शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा अन् पाण्याअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 07:18 IST

पांढरकवडा येथील महिला मेळाव्यातील घटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा

नरेश मानकर

पांढरकवडा (यवतमाळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या महिला महामेळाव्यात ५-६ तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. क्षितिजा बाबूराव गुड्डेटवार (१२, रा. शिवाजी वार्ड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

क्षितीजा ही मूळची नांदेड जिल्ह्यातील आहे. वडिलांचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर ती आईसह आजोळी पांढरकवडा येथे राहायला आली. येथील जिल्हा परिषद विद्यालयात ती शिकत होती. १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसाहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितीजा, तिची आई सुनीता व सात वर्षांचा भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उन्हही जोरात होते. मेळाव्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कित्येक महिलांचा जीव कासावीस झाला होता. गर्दीमुळे महिलांना बाहेर निघणे कठीण होते.

‘जागीच बसून रहा’ : पोलिसांचे फर्मान

सुरक्षेच्या कारणावरून ‘जागीच बसून रहा’ असे फर्मान पोलीस अधिकाऱ्यांकडून सोडले जात होते. महिलांना पाच ते सात तास पाण्याविना रहावे लागले. वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावली. तिला आधी पांढरकवड्यातील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळला हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्यावर उपचार शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. अखेर आॅक्सीजन लावून क्षितीजाला पांढरकवडा येथे घरी आणण्यात आले. मात्र तेथे बुधवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. पांढरकवडा येथे दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.महिलांमध्ये संतप्त भावनासभेत पाण्याची व्यवस्था न केल्याने क्षितीजाचा मृत्यू झाल्याची संताप्त भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केली. क्षितीजाचे बुधवारी निधन झाले, तरी कुणी भाजपा पदाधिकारी तिच्या घराकडे फिरकला नाही.पोलिसात तक्रार नोंदविणारमृतक क्षितीजाची आई सुनीता गुड्डेटवार या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे पद्मशाली समाजाच्या एका पदाधिकाºयाने गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.क्षितीजाला नरेंद्र मोदींच्या महिला मेळाव्यात वेळीच पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे तिची प्रकृती खालावली व त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र यात आता नेमका दोष कुणाला द्यावा हेच समजत नाही.- विनोद पेंटावार (पांढरकवडा) क्षितीजाचे मामा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYavatmalयवतमाळ