शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

माझे कुटुंब... जुनेच काम नवीन नाव; कर्मचारी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 21:49 IST

कोविड नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे महत्वाकांक्षी अभियान राज्य शासनाने सुरू केले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच होते. मग त्याला केवळ नवीन नाव देऊन अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक आणि ग्रामीण कर्मचाऱ्यांवर अनाठायी ताण का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या बनवाबनवीला शासन फसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोविड नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे महत्वाकांक्षी अभियान राज्य शासनाने सुरू केले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच होते. मग त्याला केवळ नवीन नाव देऊन अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक आणि ग्रामीण कर्मचाऱ्यांवर अनाठायी ताण का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्या आधीपासून दररोज गावागावात सर्वेक्षण केले जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्याच निर्देशानुसार या कामाचे दरदिवशी गाव ते तालुका, जिल्हा ते राज्य पातळीपर्यंत रिपोर्टिंग केले जात आहे. त्यात नागरिकांची आरोग्य तपासणी, ऑक्सीजन लेव्हल, सारीची लक्षणे, एएनसी, पीएनसी, हायपर टेन्शन, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग आदींसह को-मॉर्बिडचीही नोंद घेतली जात आहे. आता हेच काम ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे नवे नामकरण करून केले जात आहे. शिवाय या कामात स्थानिक लोकप्रतिनिधींची स्वयंसेवक समाविष्ट करण्याच्या नावाखाली आरोग्य अभियानाला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न होत आहे.दरम्यान शासनाला अंधारात ठेवून माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानासाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी खर्च केला. कार्यकर्त्यांसाठी टी-शर्ट तयार ठेवले. मात्र हा खर्च ‘अधिकृत’ करण्यासाठीच जुन्या कामाला नवे नाव देऊन मुख्यमंत्र्यांच्या गळी ही योजना उतरविल्याचा आरोप ग्रामीण भागातील कर्मचारी करीत आहे.आरोग्य अधिकाऱ्यांचे संगणक तपासा‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानात सध्या जी माहिती गोळा करून दररोज मागविली जात आहे, ही माहिती आधीच प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या संगणकात जमा आहे. ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत दरदिवशी झालेल्या सर्व्हेतील याद्या तयार असूनही नव्याने सर्वेक्षण का केले जात आहे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. शिवाय या अभियानात गावकरी सहकार्य करीत नसल्याचीही त्यांची व्यथा आहे. महत्वाचे म्हणजे अभियानात गुंतविल्याने आशा, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि शिक्षकही संतप्त आहे. अभियानातून राज्य शासन राज्याचा आरोग्य नकाशा करण्याच्या गोष्टी करीत आहे. मात्र प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडील आधीच्या याद्या त्यासाठी पुरेशा असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस