शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

यवतमाळात पाच दिवस बाजारपेठ बंद; जनता कर्फ्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 08:30 IST

कोरोना संसर्गाची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इन्ड्रस्टीजने मंगळवार १५ सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात बाजारपेठ बंदचे आवाहन केले. मात्र हा बंद सक्तीचा नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इन्ड्रस्टीजने मंगळवार १५ सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात बाजारपेठ बंदचे आवाहन केले. मात्र हा बंद सक्तीचा नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.चेंबर ऑफ कॉमर्सने बंदचे आवाहन केले आहे. परंतु हा जनता कर्फ्यू नाही आणि शासन, प्रशासनाचा याला कुठलाही पाठिंबा, सक्ती नसल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बहुतांश व्यापारी, व्यावसायिकांचा या बंदला विरोध आहे. विविध सामाजिक संस्थांनीही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा बंद कशासाठी, त्याचे फलित काय असे प्रश्न उपस्थित केले. सर्व काही सुरू असताना केवळ व्यापारपेठ बंद ठेवून कोरोना साखळी तुटेल काय असा सवालही उपस्थित केला गेला. चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम आहे. चेंबरच्या अंतर्गत ५५ ते ६० विविध संघटना आहेत. संघटनात्मक स्तरावर बंदला होकार मिळाला असला तरी अनेक व्यापारी, व्यावसायिकांचा विरोध आहे. त्यामुळे बंद किती यशस्वी होतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस