शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

यवतमाळात विकास कामांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:45 PM

धामणगाव आणि आर्णी मार्गाचे चौपदरीकरण, अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम शहरात धडाक्यात सुरू आहे. गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांच्या गोंधळाने यवतमाळकर प्रचंड त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल : जीवन प्राधिकरण, वीज वितरण, बांधकाममध्ये समन्वयाचा अभाव

सुरेंद्र राऊत ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : धामणगाव आणि आर्णी मार्गाचे चौपदरीकरण, अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम शहरात धडाक्यात सुरू आहे. गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांच्या गोंधळाने यवतमाळकर प्रचंड त्रस्त झाले आहे. जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी आणि बांधकाम विभाग यांच्यात समन्वय नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे.यवतमाळ शहरात यावर्षी ‘प्रचंड’ विकास कामे सुरू आहे. आर्णी मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी दोन्ही बाजूला खोदकाम झाले आहे. यामध्ये वीज खांब, पाणी पुरवठा योजनेचे पाईपलाईन यासह दूरसंचारचे भूमिगत केबलही तुटले आहे. नळ पाईप फुटल्याने अनेकांच्या घरी नाळाचे पाणीच येत नाही. सध्या यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई आहे. जीवन प्राधिकरणाचे २० ते २२ दिवसानंतर सोडलेले पाणी या फुटलेल्या पाईपमधूनच वाहून जाते. दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा पाईप फुटून पाण्याचा अपव्यय सुरू होतो. बांधकाम झालेल्या रस्त्यावरून लगतच्या कॉलनींमध्ये रपटे बांधण्यात आले. परंतु या रपट्याची उंची आणि रस्ते यात कुठेही समन्वय दिसत नाही. रपटे उंच आणि रस्ते खड्ड्यात यामुळे वाहनधारकांना अडचण जाते. आर्णी मार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. बुधवारी काम सुरू असलेल्या भागात चक्क गिट्टीने भरलेला ट्रक काँक्रीटमध्ये फसला. हा फसलेला ट्रक या कामाच्या गुणवत्तेचे दर्शनच घडवित होता.शहरातीलच धामणगाव मार्गाचहीे चौपदरीकरण केले जात आहे. या कामांची पहिली कुºहाड पडली ती शतकोत्तरी वृक्षांवर. धामणगाव मार्गाची ओळख असलेले दोन्ही बाजूचे निंबाचे वृक्ष तोडण्यात आले. त्यानंतर नालीसाठी खोदकाम करण्यात आले. या खोदकामात जलवाहिन्या, भूमिगत वीज केबल तुटले आहे.धामणगाव मार्गावर ठिकठिकाणी उघडे पडलेले वीज केबल आणि नळ आल्यानंतर धो-धो वाहणारे पाणी दिसते. खोदकाम करताना कोणतेही नियम पाळले जात नाही. टिंभर भवनच्या पुढे वीज खांबाजवळून नालीचे खोदकाम झाले. त्यामुळे वीज खांब पडण्याच्या अवस्थेत आला. हा खांब कोसळून अपघात होऊ नये म्हणून त्या भागातील नागरिकांनी चक्क नॉयलॉनच्या दोरीने दुसऱ्या खांबाचा आधार घेऊन कोसळणाºया खांबाला आधार दिला आहे. हा प्रकार कुणालाही चिड आणणारा आहे.खोदकामाने फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम प्राधिकरणाकडून केले जाते. मात्र या दुरुस्तीच्या कामात भूमिगत वीज केबल तुटली जाते. त्यानंतर वीज वितरण भूमिगत केबलच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करते तेव्हा पुन्हा जलवाहिनी फुटते, असा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.आर्णी आणि धामणगाव मार्गावर झालेल्या खोदकामाने या भागातील दूरध्वनी संच गत सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याचे बिल मात्र नियमित येत आहे. यामुळे अनेकांनी दूरध्वनी सेवा कायमची बंद करण्याचे अर्जच दूरसंचार विभागाकडे दिले आहे. या भागातील ब्रॉडबँड आणि इतर सेवा प्रभावित झाली आहे.इंदिरा गांधी मार्केटमध्ये अनाठायी खोदकामकुठल्याही योजनेत पाईपलाईनचे काम हे शेवटपासून अथवा सुरुवातीपासून केले जाते. परंतु यवतमाळ शहरात अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्याचा अजब नमुना दिसून येते. इंदिरा गांधी मार्केट ते पाच कंदील चौक दरम्यान रस्ता खोदून मोठ्ठाले पाईप टाकण्यात आले. मधातच पाईप टाकण्याचा प्रकार म्हणजे प्रसिद्धीसाठी तर नव्हे ना असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या या रस्त्यावरून जायचा प्रत्येकजण टाळत आहे. प्रचंड धुळीचे लोट तेथे दिवसभर असतात. गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने या रस्त्याला पांदण रस्त्याचे स्वरूप आले होते.बेंबळा मुख्य पाईपलाईनला नागमोडी वळणटाकळी फिल्टर प्लाँट ते जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत प्रस्तावित असलेल्या पाईपलाईनच्या कामात काहींनी हस्तक्षेप केला. यामुळे धामणगाव मार्गाने सरळ येणारी पाईपलाईन आता नागमोडी वळण घेऊन येत आहे. ही पाईपलाईन राणीसती मंदिर, लकडगंज परिसर, अप्सरा टॉकीज मार्गे हनुमान आखाडा चौकातून वळविण्यात आली आहे. कुठलीही पाईपलाईन तांत्रिक दृष्ट्या जेवढी सरळ तेवढी उपयोगिता अधिक असते. परंतु येथे नागमोडी वळणाची पाईपलाईन टाकण्याचा प्रताप सुरु आहे.