शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

निळोणा आणि चापडोह धरण ७५ टक्के भरलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे.

ठळक मुद्देयवतमाळकरांना खूशखबर : उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्रता कमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत तीन वर्षांपासून यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्याच्या विरुद्ध चित्र प्रकल्प क्षेत्रात आहे. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे. यवतमाळकर नागरिकांसाठी ही जमेची बाजू आहे. यावर्षी गत तीन वर्षांप्रमाणे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, हे मात्र सत्य आहे. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता ४.०६ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामध्ये सध्या ३ एमएमक्यू जलसाठा शिल्लक आहे. एकूणच क्षमतेच्या ६४ टक्के पाणी निळोणा प्रकल्पात आहे. यासोबतच चापडोह प्रकल्पात ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पाचे साठवण क्षमता १२.२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रकल्पामध्ये आजच्या स्थितीत ९.०१ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. दोनही प्रकल्पांमध्ये १२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.हा जलसाठा १२ महिने पुरेल इतका आहे. दर महिन्याला यवतमाळकरांना १ एमएमक्यू पाणी लागते. यासोबत वेस्टेज पाणी आणि पाण्याची नासाडी लक्षात घेता आठ महिने पुरेल इतके पाणी दोन्ही जलप्रकल्पात सध्या शिल्लक आहे. आॅक्टोबर २०२० पर्यंत हे पाणी यवतमाळकरांना पुरेल, अशी संपूर्ण परिस्थिती आहे. यामुळे मार्च ते मे या कालावधीत यवतमाळमध्ये पाणीटंचाई भासणार नाही. जूनमध्ये पावसाचा विलंब झाला तरी त्याचा कुठलाही परिणाम यवतमाळकरांच्या दैनंदिन कामाजावर होणार नाही. प्रकल्पातील पाणी साठ्याची आलबेल स्थिती यावर्षी प्रथमच राहिली आहे.यवतमाळकरांना सध्या ज्या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होतो त्या वेळापत्रकानुसार म्हणजे चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. उन्हाळ्यातही पाण्याचे असेच वेळापत्रक राहणार आहे.यावर्षी दोन्ही प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा कायम आहे. यामुळे पुढील काळात पाणी कपातीचे धोरण राहणार नाही, मात्र यवतमाळकरांनी पाण्याचा जपून वापर करावा.- सुरेश हुंगेकार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरणWaterपाणी