शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६६४ विहिरी अधिग्रहणाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 21:26 IST

जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे.

ठळक मुद्देप्रश्न पाणीटंचाईचा : भूजल सर्वेक्षणला मुबलक जलस्त्रोतांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासोबतच मुबलक पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या ठिकाणाचा शोधही भूजल सर्वेक्षण विभाग घेत आहे.यावर्षी जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार आहे. त्यावर मात करण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. यामध्ये कळंब तालुक्यात ९३, दारव्हा ३५, यवतमाळ ६४, नेर १७, पांढरकवडा २३, बाभूळगाव ३३, दिग्रस ४३, वणी ६, उमरखेड ५४, आर्णी ८१, घाटंजी ३५, मारेगाव १४, पुसद ४४, राळेगाव ५, महागाव १०३, झरी १६ आणि वणी तालुक्यातील ८ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे.या विहिरींवरून पाणीटंचाईग्रस्त भागात पाणी पोहचविण्यासाठी ८९ टँकरची मदत घेतली जाणार आहे. त्यामध्ये कळंब ६, दारव्हा ५, यवतमाळ १२, बाभूळगाव ४, वणी २, नेर ५, उमरखेड २, महागाव २, आर्णी ११, पुसद १८, घाटंजी ४, मारेगाव १, पांढरकवडा २, दिग्रस ९, झरी ६ टँकरची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने टँकरचे नियोजनही जिल्हा परिषदेने केले आहे. गरज भासताच हे टँकर सुरू केले जाणार आहेत. यंदा पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने तगड्या उपाययोजना आखल्या आहे. मात्र खालची यंत्रणा गावपातळीवर अंमलबजावणी कशी करते यावरच सारे अवलंबून आहे.सहा गावात भीषण स्थितीजिल्ह्यात ८९ टँकर प्रस्तावित आहेत. असे असले तरी अत्यंत भीषण स्थिती असलेल्या सहा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील फत्तेपूर, नेरमधील खरडपूर, दारव्हा तालुक्यातील भांडेगाव, पुसद तालुक्यातील बाळवाडी, पाळोदी आणि मारवाडी अशा सहा ठिकाणी सध्या टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गतवर्षी १०८ टँकरने पाणीपुरवठापाणीटंचाई निवारण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यात १०८ टँकर सुरू करण्यात आले होते. यावर्षी पाणीटंचाई निवारण्यासाठी ८९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत १९ टँक र कमी लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई