शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

यवतमाळचे मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याचा मनसेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 18:56 IST

राजू उंबरकर : इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन हा मराठी सारस्वतांचा अपमान

वणी (यवतमाळ) : येत्या ११ जानेवारीपासून यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते होत असून हा थेट मराठी सारस्वतांचा अपमान आहे. तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही. मराठी मुलुखात अशा पद्धतीने मराठी साहित्यिकांचा अनादर झाल्यास साहित्य संमेलनच गनिमी काव्याने उधळून लावू, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक व लेखिका नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार आहे. आयोजकांच्या विचित्र धोरणाने हे संमेलन होण्याआधीच गाजत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळात मराठी सारस्वतांचा मेळा भरेल, अशी अपेक्षा होती. परंतु या साहित्य संमेलनातील अमराठी साहित्यिकांची घुसखोरी सर्वांनाच चक्रावून टाकणारी आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी साहित्यिकांची संख्या मोठी आहे. असे असतानाही साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी लेखिकेच्या हाताने व्हावे, ही बाबच संताप आणणारी असल्याचे उंबरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. साहित्य हे कुठल्याही भाषेत असो, ते प्रबोधनकारीच असते, ही बाब आम्ही नाकारत नाही. परंतु यवतमाळात भरणारे साहित्य संमेलन हे मराठी भाषिकांचे आहे. एकीकडे स्वत:ला मराठी भाषेचे रक्षणकर्ते म्हणायचे आणि दुसरीकडे मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवायचे, हा केवळ मराठी भाषिकांचाच नव्हे, तर मराठी सारस्वतांचादेखिल अपमान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बाब कदापीही खपवून घेणार नाही, असे उंबरकर म्हणाले. 

यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असूनसुद्धा बहुतांश आदिवासी बांधव मराठीचा आदर करत मराठी भाषा बोलतात. अशा जिल्ह्यात पार पडणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यिकाला पाचारण करावे, याला आयोजकांची बौद्धीक दिवाळखोरी समजायची काय, असा सवालही उंबरकर यांनी उपस्थित केला. एकीकडे मराठी भाषेचा उदोउदो करायचा, तिच्या संगोपनासाठी आणाभाका घ्यायच्या आणि दुसरीकडे या भाषेच्या विकासासाठी आयुष्य वेचणाºया सच्चा मराठी साहित्यिकाला डावलून मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवावे, यासारखे मराठी माणसाचे दुसरे दुर्दैव नाही, असेही उंबरकर म्हणाले. अशा पद्धतीने आयोजक मनमानी करत असतील, तर हे संमेलनच आम्ही उधळून टाकू, त्यासाठी गनिमी काव्याचा वापर करू, असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMNSमनसे