शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण; तरीही वाहनधारकांना बसतोय टोलचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 22:02 IST

तत्कालीन प्रकल्प संचालकांनी चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे शेतकरी योग्य मोबदल्यासाठी उच्च न्यायालयात गेले आहे. निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन किलोमीटर अंतरात अद्याप रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. नांदेडवरून निघालेले वाहन अतिशय खडतर रस्त्याने प्रवास करत, भांब येथील टोल नाक्यापर्यंत येत आहे. वाहनधारकांना वाहतुकीयोग्य रस्ता मिळत नाही. मात्र, त्यांना टोल भरावा लागत आहे. हा अन्याय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नागपूर-बोरी-तुळजापूर या नॅशनल हायवे ३६१ चे महागाव ते वारंगा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे, परंतु या रस्त्यावरून समोर नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना नाहक टोल द्यावा लागत आहे. रस्ता पूर्ण होण्याआधीच महागाव ते यवतमाळ रस्त्यावर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. रस्ता अपूर्ण असताना, टोलचा भुर्दंड भरावा लागत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‘नॅशनल हायवे की मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले. महागाव ते वारंगा दरम्यान काम करणाऱ्या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. याच रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि बायपास रस्त्यावरील कामे सुरळीत करण्यासाठी नव्याने निविदा बोलावण्यात आली आहे.महागाव ते यवतमाळ रस्त्यावरील हिवरा संगम येथील बायपासवर असलेल्या शेतकऱ्यांचा तत्कालीन प्रकल्प संचालकांनी चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे शेतकरी योग्य मोबदल्यासाठी उच्च न्यायालयात गेले आहे. निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन किलोमीटर अंतरात अद्याप रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. नांदेडवरून निघालेले वाहन अतिशय खडतर रस्त्याने प्रवास करत, भांब येथील टोल नाक्यापर्यंत येत आहे. वाहनधारकांना वाहतुकीयोग्य रस्ता मिळत नाही. मात्र, त्यांना टोल भरावा लागत आहे. हा अन्याय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.महागाव ते वारंगा हा रस्ता नॅशनल हायवे प्रकल्प संचालक नांदेड कार्यालयांतर्गत येतो. प्रकल्प संचालकांचा वेळकाढूपणा वाहनधारकांची डोकेदुखी बनला आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे चार वर्षांपासून रस्त्यावरील एकही पूल पूर्णत्वाला गेला नाही. त्यामुळे नांदेड ते नागपूर जाणारे वाहनधारक केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडू लागले आहेत.

अर्धवट महामार्गामुळे वाहतूक कोंडी- उमरखेड : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग उमरखेड शहराच्या बाहेरून जातो. ढाणकी रस्त्याला क्रॉस करणाऱ्या जागी हा महामार्ग अर्धवट आहे. उड्डाणपूलही अर्धवट आहे. त्यामुळे तीनही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना वाहन समोर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे.- नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. कंपनी निकृष्ट आणि अर्धवट काम करीत असून महामार्गाचे काम वाऱ्यावर सोडून कंपनी कामात वेळखाऊपणा करीत आहे. यापूर्वी हदगाव तालुक्यातील गोजेगाव पुलाजवळ रात्रभर वाहतूक ठप्प पडली होती. गोजेगाव येथेसुद्धा पुलाचे काम अर्धवट पडलेले आहे. तेथील रस्ता हा चिखलमय झाला आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यात साचलेल्या चिखलात रात्रभर ट्रक अडकला होता. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना संपूर्ण रात्र अडकून पडावे लागले होते.

 

टॅग्स :highwayमहामार्गFarmerशेतकरी