शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

मेहतर समाजाला फुले-आंबेडकरांच्या विचारांची गरज

By admin | Updated: December 4, 2015 02:42 IST

इंग्रजांच्या सानिध्यात राहणारा, शहरातील सर्व सोयी-सवलतींचा लाभ घेणारा, एकेकाळी टाय-सुट-बुटात वावरणारा, ....

संजीव खुदशाह : स्मृतीपर्वात समाजाच्या ‘दशा आणि दिशे’वर मंथन, युवक-युवतींचाही सन्मानयवतमाळ : इंग्रजांच्या सानिध्यात राहणारा, शहरातील सर्व सोयी-सवलतींचा लाभ घेणारा, एकेकाळी टाय-सुट-बुटात वावरणारा, उत्तम इंग्रजी बोलणारा मेहतर समाज शिक्षणाअभावी आणि फुले-आंबेडकर विचारांपासून दूर राहिल्यानेच दिशाहीन झाला आहे, असे प्रतिपादन पत्रकार, लेखक, सफाई कामगार समुदायाचे अध्यक्ष संजीव खुदशाह यांनी केले.स्मृतीपर्वात बुधवारी ३ डिसेंबर रोजी संत कबीर विचारपीठाहून ते बोलत होते. ‘मेहतर समाज दशा आणि दिशा’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी उत्कृष्ट महिला पुरस्कारप्राप्त, मानवमुक्ती संग्राम पुणेच्या संस्थापिका निशाताई पारचे होत्या.ते पुढे म्हणाले, एकेकाळी गावकुसाबाहेरचे उपेक्षित जीवन जगणारा, अन्न, वस्त्र आणि निवारा नसणारा बाबासाहेबांचा समाज केवळ आणि केवळ शिक्षणाच्या भरोशावर आज विकसित झाल्याचे दिसते. शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुलेंनी जाणले. आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून बहुजनांना संधी उपलब्ध करून दिली, असे असूनही मेहतर समाज पुरोगामी विचारांपासून वेगळा राहण्याचे षड्यंत्र येथील प्रतिगामी लोकांनी केले. आमची केवळ स्तुती केली. त्यामागेही त्यांचा स्वार्थ होता. आम्ही करीत असलेली निकृष्ट कामे त्यांना करावी लागू नयेत हा त्या मागचा हेतू होता. इंग्रजांच्या वेळचे जुलमी कायदे रद्द करण्याचे श्रेयही डॉ. आंबेडकरांनाच जाते, असे ते म्हणाले. मेहतर समाजाच्या विकासासाठी या महामानवांचे विचार अंमलात आणण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा निशाताई पारचे यांनी स्त्रियांची कुचंबना व्यक्त केली. अजूनही मेहतर समाजात स्त्रियांचे स्थान दुय्यम असून झाडू, घुंंघट यातच ही स्त्री अडकून पडली आहे. पती निधनानंतरच्या कुप्रथा नष्ट करण्याची गरज आहे. घुंघट घेण्याचीसुद्धा आज गरज नाही, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रनिर्मितीसाठी स्त्रिया अत्यंत महत्त्वाच्या असून त्या शिक्षणाने स्वाभिमानी, स्वावलंबी होण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. प्रमुख वक्त्याच्या भाषणापूर्वी हरिश जानोरकर नागपूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बौद्ध धम्माने मेहतर समाजाला सन्मानाने वागविले. सुमित भंगी भिक्कू बनले. त्या बौद्ध धम्माचा आपण आदर केला पाहिजे. तसेच आजच्या काळात रोटी-बेटी व्यवहार झाले तर समाज जोडण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पुरुषोत्तम गायकवाड, दिनेश चिंडाले, सविता चव्हाण यांचेही मनोगत झाले. कार्यक्रमाच्या विचारपीठावर रमेश तांबे, नयन मलिक, मयूर सिंघानिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका मयूर सिंघानिया हिने केले. प्रास्ताविक विनायक व्यास याने केले तर राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले. समाजातील युवक-युवतींचा विशेष योगदानाबद्दल यावेळी सन्मान करण्यात आला. (सांस्कृतिक प्रतिनिधी)