शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दारव्हा येथे राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:22 IST

केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देएसडीओ कार्यालयावर धडक : केंद्र व राज्य सरकारचा निषेधलोकमत न्यूज नेटवर्क

दारव्हा : केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.स्थानिक गजानन महाराज मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक चौक, गोळीबार चौक, तेलीपुरा, पोस्ट आॅफिस चौक मार्गे हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला संबोधित करताना संयोजक व प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांवर आसूड ओढला. किती घोषणांची अंमलबजावणी झाली याचे उत्तर सरकारने द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या, शेतातील सर्व कामे मनरेगा अंतर्गत करावी, शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, फवारणीबाधित शेतकरी कुटुंबांना दहा लाखांची मदत द्यावी, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी मंचावर आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नीमिष मानकर, आर्णी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, अ‍ॅड. आशीष देशमुख आदी उपस्थित होते.भर उन्हात या मोर्चात दारव्हा, दिग्रस, नेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. गेल्या १६ एप्रिलपासून राष्ट्रवादीने या तीनही तालुक्यात हल्लाबोल आंदोलन सुरू केले. शुक्रवारच्या मोर्चाने या आंदोलनाचा समारोप झाला.अनेक पदाधिकारी उशिरा पोहोचलेया आंदोलनात राष्ट्रवादीचे अनेक माजी मंत्री, पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र माजी मंत्री अनिल देशमुख सभास्थळी पोहोचले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करताना केवळ घोषणांचा बाजार मांडणाºया शासनामुळे शेतकरी व जनतेचे हाल होत असल्याचा आरोप केला. केंद्र व राज्य सरकार शेतकºयांपेक्षा उद्योगपतींचेच असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईकही उशिराने सभास्थळी पोहोचले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस