शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे एप्रिलमध्ये आला मिलमिली नदीला पूर: नेरमध्ये गारपीट

By विशाल सोनटक्के | Updated: April 7, 2023 19:13 IST

यवतमाळ, बाभूळगाव, महागावमध्ये बरसला पाऊस

यवतमाळ : हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज पावसाने तंतोतंत खरा ठरविला. शुक्रवारी दुपारी यवतमाळसह बाभूळगाव, महागाव तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. नेरमध्ये गारपीट झाली असून या पावसामुळे नेर बसस्थानकाजवळच्या मिलमिली नदीला पूर आला होता. दरम्यान, या पावसामुळे आंब्यासह गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले असून भाजीपाल्यालाही या पावसाचा फटका बसला आहे.

हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात गारपीटीसह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यवतमाळमध्ये या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. यवतमाळ शहरात सुमारे अर्धा तास पाऊस बरसला. नेरमध्ये दुपारी ३ च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.

या ठिकाणी गारपीटही झाली असून सुमारे दीड तास झालेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. बाभूळगाव, महागावमध्येही अवकाळी पाऊस बरसला आहे. दरम्यान, या पावसादरम्यान महागाव तालुक्यातील पेढी येथे दिगंबर माधवराव भाराटे यांच्या शेतात वीज कोसळून त्यात गाईचा मृत्यू झाला. तर महागाव तालुक्यातीलच मौजा संगम येथे धुऱ्यावर बोरीच्या झाडावर वीज कोसळल्याने रेणुकादास वामन शिंदे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच हिवरा येथील तलाठ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असून याचा प्राथमिक अहवाल महागाव तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे. 

जिल्हा प्रशासनाने जारी केला अलर्टशुक्रवारी यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. शनिवार ८ एप्रिल रोजीही जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज प्रादेशिक मौसम पूर्वानुमान केंद्र नागपूर यांनी वर्तविला आहे. या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

उन्हाळ्यात पूर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

नेर येथे दुपारी ३ ते ४:३० या दीड तासात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली आहे. या पावसामुळे नेर शहरातील मिलमिली नदीला पूर आला. ऐन उन्हाळ्यात आलेला हा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदी काठावर गर्दी केली हेाती. दरम्यान पावसामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून गहू, भाजीपाल्यासह आंब्याचे नुकसान झाले आहे. तर टरबूज पिकालाही याचा फटका बसला आहे.

 

टॅग्स :YavatmalयवतमाळRainपाऊस