शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएचसी’त उपचाराअभावी नऊ बालके दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:29 IST

यवतमाळ जिल्ह्यात उपचाराला झालेल्या विलंबाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ बालके दगावली असून अनेक मातांची प्रसूती घरीच करावी लागल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे‘आशां’च्या संपाचा परिणाम घरी प्रसूती करण्याची पाळी, आरोग्य विभाग बेखबर

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपचाराला झालेल्या विलंबाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ बालके दगावली असून अनेक मातांची प्रसूती घरीच करावी लागल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. जिल्ह्यात २२०० आशा स्वयंसेविकांच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संपाने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. जिल्हा आरोग्य विभाग मात्र यापासून बेखबर आहे, हे विशेष.गावातील गर्भवती महिलेवर लक्ष ठेवण्यापासून ते रुग्णालयात प्रसूती व बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंतची जबाबदारी आशा स्वयंसेविका पार पाडतात. नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्या ही जोखमीची कामे पूर्ण करतात. मागील ३ सप्टेंबरपासून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. आरोग्य विभाग ही बाब नाकारत असला तरी, प्रत्यक्षात पुढे आलेल्या घटनांवरून त्यांच्या अनुपस्थितीचा फटका बसत असल्याचे स्पष्ट होते.प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेली आणि नवजात बालके दगावल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या काही तालुक्यात या घटना घडल्या आहेत. यवतमाळ, आर्णी, राळेगाव, नेर, पांढरकवडा, उमरखेड या तालुक्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बालमृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाने स्पष्ट नकार दिला असलातरी आरोग्य केंद्राशी प्रत्यक्ष कनेक्ट असलेल्या घटकांकडून या बाबीला पुष्टी मिळाली आहे. नवजात अर्भक ते चार ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यू झालेला आहे. काही बालके रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तत्काळ उपचार आणि उशिरा मिळालेल्या सल्ल्याचे बळी ठरले आहेत.ग्रामीण भागात साथीचे आजार पसरले आहे. बालकांनाही या आजाराने पछाडले आहे. नागरिकांना याविषयी योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. जवळची आरोग्य सेवा म्हणून नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतात. मात्र याठिकाणी उपचार न करता प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांना थेट रेफरचा सल्ला दिला जातो. प्रसूतीसाठी आणण्यात आलेल्या महिलांविषयीसुध्दा हाच प्रकार होत आहे. आशांचा संप आणि अपुºया यंत्रणेचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. सध्यातरी याविषयी आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे दिसते. मागील दहा ते बारा दिवसात घरी झालेली प्रसूती आणि दगावलेली बालके याचा अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा करण्यात हा विभाग धन्यता मानताना दिसतो आहे.दोन आठवड्यापासूनचा संप सुरूचराज्यभरातील आशा आणि गटप्रवर्तकांनी सुरू केलेल्या संपावरून दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. आशा आणि गटप्रवर्तक यांच्याकडे जवळपास ६४ प्रकारची जबाबदारी आहे. शिवाय स्थानिक पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कामे वेगळीच. असे असतानाही आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था केलेली नाही. हीच दिरंगाई बालमृत्यू आणि घरी जोखमीची प्रसूती याला कारणीभूत ठरते आहे.यवतमाळ जिल्ह्यात कुठल्या आरोग्य केंद्रात बालमृत्यू झाले अथवा घरी किती प्रसूती झाल्या याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र आरोग्य विभागाची सेवा सुरळीत सुरू आहे.- डॉ. टी.एस. चव्हाण, माता बाल संगोप अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Healthआरोग्य