शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

नगरपरिषद विभागीय कार्यालये बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:23 IST

शहराच्या विस्तारानंतर सात ग्रामपंचायतींचा नगपरिषदेत समावेश झाला आहे. या सातही ग्रामपंचायत कार्यालयांना नगरपरिषदेने विभागीय कार्यालयाचा दर्जा दिला. मात्र, दोन वर्षे लोटूनही या विभागीय कार्यालयांची नगरपरिषद मुख्य कार्यालयाशी नाळ जुळलेली नाही.

ठळक मुद्देसेवा कोलमडली : हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांपुढे समस्यांचा डोंगर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या विस्तारानंतर सात ग्रामपंचायतींचा नगपरिषदेत समावेश झाला आहे. या सातही ग्रामपंचायत कार्यालयांना नगरपरिषदेने विभागीय कार्यालयाचा दर्जा दिला. मात्र, दोन वर्षे लोटूनही या विभागीय कार्यालयांची नगरपरिषद मुख्य कार्यालयाशी नाळ जुळलेली नाही. येथील कारभार अनियंत्रित असून दैनंदिन सेवा कोलमडली आहे.नगरपरिषदेने भोसा, उमरसरा, वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव आणि मोहा येथे विभागीय कार्यालय थाटले आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायतीची यंत्रणा जशीच्या तशीच पालिकेत सामावून घेण्यात आली. यामुळे येथील प्रशासकीय घडी पूर्णत: विस्कटलेली आहे. यातच पालिकेत नवीन कर्मचारी व अधिकारी रुजू झाले. अनेक वर्षांपासून प्रमुख म्हणून काम करणारी लिपिकवर्गीय यंत्रणा नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांवर शिरजोर झाली आहे. नवीन अधिकारीसुद्धा पगारापुरतेच राबत असल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. नगरसेवक व पदाधिकारी रखडलेल्या कामकाजाबाबत प्रत्येक सभेत, बैठकीत पोटतिडकीने बोलतात. मात्र, याचा परिणाम होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, पालिकेतील एकाही बैठकीला विभागीय कार्यालयातील तथाकथित प्रमुख उपस्थित नसतात. त्यामुळे आरोग्य विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, बाजार विभाग यांच्याशी निगडित कोणते प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले, हे थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.अडीच लाख लोकसंख्येचे शहर आणि हजाराच्या घरातील कर्मचारी या सर्वांवर एकट्या मुख्याधिकाºयांना नियंत्रण ठेवताना प्रचंड कसरत करावी लागते. दिल्ली, मुबंई, अमरावती आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकांतून वेळ मिळाल्यानंतरच मुख्याधिकाºयांना त्यांचे प्रशासकीय कामकाज करता येते. यामुळे प्रत्येक विभागाचा आढावा घेणे शक्य होत नाही. विभागीय कार्यालयांना कुणामार्फतच आदेश पोहोचत नसल्याने त्यांच्या कामाची गती अतिशय ढिम्म आहे. अनेक भागात नियमित कचरा संकलन केले जात नाही. प्रभागातील शिपाई व सफाई कर्मचारी काय करतात, कुठे असतात, याचा कुणालाच पत्ता नाही. विभागीय कार्यालये उघडतात केव्हा, बंद कधी होतात, याचेही वेळापत्रक नाही. प्रशासकीय कार्यालयांची कोणतीच शिस्त येथे पाहायला मिळत नाही. तक्रारी करूनही प्रतिसाद नसल्याने नागरिकांना कर्मचाºयांच्या सोयीनेच काम करून घ्यावे लागत आहे.कर भरणाऱ्यांनाही पाठविले जाते परतनगरपरिषदेला प्रचंड आर्थिक चणचण भासत आहे. अशा स्थितीतही विभागीय कार्यालयात कराचा भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत पाठविले जाते. ठराविक वेळेत कर स्वीकारला जातो, असा स्वयंघोषित नियम येथील कर्मचाऱ्यांनी करून ठेवला आहे. यावरून इतर कोणती कामे वेळेवर होत असतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.