शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

जमिनीच्या योग्य वापरासाठी माती परीक्षण आवश्यक

By admin | Updated: December 6, 2015 02:27 IST

शेतजमिनीच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य माहीत असणे आवश्यक आहे.

हंसराज अहीर : आर्णी येथे जमीन आरोग्य पत्रिकेचे शेतकऱ्यांना वितरणआर्णी : शेतजमिनीच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करून कृषी विभागाच्या सल्ल्याने पिके घ्यावी, असे आवाहन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जागतिक मृदा दिनानिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण आणि शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, राष्ट्रीय केमिकल अँण्ड फर्टिलायझर्सचे विपणन संचालक अशोक घसघसे, मुख्य महाव्यस्थापक गिरीश भोगले, कृषी विद्यापीठाचे विस्तार व शिक्षण संचालक डॉ.पी.जी. इंगोले, राजू डांगे, पंचायत समितीच्या सभापती सुनीता राठोड, आर्णी कृउबासचे सभापती जीवन जाधव आदी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, मातीचे संवर्धन संपूर्ण जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. तिचे महत्त्व ओळखून वापर केला जावा. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार पारंपरिक पीक पध्दतीसोबतच इतर पिकांचाही पर्याय स्वीकारला पाहिजे. प्रत्येकाने मातीपरिक्षण करूनच पीकपध्दती आत्मसात करावी, असे ते म्हणाले.गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी माती परिक्षण हा शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माती परिक्षणाच्या माध्यमातून सुरुवात आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ.आरती फुपाटे, आ. ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, डॉ. पी.जी. इंगोले, डॉ.नितीन खोंडे यांचीही भाषणे झाली. प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. शेतीविषयक विविध माहिती पत्रक आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुनीत मातकर यांनी केले. आभार उपविभागीय कृषी अधिकारी द.रा. कळसाईत यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)