शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

दारव्हा येथे राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:22 IST

केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देएसडीओ कार्यालयावर धडक : केंद्र व राज्य सरकारचा निषेधलोकमत न्यूज नेटवर्क

दारव्हा : केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.स्थानिक गजानन महाराज मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक चौक, गोळीबार चौक, तेलीपुरा, पोस्ट आॅफिस चौक मार्गे हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला संबोधित करताना संयोजक व प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांवर आसूड ओढला. किती घोषणांची अंमलबजावणी झाली याचे उत्तर सरकारने द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या, शेतातील सर्व कामे मनरेगा अंतर्गत करावी, शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, फवारणीबाधित शेतकरी कुटुंबांना दहा लाखांची मदत द्यावी, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी मंचावर आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नीमिष मानकर, आर्णी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, अ‍ॅड. आशीष देशमुख आदी उपस्थित होते.भर उन्हात या मोर्चात दारव्हा, दिग्रस, नेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. गेल्या १६ एप्रिलपासून राष्ट्रवादीने या तीनही तालुक्यात हल्लाबोल आंदोलन सुरू केले. शुक्रवारच्या मोर्चाने या आंदोलनाचा समारोप झाला.अनेक पदाधिकारी उशिरा पोहोचलेया आंदोलनात राष्ट्रवादीचे अनेक माजी मंत्री, पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र माजी मंत्री अनिल देशमुख सभास्थळी पोहोचले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करताना केवळ घोषणांचा बाजार मांडणाºया शासनामुळे शेतकरी व जनतेचे हाल होत असल्याचा आरोप केला. केंद्र व राज्य सरकार शेतकºयांपेक्षा उद्योगपतींचेच असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईकही उशिराने सभास्थळी पोहोचले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस