शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या योग्य वापरासाठी माती परीक्षण आवश्यक

By admin | Updated: December 6, 2015 02:27 IST

शेतजमिनीच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य माहीत असणे आवश्यक आहे.

हंसराज अहीर : आर्णी येथे जमीन आरोग्य पत्रिकेचे शेतकऱ्यांना वितरणआर्णी : शेतजमिनीच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करून कृषी विभागाच्या सल्ल्याने पिके घ्यावी, असे आवाहन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जागतिक मृदा दिनानिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण आणि शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, राष्ट्रीय केमिकल अँण्ड फर्टिलायझर्सचे विपणन संचालक अशोक घसघसे, मुख्य महाव्यस्थापक गिरीश भोगले, कृषी विद्यापीठाचे विस्तार व शिक्षण संचालक डॉ.पी.जी. इंगोले, राजू डांगे, पंचायत समितीच्या सभापती सुनीता राठोड, आर्णी कृउबासचे सभापती जीवन जाधव आदी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, मातीचे संवर्धन संपूर्ण जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. तिचे महत्त्व ओळखून वापर केला जावा. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार पारंपरिक पीक पध्दतीसोबतच इतर पिकांचाही पर्याय स्वीकारला पाहिजे. प्रत्येकाने मातीपरिक्षण करूनच पीकपध्दती आत्मसात करावी, असे ते म्हणाले.गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी माती परिक्षण हा शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माती परिक्षणाच्या माध्यमातून सुरुवात आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ.आरती फुपाटे, आ. ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, डॉ. पी.जी. इंगोले, डॉ.नितीन खोंडे यांचीही भाषणे झाली. प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. शेतीविषयक विविध माहिती पत्रक आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुनीत मातकर यांनी केले. आभार उपविभागीय कृषी अधिकारी द.रा. कळसाईत यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)