शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

बैठकांचे सत्र, अधिकारी त्रस्त

By admin | Updated: July 29, 2016 02:17 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात अधिकाऱ्यांचे बैठक सत्र सुरू आहे. या बैठकांमुळे अनेक अधिकारी त्रस्त झाले असून ....

येरझारांनी आजार वाढले : कार्यालयीन गैरहजेरीने नागरिकांचा रोष यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात अधिकाऱ्यांचे बैठक सत्र सुरू आहे. या बैठकांमुळे अनेक अधिकारी त्रस्त झाले असून काम करावे तरी कधी, असा प्रश्न त्यांनीच उपस्थित केला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग आदींमार्फत विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी कार्य करीत आहे. मात्र या योजनांच्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकींमुळे आता अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झाले आहे. वारंवार जिल्हा अथवा तालुकास्तरावर बैठका होत असल्याने त्यांचा वेळ येण्या-जाण्यातच खर्ची होत आहे. शिवाय मणक्याचे व अन्य आजारही बळावत आहे. प्रत्यक्ष कामासाठी अधिकाऱ्याकडे १२ ते १४ दिवस शिल्लक असतात. त्यात विविध योजनांची अंमलबजावणी करावी लागते. त्यात अनेकदा, धरणे, मोर्चे, आंदोलन असतात. यात त्यांचे कामाचे दिवस वाया जातात. परिणामी उर्वरित दिवसांत किती आणि कोणते काम करावे तरी कधी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. सततच्या या बैठका पाहता आम्ही यवतमाळातच मुक्कामी रहावे का? असा सवाल अधिकारी विचारत आहे. सततच्या बैठकांमुळे कार्यालयात गैरहजर दिसत असल्याने नागरिकांचा रोषही पत्करावा लागतो. त्यातूनच कामे होत नाहीत, असे म्हणून नागरिक तक्रारी करतात, बदलीची मागणी करीत असल्याची व्यथा अधिकाऱ्यांनी मांडली. (शहर प्रतिनिधी) महिन्यातील चार रविवार आणि दोन शनिवारी शासकीय सुटी असते. या व्यतिरिक्त आता महिन्यात किमान एक-दोन सण येतात. त्यामुळे महिन्यातील किमान आठ दिवस सुटीतच जातात. उरलेल्या २२ दिवसांपैकी किमान आठ ते दहा दिवस तालुका आणि जिल्हास्तरीय बैठकीत निघून जातात.