शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नगरपरिषद विभागीय कार्यालये बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:23 IST

शहराच्या विस्तारानंतर सात ग्रामपंचायतींचा नगपरिषदेत समावेश झाला आहे. या सातही ग्रामपंचायत कार्यालयांना नगरपरिषदेने विभागीय कार्यालयाचा दर्जा दिला. मात्र, दोन वर्षे लोटूनही या विभागीय कार्यालयांची नगरपरिषद मुख्य कार्यालयाशी नाळ जुळलेली नाही.

ठळक मुद्देसेवा कोलमडली : हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांपुढे समस्यांचा डोंगर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या विस्तारानंतर सात ग्रामपंचायतींचा नगपरिषदेत समावेश झाला आहे. या सातही ग्रामपंचायत कार्यालयांना नगरपरिषदेने विभागीय कार्यालयाचा दर्जा दिला. मात्र, दोन वर्षे लोटूनही या विभागीय कार्यालयांची नगरपरिषद मुख्य कार्यालयाशी नाळ जुळलेली नाही. येथील कारभार अनियंत्रित असून दैनंदिन सेवा कोलमडली आहे.नगरपरिषदेने भोसा, उमरसरा, वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव आणि मोहा येथे विभागीय कार्यालय थाटले आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायतीची यंत्रणा जशीच्या तशीच पालिकेत सामावून घेण्यात आली. यामुळे येथील प्रशासकीय घडी पूर्णत: विस्कटलेली आहे. यातच पालिकेत नवीन कर्मचारी व अधिकारी रुजू झाले. अनेक वर्षांपासून प्रमुख म्हणून काम करणारी लिपिकवर्गीय यंत्रणा नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांवर शिरजोर झाली आहे. नवीन अधिकारीसुद्धा पगारापुरतेच राबत असल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. नगरसेवक व पदाधिकारी रखडलेल्या कामकाजाबाबत प्रत्येक सभेत, बैठकीत पोटतिडकीने बोलतात. मात्र, याचा परिणाम होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, पालिकेतील एकाही बैठकीला विभागीय कार्यालयातील तथाकथित प्रमुख उपस्थित नसतात. त्यामुळे आरोग्य विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, बाजार विभाग यांच्याशी निगडित कोणते प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले, हे थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.अडीच लाख लोकसंख्येचे शहर आणि हजाराच्या घरातील कर्मचारी या सर्वांवर एकट्या मुख्याधिकाºयांना नियंत्रण ठेवताना प्रचंड कसरत करावी लागते. दिल्ली, मुबंई, अमरावती आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकांतून वेळ मिळाल्यानंतरच मुख्याधिकाºयांना त्यांचे प्रशासकीय कामकाज करता येते. यामुळे प्रत्येक विभागाचा आढावा घेणे शक्य होत नाही. विभागीय कार्यालयांना कुणामार्फतच आदेश पोहोचत नसल्याने त्यांच्या कामाची गती अतिशय ढिम्म आहे. अनेक भागात नियमित कचरा संकलन केले जात नाही. प्रभागातील शिपाई व सफाई कर्मचारी काय करतात, कुठे असतात, याचा कुणालाच पत्ता नाही. विभागीय कार्यालये उघडतात केव्हा, बंद कधी होतात, याचेही वेळापत्रक नाही. प्रशासकीय कार्यालयांची कोणतीच शिस्त येथे पाहायला मिळत नाही. तक्रारी करूनही प्रतिसाद नसल्याने नागरिकांना कर्मचाºयांच्या सोयीनेच काम करून घ्यावे लागत आहे.कर भरणाऱ्यांनाही पाठविले जाते परतनगरपरिषदेला प्रचंड आर्थिक चणचण भासत आहे. अशा स्थितीतही विभागीय कार्यालयात कराचा भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत पाठविले जाते. ठराविक वेळेत कर स्वीकारला जातो, असा स्वयंघोषित नियम येथील कर्मचाऱ्यांनी करून ठेवला आहे. यावरून इतर कोणती कामे वेळेवर होत असतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.