शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

यवतमाळचे मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याचा मनसेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 18:56 IST

राजू उंबरकर : इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन हा मराठी सारस्वतांचा अपमान

वणी (यवतमाळ) : येत्या ११ जानेवारीपासून यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते होत असून हा थेट मराठी सारस्वतांचा अपमान आहे. तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही. मराठी मुलुखात अशा पद्धतीने मराठी साहित्यिकांचा अनादर झाल्यास साहित्य संमेलनच गनिमी काव्याने उधळून लावू, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक व लेखिका नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार आहे. आयोजकांच्या विचित्र धोरणाने हे संमेलन होण्याआधीच गाजत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळात मराठी सारस्वतांचा मेळा भरेल, अशी अपेक्षा होती. परंतु या साहित्य संमेलनातील अमराठी साहित्यिकांची घुसखोरी सर्वांनाच चक्रावून टाकणारी आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी साहित्यिकांची संख्या मोठी आहे. असे असतानाही साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी लेखिकेच्या हाताने व्हावे, ही बाबच संताप आणणारी असल्याचे उंबरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. साहित्य हे कुठल्याही भाषेत असो, ते प्रबोधनकारीच असते, ही बाब आम्ही नाकारत नाही. परंतु यवतमाळात भरणारे साहित्य संमेलन हे मराठी भाषिकांचे आहे. एकीकडे स्वत:ला मराठी भाषेचे रक्षणकर्ते म्हणायचे आणि दुसरीकडे मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवायचे, हा केवळ मराठी भाषिकांचाच नव्हे, तर मराठी सारस्वतांचादेखिल अपमान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बाब कदापीही खपवून घेणार नाही, असे उंबरकर म्हणाले. 

यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असूनसुद्धा बहुतांश आदिवासी बांधव मराठीचा आदर करत मराठी भाषा बोलतात. अशा जिल्ह्यात पार पडणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यिकाला पाचारण करावे, याला आयोजकांची बौद्धीक दिवाळखोरी समजायची काय, असा सवालही उंबरकर यांनी उपस्थित केला. एकीकडे मराठी भाषेचा उदोउदो करायचा, तिच्या संगोपनासाठी आणाभाका घ्यायच्या आणि दुसरीकडे या भाषेच्या विकासासाठी आयुष्य वेचणाºया सच्चा मराठी साहित्यिकाला डावलून मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवावे, यासारखे मराठी माणसाचे दुसरे दुर्दैव नाही, असेही उंबरकर म्हणाले. अशा पद्धतीने आयोजक मनमानी करत असतील, तर हे संमेलनच आम्ही उधळून टाकू, त्यासाठी गनिमी काव्याचा वापर करू, असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMNSमनसे