शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शिक्षण दिन; शिक्षण दिनी तरी येणार का नवे शैक्षणिक धोरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:58 IST

गेल्या दोन वर्षांपासून देशाला नव्या शैक्षणिक धोरणाचे वेध लागले आहे. नव्या धोरणाचा मसुदा तयार झाला असून सोमवारी राष्ट्रीय शिक्षण दिनी हे धोरण जाहीर होईल का, याबाबत शिक्षणप्रेमींना आस लागली आ

ठळक मुद्देदेशभरात शैक्षणिक कार्यक्रमांचे केंद्र शासनाचे निर्देश

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून देशाला नव्या शैक्षणिक धोरणाचे वेध लागले आहे. नव्या धोरणाचा मसुदा तयार झाला असून सोमवारी राष्ट्रीय शिक्षण दिनी हे धोरण जाहीर होईल का, याबाबत शिक्षणप्रेमींना आस लागली आहे. केंद्र शासनाने सोमवारी देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिल्याने ही आशा अधिक बळावली आहे.देशाचे पहिले शिक्षणमंत्री, स्वातंत्र्य सैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जन्मदिन देशभरात ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या राष्ट्रीय शिक्षण दिनाबाबत फारसे कुठेच औत्सुक्य दिसत नाही. मात्र यंदा पहिल्यांदाच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना राष्ट्रीय शिक्षण दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. १५ आॅक्टोबर रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, प्रत्येक शाळेत शैक्षणिक परिसंवाद, कार्यशाळा, निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम घेतले जाणार आहे.दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून देशाचे शैक्षणिक धोरण बदलण्याचे प्रयत्न केंद्र शासनाने सुरू केले आहेत. त्यासाठी संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया, सूचना मागविण्यात आल्या. अगदी गावपातळीपर्यंत त्यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. दरम्यानच्या काळात मोदी सरकारची पहिली टर्म संपून ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. याच काळात शैक्षणिक धोरणाचा मसुदाही अंतिम झाला. दरम्यानच्या काळात आचारसंहिता संपल्यानंतर नवे धोरण जाहीर केले जाईल, असे सूतोवाच तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले होते.आता सोमवारी राष्ट्रीय शिक्षण दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याबाबत केंद्राने विशेष निर्देश दिल्यामुळे याच दिवशी नवे शैक्षणिक धोरणही जाहीर केले जाईल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.अनेक बदलांचे वेधकस्तुरीरंगन समितीने तयार केलेला नव्या शैक्षणिक धोरणांचा मसुदा जून महिन्यातच जनतेच्या हरकती आणि सूचनांसाठी खुला करण्यात आला होता. या मसुद्यातील ठळक मुद्दे बघता, नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षण क्षेत्रात मुलभूत बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रीय शिक्षण आयोग नेमका कसा असेल, शिक्षणाचा बदललेला आकृतीबंध किती परिणामकारक ठरेल, आरटीई बारावीपर्यंत लागू झाल्यास कोणत्या घटकांना कितपत न्याय मिळेल आदी मुद्द्यांबाबत जनतेत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Educationशिक्षण