शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे कोटींनी रेल्वेचे भूसंपादन होणार सुकर

By admin | Updated: February 26, 2016 02:11 IST

तमाम जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यवतमाळ : तमाम जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षात या प्रकल्पाला मिळालेला हा सर्वाधिक निधी आहे. या दीडशे कोटींमुळे रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग सुकर होणार आहे.गुरुवारी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर होत असताना यवतमाळकर दूरचित्रवाहिन्यांसमोर मोठ्या आशेने बसले होते. या बजेटमध्ये जिल्ह्याला किमान ५०० कोटी रुपये मिळतील, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात दीडशे कोटी रुपये मिळाले. दीडशे कोटींच्या घोषणेने ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पहायला मिळाले. बहुतांश नागरिकांनी या दीडशे कोटींवर समाधान व्यक्त केले. या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग यामुळे सुकर होईल, असे मानले जात आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी रेल्वे मंत्री तथा महाराष्ट्राचे सुपुत्र सुरेश प्रभू यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला होता. खासदार भावना गवळी यांनीही आपले प्रयत्न सुरूच ठेवले. दीडशे कोटींची ही तरतूद या प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. आठ वर्षांमध्ये मिळालेला दीडशे कोटी हा सर्वाधिक निधी असला तरी प्रकल्पाची किंमत दुप्पटीने वाढली आहे. त्या तुलनेत हा मिळालेला निधी तुटपुंजा ठरत असल्याची काही नागरिकांची भावना आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प खासदार विजय दर्डा यांच्या अथक परिश्रमातून मंजूर झाला. तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २००९ रोजी या प्रकल्पाचे यवतमाळात भूमिपूजन झाले. २७० किलोमीटरच्या या रेल्वे प्रकल्पाची मूळ किंमत २७४ कोटी ५५ लाख होती. ती आता १६०० कोटींपेक्षाही अधिक झाली आहे. या प्रकल्पात केंद्र व राज्याचा अनुक्रमे ६०-४० चा वाटा आहे. (नगर प्रतिनिधी)राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा रेंगाळलाकासवगतीने सुरू असलेल्या या प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळावा, अशी मागणी होत आहे. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी यांनी केंद्र सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला आहे. यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये तरी त्याला अद्याप यश आलेले नाही. भूसंपादन कायद्याचा जोखड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करताना नवीन कायद्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. नवीन प्रक्रियेनुसार किमान दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. शासनाने थेट जमीन खरेदीची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. आतापर्यंत ११ शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित झाली असून त्यांना सहा कोटींचा मोबदला दिला जात आहे. भूसंपादनासाठी प्राप्त १७ कोटींपैकी ११ कोटी रुपये अद्याप शिल्लक आहे. एकूण ७०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यातून ९५ शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा आहे. पूर्णवेळ अधिकारी आल्याने किमान ११ प्रकरणे निकाली काढता आली आहे.