शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

नीलगाय, रानडुकरांमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: December 25, 2014 23:39 IST

वणी तालुक्यातील शेतकरी नीलगाय, रानडुक्कर व हरीणासारख्या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे चांगलेच त्रस्त झाले आहे़ वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करीत असूनही शेतकरी

नांदेपेरा : वणी तालुक्यातील शेतकरी नीलगाय, रानडुक्कर व हरीणासारख्या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे चांगलेच त्रस्त झाले आहे़ वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करीत असूनही शेतकरी जाचक कायद्यांमुळे त्यांचा बंदोबस्त करू शकत नाही.मानव जातीप्रमाणे इतरही पशु-पक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे़ त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा तयार केला. तो प्रत्यक्ष अंमलातही आणला आहे. या कायद्यामुळे जंगलातील प्र्रत्येक जीवाला संरक्षण मिळाले आहे़ मात्र हा कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे़ वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित झाले आहेत. शेतशिवारात शेतकऱ्यांना जाणे कठीण झाले आहे़ वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे़ विशेष म्हणजे हा प्रकार डोळ्यासमोर होत असूनही वन्यप्राणी कायद्यामुळे वन्यप्राण्यांना शेतकरी इजासुध्दा करू शकत नाही़ त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत़पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत, ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे संरक्षण करून त्यांचे संवर्धन करतात. यासाठी शेतकऱ्यांना हजारो रूपये खर्च करावा लागतो. महागडे बियाणे पेरणी करावे लागते. महागडी औषधे घेऊन फवारणी करावी लागते. निंदण, डवरणी करावी लागते. प्रचंड परिश्रम घेऊन पिके घेतली जातात. मात्र शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला रोखण्यास असमर्थ ठरत आहे़ त्यामुळे दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होत आहे़ शेतीचा कितीही बंदोबस्त केला, तरीही उपद्रवी वन्यप्राणी, रानडुकरांचा कळप शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहे. सध्या खरिपाची तुर शेतात उभी आहे. मात्र रानडुकरे तुरीत घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. हा नासधुसीचा प्रकार नित्याचाच झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत़ वन्यप्राणी शेतात येऊ नये म्हणून शेतकरी बरेचदा विचित्र उपाययोजना आखतात़ त्या जिवघेण्या उपाययोजना अनेकदा शेतकऱ्यांच्या जिवावरही बेतल्या आहेत. त्यात काही शेतकऱ्यांना प्राणही गमवावे लागले आहे. मागील वर्षी वणी तालुक्यात फेफरवाडा येथील शेतकऱ्याने शेताभोवताच्या कुंपणाला विजेचा करंट लावून ठेवला होता़ त्यात शेतकऱ्याचाच मृत्यू झाला होता़ शेतीभोवती तारेचे कुंपण जरी केले, तरी त्याला न जुमानता रानडुकरांचे कळप शेतात मुसंडी मारतात़ सुरूवातीला फटाक्याच्या आवाजाने वन्यप्राणी पळ काढायचे. मात्र हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाला असून रानडुकरे सरळ शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहे़ त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट शेतकऱ्यांवरच हल्ला करतात़ दरवर्षी या घटनेत वाढ होत असून शेतकऱ्यांमध्य्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी रात्री शेताची राखण सोडून घरीच राहणे पसंत करीत आहे़ परिणामी रानडुकरांना पूर्ण शेत मोकळे दिसत आहे़दुसरीकडे नीलगाय, हरिण हे वन्यप्राणी तुरीच्या पिकावर हल्लाबोल करीत आहे. तुरीच्या शेंगा ते फस्त करतात. निसर्ग, शासनासोबतच वन्यप्राण्यांकडून शेतकरीच नागविला जात आहे़ वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा कायदा असल्याने शेतकरी काहीही करू शकत नाही़ (वार्ताहर)