शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बाजारपेठेवर प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी रविवारी दुपारी प्रतिबंधित उपाययोजनांचे आदेश जारी केले. यामध्ये नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व उद्योग सुरू ठेवता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये व आस्थापना वगळता इतर कार्यालयांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के किंवा १५ व्यक्तींनाच कामावर येता येणार आहे.

ठळक मुद्देसकाळी ९ ते ५ ची वेळ : प्रतिबंधित क्षेत्रात दुपारी ३ पर्यंतच मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने बाजारपेठेवर पुन्हा प्रतिबंध लावण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बाजारपेठ सुरू राहणार आहे. तर, ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले, अशा प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी रविवारी दुपारी प्रतिबंधित उपाययोजनांचे आदेश जारी केले. यामध्ये नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व उद्योग सुरू ठेवता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये व आस्थापना वगळता इतर कार्यालयांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के किंवा १५ व्यक्तींनाच कामावर येता येणार आहे. ग्राहकांनाही खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदाराकडे जावे, दूरचा प्रवास टाळावा, असे निर्देश आहे. उपाहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता तेथून पार्सल सुविधा देण्यास परवानगी आहे. सर्व शैक्षणिक कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक यांना कामाकरिता परवानगी आहे. मालाच्या वाहतुकीवरही कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही. आंतरजिल्हा वाहतूक पूर्ववत आहे. एसटी बसमधून क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी सोशल डिस्टन्सिंग राखून नेता येणार आहे. धार्मिक स्थळावर एकावेळी दहापेक्षा जास्त नागरिकांना जाण्याची मुभा नाही. ठोक भाजीबाजार हा पहाटे ३ ते सकाळी ६ या कालावधीत सुरू राहील. त्या ठिकाणी किरकोळ भाजी विक्रेत्यांनाच प्रवेश आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग बंद राहणार आहे. सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे ही ठिकाणे बंद आहे. 

लग्नाला केवळ २५ व्यक्तींनाच परवानगी लग्न सोहळ्याला वधू-वरासह केवळ २५ व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. याची रीतसर तहसीलदारांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. खासगी वाहनातून चालकासह चौघांना, दुचाकीवर दोघांना हेल्मेट, मास्क वापरून प्रवास करता येणार आहे. 

कळंबचा तरुण दगावला, जिल्ह्यात ७५ नवे रुग्ण  रविवारी जिल्ह्यात एका तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. तर दिवसभरात तब्बल ७५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले. रविवारी दगावलेला ४० वर्षीय पुरुष हा कळंब तालुक्यातील रहिवासी होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, पॉझिटिव्ह आलेल्या ७५ जणांमध्ये ४६ पुरुष आणि २९ महिला आहेत. यात यवतमाळातील ४० रुग्ण, पुसद येथील ९, दिग्रस ८, पांढरकवडा ८, दारव्हा २, बाभूळगाव २, घाटंजी २, आर्णी १, कळंब १, महागाव १ आणि उमरखेड़ येथील १ रुग्ण आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९५० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तर ४४७ जणांच्या मृत्यूची प्रशासनाने नोंद केली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी