शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

नेरच्या शेतकऱ्यांची दिवाळी तहसीलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 21:47 IST

मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत असलेला नेर तालुका यंदा दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नेर तालुक्याला दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावे, या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने नेर तहसीलच्या प्रांगणात काळी दिवाळी हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत असलेला नेर तालुका यंदा दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नेर तालुक्याला दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावे, या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने नेर तहसीलच्या प्रांगणात काळी दिवाळी हे अभिनव आंदोलन करण्यात आले.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या आंदोलनात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यंदा नेर तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी पिके पुरती नष्ट झाली आहेत. असे असतानाही नेर तालुक्याची आणेवारी पन्नास पैशाच्या वर दाखविण्यात आली आहे. एकीकडे जादा आणेवारी दाखवायची, पर्जन्यमानाचा बागुलबुवा उभा करायचा आणि त्यानंतर दुष्काळग्रस्तांच्या यादीतून तालुकाच हद्दपार करायचा. यामुळे नेर तालुक्यातील शेतकºयांच्या जखमेवर पुन्हा एकदा शासन व प्रशासनाने मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांच्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने काळी दिवाळी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आपल्या भाषणातून तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदविला.आंदोलनाचा अंतिम टप्प्यात नायब तहसीलदार संजय भोयर यांना आंदोलकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी तहसीलच्या प्रांगणात दिवे लावून शेतकऱ्यांची एक अभिनव अशी दिवाळी प्रशासनाच्या दारात साजरी करण्यात आली. यापूर्वी ११ नोव्हेंबर २०१५ ला सुद्धा अशाच प्रकारचे आंदोलन नेर तहसीलच्या प्रांगणात करण्यात आले होते.आंदोलनात गजानन अमदाबादकर, नितीन देशमुख, पिंटू पाटील खोडे, बबन चौधरी, चंद्रशेखर देशमुख ,हिम्मतराव देशमुख, मोहन भोयर, सदानंद पेचे, सचिन भाकरे, गोपाल चव्हाण, संतोष अरसोड, नीलेश चौधरी, दिनेश चौधरी, नितीन भोकरे, श्रीकांत ठाकरे, अनिल चव्हाण, दिनेश चव्हाण, सागर तिमाने, विजेंद्र पाटमास, जीवन जयस्वाल, श्रेनिक सिंगवी, निखिल ठाकरे, स्वप्निल शेटे, मिथुन मोंढे, मिलन राठोड, रवी गावंडे आदी सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्यामागील वर्षी भरून घेतलेला आॅफलाईन विमा स्वीकारून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, नाफेडचे हमीभाव केंद्र तत्काळ सुरू करावे, शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावा, नेर तालुका दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावा, मागेल त्याला रोजगार हमीचे काम उपलब्ध करून द्यावे.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार