शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

यवतमाळचे मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याचा मनसेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 18:56 IST

राजू उंबरकर : इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन हा मराठी सारस्वतांचा अपमान

वणी (यवतमाळ) : येत्या ११ जानेवारीपासून यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते होत असून हा थेट मराठी सारस्वतांचा अपमान आहे. तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही. मराठी मुलुखात अशा पद्धतीने मराठी साहित्यिकांचा अनादर झाल्यास साहित्य संमेलनच गनिमी काव्याने उधळून लावू, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक व लेखिका नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार आहे. आयोजकांच्या विचित्र धोरणाने हे संमेलन होण्याआधीच गाजत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळात मराठी सारस्वतांचा मेळा भरेल, अशी अपेक्षा होती. परंतु या साहित्य संमेलनातील अमराठी साहित्यिकांची घुसखोरी सर्वांनाच चक्रावून टाकणारी आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी साहित्यिकांची संख्या मोठी आहे. असे असतानाही साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी लेखिकेच्या हाताने व्हावे, ही बाबच संताप आणणारी असल्याचे उंबरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. साहित्य हे कुठल्याही भाषेत असो, ते प्रबोधनकारीच असते, ही बाब आम्ही नाकारत नाही. परंतु यवतमाळात भरणारे साहित्य संमेलन हे मराठी भाषिकांचे आहे. एकीकडे स्वत:ला मराठी भाषेचे रक्षणकर्ते म्हणायचे आणि दुसरीकडे मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवायचे, हा केवळ मराठी भाषिकांचाच नव्हे, तर मराठी सारस्वतांचादेखिल अपमान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बाब कदापीही खपवून घेणार नाही, असे उंबरकर म्हणाले. 

यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असूनसुद्धा बहुतांश आदिवासी बांधव मराठीचा आदर करत मराठी भाषा बोलतात. अशा जिल्ह्यात पार पडणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यिकाला पाचारण करावे, याला आयोजकांची बौद्धीक दिवाळखोरी समजायची काय, असा सवालही उंबरकर यांनी उपस्थित केला. एकीकडे मराठी भाषेचा उदोउदो करायचा, तिच्या संगोपनासाठी आणाभाका घ्यायच्या आणि दुसरीकडे या भाषेच्या विकासासाठी आयुष्य वेचणाºया सच्चा मराठी साहित्यिकाला डावलून मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवावे, यासारखे मराठी माणसाचे दुसरे दुर्दैव नाही, असेही उंबरकर म्हणाले. अशा पद्धतीने आयोजक मनमानी करत असतील, तर हे संमेलनच आम्ही उधळून टाकू, त्यासाठी गनिमी काव्याचा वापर करू, असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMNSमनसे