शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

माझे कुटुंब... जुनेच काम नवीन नाव; कर्मचारी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 21:49 IST

कोविड नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे महत्वाकांक्षी अभियान राज्य शासनाने सुरू केले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच होते. मग त्याला केवळ नवीन नाव देऊन अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक आणि ग्रामीण कर्मचाऱ्यांवर अनाठायी ताण का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या बनवाबनवीला शासन फसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोविड नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे महत्वाकांक्षी अभियान राज्य शासनाने सुरू केले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच होते. मग त्याला केवळ नवीन नाव देऊन अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक आणि ग्रामीण कर्मचाऱ्यांवर अनाठायी ताण का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्या आधीपासून दररोज गावागावात सर्वेक्षण केले जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्याच निर्देशानुसार या कामाचे दरदिवशी गाव ते तालुका, जिल्हा ते राज्य पातळीपर्यंत रिपोर्टिंग केले जात आहे. त्यात नागरिकांची आरोग्य तपासणी, ऑक्सीजन लेव्हल, सारीची लक्षणे, एएनसी, पीएनसी, हायपर टेन्शन, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग आदींसह को-मॉर्बिडचीही नोंद घेतली जात आहे. आता हेच काम ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे नवे नामकरण करून केले जात आहे. शिवाय या कामात स्थानिक लोकप्रतिनिधींची स्वयंसेवक समाविष्ट करण्याच्या नावाखाली आरोग्य अभियानाला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न होत आहे.दरम्यान शासनाला अंधारात ठेवून माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानासाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी खर्च केला. कार्यकर्त्यांसाठी टी-शर्ट तयार ठेवले. मात्र हा खर्च ‘अधिकृत’ करण्यासाठीच जुन्या कामाला नवे नाव देऊन मुख्यमंत्र्यांच्या गळी ही योजना उतरविल्याचा आरोप ग्रामीण भागातील कर्मचारी करीत आहे.आरोग्य अधिकाऱ्यांचे संगणक तपासा‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानात सध्या जी माहिती गोळा करून दररोज मागविली जात आहे, ही माहिती आधीच प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या संगणकात जमा आहे. ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत दरदिवशी झालेल्या सर्व्हेतील याद्या तयार असूनही नव्याने सर्वेक्षण का केले जात आहे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. शिवाय या अभियानात गावकरी सहकार्य करीत नसल्याचीही त्यांची व्यथा आहे. महत्वाचे म्हणजे अभियानात गुंतविल्याने आशा, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि शिक्षकही संतप्त आहे. अभियानातून राज्य शासन राज्याचा आरोग्य नकाशा करण्याच्या गोष्टी करीत आहे. मात्र प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडील आधीच्या याद्या त्यासाठी पुरेशा असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस