शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धक्कादायक! सकाळी चहाच्यावेळीच मिळणार दारूचा पौवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:10 IST

दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देदारूविषयी उदार धोरणदारूबंदी जिल्ह्यातही वाहतो दारूचा पूर

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. आता दारूबाजांना सकाळी चहाच्यावेळी दारूचा घोटसुद्धा मिळण्याचा मार्ग शासनाने खुला करून दिला आहे.एखाद्या आजाराने किंवा साथीने जीतक्या व्यक्तींचा मृत्यू होतो, त्यापेक्षा कित्येक पटीने दारूच्या सेवनाने मृत्यू होत असल्याचे वास्तव आहे. दारूच्या व्यसनापायी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यातील महिलांना याची मोठी झळ बसत आहे. म्हणूनच संपूर्ण राज्यातच दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. शासनाने वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. मात्र याच तिनही जिल्ह्यात सर्वाधिक अवैध दारूविक्री सुरू आहे. दारू तस्करांची हिंमत शिगेला पोहोचली आहे. शासन व प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे दारू तस्करांचे जाळे विणले जात आहे. छत्रपती चिडे हे पोलीस अधिकारी या धोरणाचा बळी ठरूनही शासनाने आपल्या दारूविषयक उदार धोरणात बदल घडविण्यास पुढाकार घेतलेला दिसत नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने राज्य महामार्गालगतची बंद करण्यात आलेली दारू दुकाने हळूहळू कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुरू होऊ लागली आहे. तर दारू दुकाने सुरू राहण्याची वेळ वाढवून शासनाने आपले उदार धोरण पुन्हा जाहिर केले आहे. यापूर्वी दारूची दुकाने सकाळी १० वाजता उघडायची व रात्री १० वाजता बंद व्हायची. आता शासनाच्या गृह विभागाने ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून दारू दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजता केली आहे. त्यामुळे दारू शौकीनांना सकाळी चहा पिण्याऐवजी दारूचा घोटच घेणे शक्य झाले आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदी