शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
7
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
8
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
9
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
10
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
11
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
12
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
13
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
14
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
15
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
16
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
17
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
18
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
19
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
20
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली

महाळुंगी ग्रामस्थांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

माहाळुंगी गावात मागील अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. पिण्याजोगे पाणी नागरिकांना मिळत नाही. गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात येत नाही. गावात बहुतांश भागात सांडपाण्यासाठी नाल्याच नाही. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

ठळक मुद्देआर्णी पंचायत समिती : पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा ठिय्या, बीडीओंचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील माहाळुंगी येथे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पंचायत समिती प्रशासनाला वारंवार निवेदन व मागण्या करूनही कोणतीच उपाययोजना झाली नाही. भर पावसाळ्यात पिण्याकरिता शुद्ध पाणी नसल्याने येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अखेर संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली.माहाळुंगी गावात मागील अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. पिण्याजोगे पाणी नागरिकांना मिळत नाही. गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात येत नाही. गावात बहुतांश भागात सांडपाण्यासाठी नाल्याच नाही. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आरोग्यवर परिणाम होत आहे. अनेक घरांमध्ये तापाचे रुग्ण आढळत आहे. या समस्या दूर करण्यात याच्या यासाठी पंचायत समिती प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. मात्र याची कुणीच दखल घेतली नाही. ग्रामपंचायत प्रशासन गावात कुठेच दिसत नाही. ग्रामसेवक गावाकडे कधी फिरकत नाही. अशा स्थितीमुळे गावातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महिला व पुरुषांनी डफडे वाजवत आर्णी पंचायत समितीवर धडक दिली. महिलांनी हातात रिकामे हांडे घेवून पंचायत समिती कार्यालयात ठिय्या दिला. यानंतर गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी महिलांना माहाळुंगी येथे येवून परिस्थितीची पाहणी करील व तातडीने उपाययोजना केल्या जाईल, असे आश्वासन दिले.आंदोलनात आशाबाई जाधव, मुक्ता जाधव, संगीता राठोड, कमला, शिला चव्हाण, ललिता राठोड, पंची आडे, पिपंळी पवार, उत्तम राठोड, धनराज राठोड, विजय राठोड, भुषण चव्हाण, दिलीप राठोड, दत्ता राठोड, अरविंद चव्हाण, देवा आडे, लखन पवार यांच्यासह माहाळुंगी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समस्या न सुटल्यास ग्रामस्थांनी याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीwater shortageपाणीकपात