शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

बैठकांचे सत्र, अधिकारी त्रस्त

By admin | Updated: July 29, 2016 02:17 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात अधिकाऱ्यांचे बैठक सत्र सुरू आहे. या बैठकांमुळे अनेक अधिकारी त्रस्त झाले असून ....

येरझारांनी आजार वाढले : कार्यालयीन गैरहजेरीने नागरिकांचा रोष यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात अधिकाऱ्यांचे बैठक सत्र सुरू आहे. या बैठकांमुळे अनेक अधिकारी त्रस्त झाले असून काम करावे तरी कधी, असा प्रश्न त्यांनीच उपस्थित केला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग आदींमार्फत विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी कार्य करीत आहे. मात्र या योजनांच्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकींमुळे आता अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झाले आहे. वारंवार जिल्हा अथवा तालुकास्तरावर बैठका होत असल्याने त्यांचा वेळ येण्या-जाण्यातच खर्ची होत आहे. शिवाय मणक्याचे व अन्य आजारही बळावत आहे. प्रत्यक्ष कामासाठी अधिकाऱ्याकडे १२ ते १४ दिवस शिल्लक असतात. त्यात विविध योजनांची अंमलबजावणी करावी लागते. त्यात अनेकदा, धरणे, मोर्चे, आंदोलन असतात. यात त्यांचे कामाचे दिवस वाया जातात. परिणामी उर्वरित दिवसांत किती आणि कोणते काम करावे तरी कधी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. सततच्या या बैठका पाहता आम्ही यवतमाळातच मुक्कामी रहावे का? असा सवाल अधिकारी विचारत आहे. सततच्या बैठकांमुळे कार्यालयात गैरहजर दिसत असल्याने नागरिकांचा रोषही पत्करावा लागतो. त्यातूनच कामे होत नाहीत, असे म्हणून नागरिक तक्रारी करतात, बदलीची मागणी करीत असल्याची व्यथा अधिकाऱ्यांनी मांडली. (शहर प्रतिनिधी) महिन्यातील चार रविवार आणि दोन शनिवारी शासकीय सुटी असते. या व्यतिरिक्त आता महिन्यात किमान एक-दोन सण येतात. त्यामुळे महिन्यातील किमान आठ दिवस सुटीतच जातात. उरलेल्या २२ दिवसांपैकी किमान आठ ते दहा दिवस तालुका आणि जिल्हास्तरीय बैठकीत निघून जातात.