शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

बेंबळा प्रकल्पातील 'अमृत' निर्विघ्न टाकळीपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची कामे सुरू आहेत. पुढील काळात निळोणा, चापडोह आणि बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार आहे. 

ठळक मुद्देचार वर्षांपासूनची उत्सुकता : १८ किलोमीटरवर पाणी आणण्यात यश

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाचे पाणी टाकळी येथील फिल्टर प्लांटपर्यंत पोहोचविण्यात प्राधिकरण मंगळवारी यशस्वी झाले. विघ्नांची मालिका घेऊन एक एक टप्पा पार पाडताना चाचणी निर्विघ्न पार पडली. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास टाकळीत पाणी येऊन पोहोचल्यानंतर आता यवतमाळकरांना काही महिन्यातच या पाण्याची चव चाखायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.यवतमाळ शहराची पुढील काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता ३०२ कोटी रुपयांची अमृत योजना सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे पाणी यासाठी घेतले जाणार आहे. यासाठी बेंबळा प्रकल्पावर जॅकवेलपासून टाकळी प्रकल्पापर्यंत एक हजार मी.मी.ची पाईप लाईन टाकण्यात आली होती. यासाठी वापरलेले निकृष्ट पाईप अनेक ठिकाणी फुटले. लोकांची शेतं जलमय होऊन नुकसान झाले.संपूर्ण पाईपलाईनच सदोष असल्याने १८ किलोमीटर पाईप बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही दीर्घ कालावधी लागला. नवीन पाईपलाईनची चाचणी सुरू झाली. यातही बहुतांश ठिकाणी लिकेज निघाले. आठवडाभरापूर्वी पाईप धुवून स्वच्छ करण्यात आले. टाकळी येथील फिल्टर प्लांटमध्ये मंगळवारी पाणी सोडण्याचे ठरले. यानुसार सकाळी १०.३० वाजता जॅकवेलवरील ५७० एचपीची एक मोटर सुरू करून पाणी सुरू करण्यात आले.बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची कामे सुरू आहेत. पुढील काळात निळोणा, चापडोह आणि बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी- अमृत योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित यंत्रणेशी सतत संपर्क ठेवला. - मंगळवारी बेंबळाचे पाणी फिल्टर प्लांटवर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची गती वाढविण्याची अपेक्षा त्यांनी केली.- योजनेच्या अनेक कामांचाही आढावा त्यांनी संबंधित यंत्रणेकडून घेतला. योजनेसंबंधी अनेक विषयांची माहिती त्यांनी जाणून घेतली. 

यवतमाळकरांना तीन महिने प्रतीक्षाबेंबळाचे पाणी मिळण्यासाठी यवतमाळकरांना आणखी किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. फिल्टर प्लांटचे आणखी १५ ते २० टक्के काम शिल्लक आहे. शिवाय टाकळीपासून प्राधिकरणाच्या गोदणी रोडवरील कार्यालयापर्यंत टाकण्यात आलेल्या ८०० एमएम पाईपची पूर्ण चाचणी व्हायची आहे.

कामाची गती अजूनही संथअमृत योजनेचे काम नाशिकच्या आडके कंपनीला देण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे. योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षांपूर्वीच संपला. पालकमंत्री, प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी या कंत्राटदाराला तंबी दिली. शिवसैनिकांनी आंदोलन केले. अजूनही कामाची अपेक्षित गती वाढलेली नाही. कंत्राटदाराच्या कामाची गती आता आहे तशीच राहिल्यास योजना पूर्ण होण्याचा कालावधी लांबणीवर पडणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

तर २४ तास पाणी मिळेल पण...अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर यवतमाळकरांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. तीनही मुख्य संतुलन टाक्यांची कामे पूर्ण व्हायची आहेत. एका टाकीचे बांधकामच सुरू आहे. मोटर पंपासाठी आवश्यक तेवढी वीज उपलब्ध नाही. पम्प हाऊसचे काम पूर्ण झालेले नाही.

दर वाढण्याचे संकेतबेंबळा प्रकल्पाचे पाणी सुरू झाल्यानंतर पाण्याचे दर वाढण्याचे संकेत मिळाले आहे. या योजनेचा खर्च अवाढव्य आहे. विदुयत बिलासाठीच सध्या दरमहा पाच लाख रुपये मोजावे लागत आहे. आणखी सहा पंपासाठी वीज घ्यावी लागणार आहे. इतर प्रकारचाही खर्च वाढणार असल्याने पाण्याचे दरही चांगलेच फुगेल, असे दिसते.

 

टॅग्स :WaterपाणीBembla Damबेंबळा धरण