शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

निळोणा आणि चापडोह धरण ७५ टक्के भरलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे.

ठळक मुद्देयवतमाळकरांना खूशखबर : उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्रता कमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत तीन वर्षांपासून यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्याच्या विरुद्ध चित्र प्रकल्प क्षेत्रात आहे. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे. यवतमाळकर नागरिकांसाठी ही जमेची बाजू आहे. यावर्षी गत तीन वर्षांप्रमाणे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, हे मात्र सत्य आहे. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता ४.०६ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामध्ये सध्या ३ एमएमक्यू जलसाठा शिल्लक आहे. एकूणच क्षमतेच्या ६४ टक्के पाणी निळोणा प्रकल्पात आहे. यासोबतच चापडोह प्रकल्पात ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पाचे साठवण क्षमता १२.२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रकल्पामध्ये आजच्या स्थितीत ९.०१ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. दोनही प्रकल्पांमध्ये १२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.हा जलसाठा १२ महिने पुरेल इतका आहे. दर महिन्याला यवतमाळकरांना १ एमएमक्यू पाणी लागते. यासोबत वेस्टेज पाणी आणि पाण्याची नासाडी लक्षात घेता आठ महिने पुरेल इतके पाणी दोन्ही जलप्रकल्पात सध्या शिल्लक आहे. आॅक्टोबर २०२० पर्यंत हे पाणी यवतमाळकरांना पुरेल, अशी संपूर्ण परिस्थिती आहे. यामुळे मार्च ते मे या कालावधीत यवतमाळमध्ये पाणीटंचाई भासणार नाही. जूनमध्ये पावसाचा विलंब झाला तरी त्याचा कुठलाही परिणाम यवतमाळकरांच्या दैनंदिन कामाजावर होणार नाही. प्रकल्पातील पाणी साठ्याची आलबेल स्थिती यावर्षी प्रथमच राहिली आहे.यवतमाळकरांना सध्या ज्या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होतो त्या वेळापत्रकानुसार म्हणजे चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. उन्हाळ्यातही पाण्याचे असेच वेळापत्रक राहणार आहे.यावर्षी दोन्ही प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा कायम आहे. यामुळे पुढील काळात पाणी कपातीचे धोरण राहणार नाही, मात्र यवतमाळकरांनी पाण्याचा जपून वापर करावा.- सुरेश हुंगेकार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरणWaterपाणी