शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शेतजमीन विश्वासाने देखरेखीसाठी दिली, भाच्यांनी आत्याची फसवणूक केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 16:23 IST

शेतजमीन विश्वासाने देखरेखीसाठी दिली. त्या जमिनीवर भाच्यांनी आत्याच्या नावाने पीक कर्जाची उचल केली. हा प्रकार माहीत झाल्यानंतर आत्याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

ठळक मुद्देकर्जाची परस्पर उचल : बँक व्यवस्थापक म्हणतात, नियमित परतफेड

यवतमाळ : आत्याने तिची शेतजमीन विश्वासाने देखरेखीसाठी भाच्यांकडे दिली. मात्र, त्या जमिनीवर भाच्यांनी आत्याच्या नावाने पीक कर्जाची उचल केली. हा प्रकार माहित झाल्यानंतर आत्याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कौटुंबिक नात्यातील गोडवा हा विश्वासावरच टिकलेला असतो. त्यात अविश्वासाचा खडा पडला की, जवळची व्यक्ती दुरावते. असाच प्रकार घाटंजी तालुक्यातील मुरली येथे घडला असून भाच्यांनीच आत्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 

सीमा रमेश राऊत (रा. पद्मावती पार्क, लोहारा) यांची शेती मुरली शिवारात आहे. नात्यातील भावांच्या मुलाकडे ही जमीन देखभालीसाठी दिली. शेतजमीन असल्याने घाटी, घाटंजी येथील सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मध्यवर्ती बँकेत सीमा राऊत यांनी खाते उघडले. त्याचा व्यवहारही भाच्यांकडे सोपविला. मात्र या खात्यातून एप्रिल २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत पीक कर्जाची उचल करण्यात आली. विविध व्यक्तींच्या नावाने हे कर्ज घेण्यात आले.

संदीप जमदापुरे, सचिन जमदापुरे, महेश भोयर, निखिल भोयर सर्व रा. मुरली अशी त्यांची नावे आहे. या सर्वांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यातील निखिल भोयर हा घाटंजी बॅंकेत वाॅच म्हणून काम करीत होता. त्यांच्याही नावाने १ लाख २२ हजार ७०० रुपयांची रक्कम उचलण्यात आली. हा प्रकार माहीत झाल्यानंतर सीमा राऊत यांनी याची तक्रार दिली. घाटंजी पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ व त्यानंतर विभागीय पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्याकडेही तक्रार केली.

कौटुंबिक वादात गोवली जातेय बॅंक

या प्रकरण संदर्भात घाटंजी मध्यवर्ती बॅंकेचे व्यवस्थापक प्रमोद हेमके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यात बॅंकेकडून कुठलीही अनियमितता झाली नसल्याचे स्पष्ट केले. २०१८ पासून सदर महिलेच्या खात्यातून पीक कर्जाची उचल होत आहे. व त्याची नियमित परतफेड ही केली जात आहे. कौटुंबिक वाद झाल्यानंतर बॅंकेला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्या व भाच्यात शेतीचा वाद सुरू आहे, असे हेमके यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी