शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळा प्रकल्पातील 'अमृत' निर्विघ्न टाकळीपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची कामे सुरू आहेत. पुढील काळात निळोणा, चापडोह आणि बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार आहे. 

ठळक मुद्देचार वर्षांपासूनची उत्सुकता : १८ किलोमीटरवर पाणी आणण्यात यश

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाचे पाणी टाकळी येथील फिल्टर प्लांटपर्यंत पोहोचविण्यात प्राधिकरण मंगळवारी यशस्वी झाले. विघ्नांची मालिका घेऊन एक एक टप्पा पार पाडताना चाचणी निर्विघ्न पार पडली. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास टाकळीत पाणी येऊन पोहोचल्यानंतर आता यवतमाळकरांना काही महिन्यातच या पाण्याची चव चाखायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.यवतमाळ शहराची पुढील काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता ३०२ कोटी रुपयांची अमृत योजना सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे पाणी यासाठी घेतले जाणार आहे. यासाठी बेंबळा प्रकल्पावर जॅकवेलपासून टाकळी प्रकल्पापर्यंत एक हजार मी.मी.ची पाईप लाईन टाकण्यात आली होती. यासाठी वापरलेले निकृष्ट पाईप अनेक ठिकाणी फुटले. लोकांची शेतं जलमय होऊन नुकसान झाले.संपूर्ण पाईपलाईनच सदोष असल्याने १८ किलोमीटर पाईप बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही दीर्घ कालावधी लागला. नवीन पाईपलाईनची चाचणी सुरू झाली. यातही बहुतांश ठिकाणी लिकेज निघाले. आठवडाभरापूर्वी पाईप धुवून स्वच्छ करण्यात आले. टाकळी येथील फिल्टर प्लांटमध्ये मंगळवारी पाणी सोडण्याचे ठरले. यानुसार सकाळी १०.३० वाजता जॅकवेलवरील ५७० एचपीची एक मोटर सुरू करून पाणी सुरू करण्यात आले.बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची कामे सुरू आहेत. पुढील काळात निळोणा, चापडोह आणि बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी- अमृत योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित यंत्रणेशी सतत संपर्क ठेवला. - मंगळवारी बेंबळाचे पाणी फिल्टर प्लांटवर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची गती वाढविण्याची अपेक्षा त्यांनी केली.- योजनेच्या अनेक कामांचाही आढावा त्यांनी संबंधित यंत्रणेकडून घेतला. योजनेसंबंधी अनेक विषयांची माहिती त्यांनी जाणून घेतली. 

यवतमाळकरांना तीन महिने प्रतीक्षाबेंबळाचे पाणी मिळण्यासाठी यवतमाळकरांना आणखी किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. फिल्टर प्लांटचे आणखी १५ ते २० टक्के काम शिल्लक आहे. शिवाय टाकळीपासून प्राधिकरणाच्या गोदणी रोडवरील कार्यालयापर्यंत टाकण्यात आलेल्या ८०० एमएम पाईपची पूर्ण चाचणी व्हायची आहे.

कामाची गती अजूनही संथअमृत योजनेचे काम नाशिकच्या आडके कंपनीला देण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे. योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षांपूर्वीच संपला. पालकमंत्री, प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी या कंत्राटदाराला तंबी दिली. शिवसैनिकांनी आंदोलन केले. अजूनही कामाची अपेक्षित गती वाढलेली नाही. कंत्राटदाराच्या कामाची गती आता आहे तशीच राहिल्यास योजना पूर्ण होण्याचा कालावधी लांबणीवर पडणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

तर २४ तास पाणी मिळेल पण...अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर यवतमाळकरांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. तीनही मुख्य संतुलन टाक्यांची कामे पूर्ण व्हायची आहेत. एका टाकीचे बांधकामच सुरू आहे. मोटर पंपासाठी आवश्यक तेवढी वीज उपलब्ध नाही. पम्प हाऊसचे काम पूर्ण झालेले नाही.

दर वाढण्याचे संकेतबेंबळा प्रकल्पाचे पाणी सुरू झाल्यानंतर पाण्याचे दर वाढण्याचे संकेत मिळाले आहे. या योजनेचा खर्च अवाढव्य आहे. विदुयत बिलासाठीच सध्या दरमहा पाच लाख रुपये मोजावे लागत आहे. आणखी सहा पंपासाठी वीज घ्यावी लागणार आहे. इतर प्रकारचाही खर्च वाढणार असल्याने पाण्याचे दरही चांगलेच फुगेल, असे दिसते.

 

टॅग्स :WaterपाणीBembla Damबेंबळा धरण