंबाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ बालके दगावली असून अनेक मातांची प्रसूती घरीच करावी लागल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. जिल्ह्यात २२०० आशा स्वयंसेविकांच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संपाने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. जिल्हा आरोग्य विभाग मात्र यापासून बेखबर आहे, हे विशेष.गावातील गर्भवती महिलेवर लक्ष ठेवण्यापासून ते रुग्णालयात प्रसूती व बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंतची जबाबदारी आशा स्वयंसेविका पार पाडतात. नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्या ही जोखमीची कामे पूर्ण करतात. मागील ३ सप्टेंबरपासून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. आरोग्य विभाग ही बाब नाकारत असला तरी, प्रत्यक्षात पुढे आलेल्या घटनांवरून त्यांच्या अनुपस्थितीचा फटका बसत असल्याचे स्पष्ट होते.प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेली आणि नवजात बालके दगावल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या काही तालुक्यात या घटना घडल्या आहेत. यवतमाळ, आर्णी, राळेगाव, नेर, पांढरकवडा, उमरखेड या तालुक्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बालमृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाने स्पष्ट नकार दिला असलातरी आरोग्य केंद्राशी प्रत्यक्ष कनेक्ट असलेल्या घटकांकडून या बाबीला पुष्टी मिळाली आहे. नवजात अर्भक ते चार ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यू झालेला आहे. काही बालके रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तत्काळ उपचार आणि उशिरा मिळालेल्या सल्ल्याचे बळी ठरले आहेत.ग्रामीण भागात साथीचे आजार पसरले आहे. बालकांनाही या आजाराने पछाडले आहे. नागरिकांना याविषयी योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. जवळची आरोग्य सेवा म्हणून नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतात. मात्र याठिकाणी उपचार न करता प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांना थेट रेफरचा सल्ला दिला जातो. प्रसूतीसाठी आणण्यात आलेल्या महिलांविषयीसुध्दा हाच प्रकार होत आहे. आशांचा संप आणि अपुºया यंत्रणेचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. सध्यातरी याविषयी आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे दिसते. मागील दहा ते बारा दिवसात घरी झालेली प्रसूती आणि दगावलेली बालके याचा अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा करण्यात हा विभाग धन्यता मानताना दिसतो आहे.दोन आठवड्यापासूनचा संप सुरूचराज्यभरातील आशा आणि गटप्रवर्तकांनी सुरू केलेल्या संपावरून दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. आशा आणि गटप्रवर्तक यांच्याकडे जवळपास ६४ प्रकारची जबाबदारी आहे. शिवाय स्थानिक पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कामे वेगळीच. असे असतानाही आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था केलेली नाही. हीच दिरंगाई बालमृत्यू आणि घरी जोखमीची प्रसूती याला कारणीभूत ठरते आहे.यवतमाळ जिल्ह्यात कुठल्या आरोग्य केंद्रात बालमृत्यू झाले अथवा घरी किती प्रसूती झाल्या याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र आरोग्य विभागाची सेवा सुरळीत सुरू आहे.- डॉ. टी.एस. चव्हाण, माता बाल संगोप अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Healthआरोग्य