शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दारव्हा येथे राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:22 IST

केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देएसडीओ कार्यालयावर धडक : केंद्र व राज्य सरकारचा निषेधलोकमत न्यूज नेटवर्क

दारव्हा : केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.स्थानिक गजानन महाराज मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक चौक, गोळीबार चौक, तेलीपुरा, पोस्ट आॅफिस चौक मार्गे हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला संबोधित करताना संयोजक व प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांवर आसूड ओढला. किती घोषणांची अंमलबजावणी झाली याचे उत्तर सरकारने द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या, शेतातील सर्व कामे मनरेगा अंतर्गत करावी, शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, फवारणीबाधित शेतकरी कुटुंबांना दहा लाखांची मदत द्यावी, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी मंचावर आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नीमिष मानकर, आर्णी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, अ‍ॅड. आशीष देशमुख आदी उपस्थित होते.भर उन्हात या मोर्चात दारव्हा, दिग्रस, नेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. गेल्या १६ एप्रिलपासून राष्ट्रवादीने या तीनही तालुक्यात हल्लाबोल आंदोलन सुरू केले. शुक्रवारच्या मोर्चाने या आंदोलनाचा समारोप झाला.अनेक पदाधिकारी उशिरा पोहोचलेया आंदोलनात राष्ट्रवादीचे अनेक माजी मंत्री, पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र माजी मंत्री अनिल देशमुख सभास्थळी पोहोचले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करताना केवळ घोषणांचा बाजार मांडणाºया शासनामुळे शेतकरी व जनतेचे हाल होत असल्याचा आरोप केला. केंद्र व राज्य सरकार शेतकºयांपेक्षा उद्योगपतींचेच असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईकही उशिराने सभास्थळी पोहोचले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस