शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जिल्ह्यात ६६४ विहिरी अधिग्रहणाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 21:26 IST

जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे.

ठळक मुद्देप्रश्न पाणीटंचाईचा : भूजल सर्वेक्षणला मुबलक जलस्त्रोतांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासोबतच मुबलक पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या ठिकाणाचा शोधही भूजल सर्वेक्षण विभाग घेत आहे.यावर्षी जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार आहे. त्यावर मात करण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. यामध्ये कळंब तालुक्यात ९३, दारव्हा ३५, यवतमाळ ६४, नेर १७, पांढरकवडा २३, बाभूळगाव ३३, दिग्रस ४३, वणी ६, उमरखेड ५४, आर्णी ८१, घाटंजी ३५, मारेगाव १४, पुसद ४४, राळेगाव ५, महागाव १०३, झरी १६ आणि वणी तालुक्यातील ८ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे.या विहिरींवरून पाणीटंचाईग्रस्त भागात पाणी पोहचविण्यासाठी ८९ टँकरची मदत घेतली जाणार आहे. त्यामध्ये कळंब ६, दारव्हा ५, यवतमाळ १२, बाभूळगाव ४, वणी २, नेर ५, उमरखेड २, महागाव २, आर्णी ११, पुसद १८, घाटंजी ४, मारेगाव १, पांढरकवडा २, दिग्रस ९, झरी ६ टँकरची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने टँकरचे नियोजनही जिल्हा परिषदेने केले आहे. गरज भासताच हे टँकर सुरू केले जाणार आहेत. यंदा पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने तगड्या उपाययोजना आखल्या आहे. मात्र खालची यंत्रणा गावपातळीवर अंमलबजावणी कशी करते यावरच सारे अवलंबून आहे.सहा गावात भीषण स्थितीजिल्ह्यात ८९ टँकर प्रस्तावित आहेत. असे असले तरी अत्यंत भीषण स्थिती असलेल्या सहा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील फत्तेपूर, नेरमधील खरडपूर, दारव्हा तालुक्यातील भांडेगाव, पुसद तालुक्यातील बाळवाडी, पाळोदी आणि मारवाडी अशा सहा ठिकाणी सध्या टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गतवर्षी १०८ टँकरने पाणीपुरवठापाणीटंचाई निवारण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यात १०८ टँकर सुरू करण्यात आले होते. यावर्षी पाणीटंचाई निवारण्यासाठी ८९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत १९ टँक र कमी लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई