शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या नावाने गाळ वीटभट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता क्षतीग्रस्त झाला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात न जाता निम्मा गाळ दारव्हा आणि यवतमाळच्या दिशेने दररोज वळता होत आहे.

ठळक मुद्देमातीची साठवणूक : गोकी धरणातील गाळ चालला दारव्हा, यवतमाळकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या नावावर वीटभट्टी चालकांनी मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू केले आहे. क्षमतेपेक्षा अधिक गाळाची ने-आण होत आहे. यातून शासनाच्या तिजोरीला फटका बसला आहे. तहसील प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दारव्हा तालुक्यातील गोकी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. हा गाळ शेतजमिनीसाठी सुपीक आहे. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना गाळ काढता आला. व्यापाऱ्यांनी या गाळावर आपली नजर वळविली आहे. विटभट्टीकरिता शेतकऱ्याच्या नावावर अर्धा गाळ वळता केला आहे. शहराबाहेर हा गाळ डम्प केला जात आहे.धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता क्षतीग्रस्त झाला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात न जाता निम्मा गाळ दारव्हा आणि यवतमाळच्या दिशेने दररोज वळता होत आहे.तहसीलदार येणार असल्याची पूर्वसूचनागोकी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अवैध उत्खननाचा मुद्दा माध्यमातून चर्चेला आल्यानंतर दारव्हाचे प्रभारी तहसीलदार संजय जाधव यांनी अकस्मात या उत्खननावर धाड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार साहेब येणार याची पूर्वसूचना उत्खनन करणाºयांना मिळाल्याने ते सावध झाले होते. उत्खननासाठी वापरणारे जेसीबी व ट्रक परिसरातच उभे होते. मात्र ही वाहने सोडून चालक व मालक तेथून पसार झाले होते. तहसीलदारांना केवळ खोदलेला परिसर व उभी असलेली वाहने हेच पाहावयास मिळाले. आता यात तहसीलदारांकडून कोणावर काय कारवाई होते, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.परवानगी केवळ ४०० ब्रासचीचगोकी प्रकल्पातून ४०० ब्रास गाळ काढण्याला परवानगी कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. या परवानगीच्या आधारे ३१ मेपर्यंत हा गाळ काढण्याच्या सूचना संबंधितांना प्रभारी तहसीलदारांनी दिल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. दोन वीटभट्टी चालकांना १६० रूपये ब्रासप्रमाणे गाळ नेण्यास मुभा आहे. या भागात ३० ते ४० टिप्पर आणि सहा जेसीबी गाळ काढण्याचे काम करीत आहे. याबाबत प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले आहे.मी मंडळ अधिकाऱ्याला पाहणीसाठी पाठविले होते. त्याने दोन जेसीबी आणि काही वाहन असल्याचे म्हटले. त्यातही एक जेसीबी बंद असल्याचे सांगितले. मी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने दिसली. मात्र वाहनचालक पसार झाले होते.- संजय जाधव,प्रभारी तहसीलदार, दारव्हादरवर्षी ५०० ब्रासपर्यंत परवानगी जाते. यावर्षी कोरोनामुळे त्यात घट झाली. ४०० ब्रासला परवानगी दिली. नव्याने ९०० ब्रास उत्खननासाठी अर्ज आले आहेत. त्याची परवानगी बाकी आहे. पाटबंधारे विभाग परवानगी देते तोच व्यक्ती माती उचलत आहे किंवा नाही याची जबाबदारी तहसीलची आहे.- अशोक डगवार, शाखा अभियंता, गोकी प्रकल्प, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी