शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरापुढे भाजीपाला फेकला

By admin | Updated: June 4, 2017 01:08 IST

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, ठराविक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून संप मागे घेण्यात आल्याच्या वावड्या मुख्यमंत्री पसरवित आहे.

लोकजागृती मंचचे निषेध आंदोलन : मुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक दुधाचा अभिषेक, पोलिसांना हुलकावणीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, ठराविक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून संप मागे घेण्यात आल्याच्या वावड्या मुख्यमंत्री पसरवित आहे. भाजपाचे आश्वासन म्हणजे चुनावी जुमला असतो. या जुमल्यावर जाऊ नका. कर्जमाफी होईपर्यंत संप सुरूच ठेवा, असा उद्घोष करीत लोकजागृती मंचतर्फे शनिवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरापुढे निषेध आंदोलन करण्यात आले. लोकजागृती मंचचे प्रमुख देवानंद पवार यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते शेतकरी पालकमंत्र्यांच्या घरावर धडकले. आंदोलनाची खबर मिळाल्याने तेथे आधीच तगडा पोलीस बंदोबस्त होता. परंतु, पोलिसांच्या देखतच शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर फेकले. भाज्या फेकल्या. भाजपा सरकारचा निषेध असो, खोटारड्या मुख्यमंत्र्यांचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतीक म्हणून मुख्यमंत्र्यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याला अक्षरश: दुधाचा अभिषेक करण्यात आला. ढोल आणि डफड्यांच्या निनादात झालेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले. तत्पूर्वी लोकजागृतीमंचतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे निवेदन पाठविण्यात आले. यवतमाळसह राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोग विनाविलंब लागू करावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, कृषीपंपासाठी २४ तास मोफत वीज पुरवठा द्यावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.शेतकऱ्यांचा संप सुरूच राहणारदत्त चौकातील आंदोलन : सरकारने विश्वासघात केल्याचा लोकजागृती मंचचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या दत्त चौकातील घरासमोर गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करणाऱ्या लोकजागृती मंचने शेतकऱ्यांचा संप पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवाय भाजपा सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला. संपकरी शेतकऱ्यांमध्ये मुख्यमंत्री फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र संप सुरूच राहणार आहे. खरीप २०१५ ची ३११७ कोटी ५४ लाख रुपयांची दुष्काळी मदत उच्च न्यायालयात शपथपत्र देऊनही फडणवीस सरकारने अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत मागण्या मार्गी लावण्याच्या आश्वासनावर आता शेतकऱ्यांचा विश्वास नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभडी येथे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले. मात्र नंतर ते पाळता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. त्यामुळे राज्यपालांनीच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देवानंद पवार यांनी केली. यावेळी देवानंद पवार यांच्यासह, हेमंत कांबळे, गोपाळ उमरे, प्रमोद गंडे, साहेबराव पवार, संतोष गंडे, गजू शेंडे, चंदू कुडमथे, चंद्रजोत ओळंबे, माधव कुमरे, सुभाष हजारे, बंडू आडे, जयवंत आडे, प्रकाश राठोड, पंडित राठोड, राजू पवार, श्रीराम आडे, ज्ञानेश्वर आडे, निकेश आडे, लचूराम जाधव, दिनेश राठोड, वसराम राठोड, सुयश राठोड, हरिदास राठोड, रघुनाथ आडे, प्रदीप गवळी, सुनिल कांबळे, विनोद आत्राम, सहदेव आडे, दिलीप कोवे, संजय राठोड, पुंडलीक सावरबांधे, रवींद्र राठोड, सुनिल जाधव, किशोर आत्राम, गोपाल कोवे, मंगेश मानकर, अर्जुन पुसनाके, एकनाथ दुलाकर, बळवंत खरतडे, अमरनाथ नगराळे, महादेव सशवार, नारायण ठाकरे आदी सहभागी होते. पालकमंत्र्यांशी शाब्दिक चकमक आंदोलन सुरू असतानाच पालकमंत्री मदन येरावार बाहेर आले. त्यांनी आंदोलकांना मागण्यांचे निवेदन मागितले. मात्र आंदोलकांनी एवढी घोषणाबाजी सुरू असताना तुम्हाला मागण्या माहीत नाही काय, असा सवाल केला. त्यानंतर पालकमंत्री निघून गेल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा संतापाच्या भरात भाज्या, कांदे भररस्त्यावर त्वेषाने फेकण्यास सुरूवात केली. पोलिसांनी देवानंद पवार यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन वडगाव रोड पोलीस ठाण्यात नेले.