शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
3
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
4
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
5
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

सोयाबीनला पर्याय उभा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 5:00 AM

अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे सर्वेक्षण; चार जिल्ह्यांमध्ये केला अभ्यास

n  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांनी बहुतेक क्षेत्र व्यापल्याने पिकांचा फेरपालट होण्यासाठी फारसे पर्याय राहिलेल नाही. मागील पाच वर्षातील सोयाबीन पिकांच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता सोयाबीनला पर्यायी पीक उभे करण्याची गरज दिसून येत आहे. हा निष्कर्ष यवतमाळ येथील सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनातून काढण्यात आला आहे. अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि नांदेड या जिल्ह्याच्या २२ तालुक्यातील ९४ गावात ४४२ शेतकऱ्यांच्या भेटी घेवून या विद्यार्थ्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. तसा अहवाल तयार करण्यात आला. ५० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सदोष असल्याने दुबार पेरणी करावी लागली. अशा बियाण्यांबाबत कंपन्यांसह शासकीय यंत्रणेवर कठोर कारवाई व्हावी, शक्य झाल्यास शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बियाण्यांचे संरक्षण करावे, असा निष्कर्ष सोयाबीनबाबत मांडण्यात आला आहे.देशातील शेतमालाचे दर इतर जीवनावश्यक नसणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत खूप कमी आहे. किमान उत्पन्न मिळविणाऱ्या कुटुंबालासुद्धा ते परवडणारे आहे. या दरामध्ये कुठल्याही कारणाने थोडी वाढ झाली की आकांत करणे आपण थांबविले पाहिजे, असे अहवालात नमूद केले आहे. नुकसान झाल्यानंतर पिकांचा विमा मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. विमा कंपन्यांनी तात्काळ भरपाई द्यावी, अशा सूचना शासनाने या कंपन्यांना कराव्या, अशी शेतकरी वर्गाची     विनंती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रा. घनश्याम दरणे, प्रा. सीमा शेटे, प्रा. कल्पना राऊत, प्रा. प्रशांत कराळे या संशोधक गटाने शेती आणि शेतकरी याबाबत सर्वेक्षणात अनेक निष्कर्ष काढले आहेत.या अहवालाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते समाजकार्य महाविद्यालयात झाले. अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. रमाकांत कोलते हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डाॅ. अविनाश शिर्के यांनी केले. प्रा. घनश्याम दरणे यांनी अनुभव सांगितले. संचालनाची जबाबदारी प्रा.डाॅ. सीमा शेटे यांनी पार पाडली.

टॅग्स :agricultureशेती