शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

मार्लेगावच्या शेतकऱ्याची झुंज ठरली व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:59 IST

कर्जबाजारीपणामुळे स्वत:ला जाळून घेणाऱ्या मार्लेगाव येथील शेतकऱ्याचा तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत अंत्ययात्रा काढली.

ठळक मुद्देसहाव्या दिवशी मृत्यू : गावकऱ्यांनी काढली डोक्याला काळ्या फिती बांधून अंत्ययात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : कर्जबाजारीपणामुळे स्वत:ला जाळून घेणाऱ्या मार्लेगाव येथील शेतकऱ्याचा तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत अंत्ययात्रा काढली.श्यामराव रामा भोपळे, (६८) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ५ मे रोजी मध्यरात्री घरासमोरील निंबाच्या झाडाखाली अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही घटना ६ मे रोजी पहाटे उघडकीस आली. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालय आणि नंतर नांदेड येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. नांदेड येथे सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.भोपळे यांच्यावर सोसायटीचे २१ हजारांचे कर्ज होते. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने त्यांना पुढील खरीप हंगामाची चिंता सतावत होती. या विवंचनेत त्यांनी जाळून घेतले.पैनगंगा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर नदी पात्रात आयोजित शोकसभेत शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी ही भोपळे यांची अंत्ययात्रा नसून मोदी व फडणवीस सरकारची निषेध यात्रा असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय खडसे, नांदेडच्या महापौर शीला भवरे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, माजी सभापती आत्माराम शिंदे, संभाजी ब्रिगेडचे गुणवंत सूर्यवंशी, उमरखेडचे उपनगराध्यक्ष अरविंद भोयर, गजानन सोळंके, सरोज देशमुख, आशाताई देवसरकर, सरपंच कैलास शिंदे, नाथा पाटील व गावकरी उपस्थित होते.प्रशासनाने ठेवला मार्लेगावात तगडा बंदोबस्तकर्जबाजारीपुणामुळे श्यामराव भोपळे यांनी जाळून घेतले. तरीही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे संतापलेल्या गावकºयांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत भोपळे यांची अंत्ययात्रा काढली. त्यासाठी प्रशासनाने गावात तगडा बंदोबस्त ठेवला. पैनगंगा नदी काठावर भोपळे यांचा अंत्यविधी पार पडला.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या