शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सकाळी चहाच्यावेळीच मिळणार दारूचा पौवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:10 IST

दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देदारूविषयी उदार धोरणदारूबंदी जिल्ह्यातही वाहतो दारूचा पूर

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. आता दारूबाजांना सकाळी चहाच्यावेळी दारूचा घोटसुद्धा मिळण्याचा मार्ग शासनाने खुला करून दिला आहे.एखाद्या आजाराने किंवा साथीने जीतक्या व्यक्तींचा मृत्यू होतो, त्यापेक्षा कित्येक पटीने दारूच्या सेवनाने मृत्यू होत असल्याचे वास्तव आहे. दारूच्या व्यसनापायी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यातील महिलांना याची मोठी झळ बसत आहे. म्हणूनच संपूर्ण राज्यातच दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. शासनाने वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. मात्र याच तिनही जिल्ह्यात सर्वाधिक अवैध दारूविक्री सुरू आहे. दारू तस्करांची हिंमत शिगेला पोहोचली आहे. शासन व प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे दारू तस्करांचे जाळे विणले जात आहे. छत्रपती चिडे हे पोलीस अधिकारी या धोरणाचा बळी ठरूनही शासनाने आपल्या दारूविषयक उदार धोरणात बदल घडविण्यास पुढाकार घेतलेला दिसत नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने राज्य महामार्गालगतची बंद करण्यात आलेली दारू दुकाने हळूहळू कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुरू होऊ लागली आहे. तर दारू दुकाने सुरू राहण्याची वेळ वाढवून शासनाने आपले उदार धोरण पुन्हा जाहिर केले आहे. यापूर्वी दारूची दुकाने सकाळी १० वाजता उघडायची व रात्री १० वाजता बंद व्हायची. आता शासनाच्या गृह विभागाने ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून दारू दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजता केली आहे. त्यामुळे दारू शौकीनांना सकाळी चहा पिण्याऐवजी दारूचा घोटच घेणे शक्य झाले आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदी