शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

यवतमाळचे मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याचा मनसेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 18:56 IST

राजू उंबरकर : इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन हा मराठी सारस्वतांचा अपमान

वणी (यवतमाळ) : येत्या ११ जानेवारीपासून यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते होत असून हा थेट मराठी सारस्वतांचा अपमान आहे. तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही. मराठी मुलुखात अशा पद्धतीने मराठी साहित्यिकांचा अनादर झाल्यास साहित्य संमेलनच गनिमी काव्याने उधळून लावू, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक व लेखिका नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार आहे. आयोजकांच्या विचित्र धोरणाने हे संमेलन होण्याआधीच गाजत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळात मराठी सारस्वतांचा मेळा भरेल, अशी अपेक्षा होती. परंतु या साहित्य संमेलनातील अमराठी साहित्यिकांची घुसखोरी सर्वांनाच चक्रावून टाकणारी आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी साहित्यिकांची संख्या मोठी आहे. असे असतानाही साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी लेखिकेच्या हाताने व्हावे, ही बाबच संताप आणणारी असल्याचे उंबरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. साहित्य हे कुठल्याही भाषेत असो, ते प्रबोधनकारीच असते, ही बाब आम्ही नाकारत नाही. परंतु यवतमाळात भरणारे साहित्य संमेलन हे मराठी भाषिकांचे आहे. एकीकडे स्वत:ला मराठी भाषेचे रक्षणकर्ते म्हणायचे आणि दुसरीकडे मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवायचे, हा केवळ मराठी भाषिकांचाच नव्हे, तर मराठी सारस्वतांचादेखिल अपमान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बाब कदापीही खपवून घेणार नाही, असे उंबरकर म्हणाले. 

यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असूनसुद्धा बहुतांश आदिवासी बांधव मराठीचा आदर करत मराठी भाषा बोलतात. अशा जिल्ह्यात पार पडणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यिकाला पाचारण करावे, याला आयोजकांची बौद्धीक दिवाळखोरी समजायची काय, असा सवालही उंबरकर यांनी उपस्थित केला. एकीकडे मराठी भाषेचा उदोउदो करायचा, तिच्या संगोपनासाठी आणाभाका घ्यायच्या आणि दुसरीकडे या भाषेच्या विकासासाठी आयुष्य वेचणाºया सच्चा मराठी साहित्यिकाला डावलून मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवावे, यासारखे मराठी माणसाचे दुसरे दुर्दैव नाही, असेही उंबरकर म्हणाले. अशा पद्धतीने आयोजक मनमानी करत असतील, तर हे संमेलनच आम्ही उधळून टाकू, त्यासाठी गनिमी काव्याचा वापर करू, असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMNSमनसे